शहरं
Join us  
Trending Stories
1
२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, दुबार मतदारावरही उचललं पाऊल
2
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
3
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
4
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
5
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
6
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
7
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
8
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
10
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
11
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
12
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
13
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
14
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
15
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
16
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
17
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
18
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
19
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
20
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर

संविधान बदलणार हा महाविनोद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 01:25 IST

नाशिक : संविधान समजून घेणे इतके सोपे नाही जितक ी त्याविषयी चर्चा केली जाते. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संविधान बदलण्याचा अजेंडा आहे, असा प्रचार-प्रसार करणाऱ्यांनाच मुळात संविधान समजलेले नाही, त्यामुळे त्यांनी असा अपप्रचार करणे हा मोठा विनोदाचा व मूर्खपणाचा भाग ठरू शकतो, अशी टीका ज्येष्ठ विचारवंत रमेश पतंगे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देरमेश पतंगे : बंडोपंत जोशी स्मृती व्याख्यानात केली टीका ‘सक्षम’ या संघटनेचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

‘सक्षम’ संस्थेचा उत्कृष्ट सामाजिक संस्था म्हणून गौरव करताना रमेश पतंगे. समवेत व्यासपीठावर डावीकडून लक्ष्मण सावजी, सुहास फरांदे, विजय साने, माजी महापौर दशरथ पाटील, आमदार सीमा हिरे, मंगला जोशी, निशिगंधा मोगल आदी.

 

 

नाशिक : संविधान समजून घेणे इतके सोपे नाही जितक ी त्याविषयी चर्चा केली जाते. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संविधान बदलण्याचा अजेंडा आहे, असा प्रचार-प्रसार करणाऱ्यांनाच मुळात संविधान समजलेले नाही, त्यामुळे त्यांनी असा अपप्रचार करणे हा मोठा विनोदाचा व मूर्खपणाचा भाग ठरू शकतो, अशी टीका ज्येष्ठ विचारवंत रमेश पतंगे यांनी व्यक्त केले.प्रसाद सोशल ग्रुप व राष्टÑीय विचार प्रबोधिनीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानात ‘आम्ही व आमचे संविधान’ या विषयावर पतंगे यांनी विचार मांडले. यावेळी त्यांनी भारतीय राज्यघटना निर्मितीचा प्रवास आपल्या खास शैलीत अभ्यासपूर्ण पद्धतीने उलगडून सांगितला. व्यासपीठावर महापौर रंजना भानसी, आमदार सीमा हिरे, उपमहापौर प्रथमेश गिते, भाजपाचे चिटणीस लक्ष्मण सावजी, विजय साने, माजी महापौर दशरथ पाटील, सुहास फरांदे, निशिगंधा मोगल, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, मंगला जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पतंगे म्हणाले, संविधान म्हणजे काय हे जाणून घेणे आणि समजून घेणे हे सोपे नाही. संविधानाचा विषय अत्यंत कठीण असून भारतीय संविधानाला मोठा इतिहास आहे. संविधानाची ताकद ही अमेरिकेला समजली. अमेरिकेला बलाढ्य हे त्यांच्या केवळ सात कलमांच्या संविधानाने केले, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्या तुलनेत भारतीय संविधान हे अत्यंत व्यापक व सार्वभौमत्वाचा स्वीकार करणारे आहे, असे पतंगे म्हणाले. दरम्यान, ‘सक्षम’ या संघटनेचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक व स्वागत देवदत्त जोशी यांनी के ले.घटना समितीत सर्व जाती-धर्माचे सदस्य१९४६ साली भारतीय राज्यघटना समिती गठित करण्यात आली. ही समिती कॉँग्रेस पक्षाची नव्हती तर देशाच्या घटनेसाठी तयार करण्यात आली होती. त्यामुळे या समितीमध्ये सर्व जाती-धर्माचे सदस्य होते, असेही ते म्हणाले. देशाची घटना तयार होत असताना अनुसूचित जाती-जमातीच्या हक्कांचे संरक्षणाच्या हेतूने मला घटना समितीमध्ये स्थान हवे होते; मात्र मसुदा समितीचे अध्यक्ष केल्याने धक्का बसल्याची खंत त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केली होती, असेही यावेळी पतंगे यांनी बोलताना अधोरेखित केले.