शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

संविधान बदलणार हा महाविनोद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 01:25 IST

नाशिक : संविधान समजून घेणे इतके सोपे नाही जितक ी त्याविषयी चर्चा केली जाते. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संविधान बदलण्याचा अजेंडा आहे, असा प्रचार-प्रसार करणाऱ्यांनाच मुळात संविधान समजलेले नाही, त्यामुळे त्यांनी असा अपप्रचार करणे हा मोठा विनोदाचा व मूर्खपणाचा भाग ठरू शकतो, अशी टीका ज्येष्ठ विचारवंत रमेश पतंगे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देरमेश पतंगे : बंडोपंत जोशी स्मृती व्याख्यानात केली टीका ‘सक्षम’ या संघटनेचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

‘सक्षम’ संस्थेचा उत्कृष्ट सामाजिक संस्था म्हणून गौरव करताना रमेश पतंगे. समवेत व्यासपीठावर डावीकडून लक्ष्मण सावजी, सुहास फरांदे, विजय साने, माजी महापौर दशरथ पाटील, आमदार सीमा हिरे, मंगला जोशी, निशिगंधा मोगल आदी.

 

 

नाशिक : संविधान समजून घेणे इतके सोपे नाही जितक ी त्याविषयी चर्चा केली जाते. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संविधान बदलण्याचा अजेंडा आहे, असा प्रचार-प्रसार करणाऱ्यांनाच मुळात संविधान समजलेले नाही, त्यामुळे त्यांनी असा अपप्रचार करणे हा मोठा विनोदाचा व मूर्खपणाचा भाग ठरू शकतो, अशी टीका ज्येष्ठ विचारवंत रमेश पतंगे यांनी व्यक्त केले.प्रसाद सोशल ग्रुप व राष्टÑीय विचार प्रबोधिनीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानात ‘आम्ही व आमचे संविधान’ या विषयावर पतंगे यांनी विचार मांडले. यावेळी त्यांनी भारतीय राज्यघटना निर्मितीचा प्रवास आपल्या खास शैलीत अभ्यासपूर्ण पद्धतीने उलगडून सांगितला. व्यासपीठावर महापौर रंजना भानसी, आमदार सीमा हिरे, उपमहापौर प्रथमेश गिते, भाजपाचे चिटणीस लक्ष्मण सावजी, विजय साने, माजी महापौर दशरथ पाटील, सुहास फरांदे, निशिगंधा मोगल, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, मंगला जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पतंगे म्हणाले, संविधान म्हणजे काय हे जाणून घेणे आणि समजून घेणे हे सोपे नाही. संविधानाचा विषय अत्यंत कठीण असून भारतीय संविधानाला मोठा इतिहास आहे. संविधानाची ताकद ही अमेरिकेला समजली. अमेरिकेला बलाढ्य हे त्यांच्या केवळ सात कलमांच्या संविधानाने केले, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्या तुलनेत भारतीय संविधान हे अत्यंत व्यापक व सार्वभौमत्वाचा स्वीकार करणारे आहे, असे पतंगे म्हणाले. दरम्यान, ‘सक्षम’ या संघटनेचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक व स्वागत देवदत्त जोशी यांनी के ले.घटना समितीत सर्व जाती-धर्माचे सदस्य१९४६ साली भारतीय राज्यघटना समिती गठित करण्यात आली. ही समिती कॉँग्रेस पक्षाची नव्हती तर देशाच्या घटनेसाठी तयार करण्यात आली होती. त्यामुळे या समितीमध्ये सर्व जाती-धर्माचे सदस्य होते, असेही ते म्हणाले. देशाची घटना तयार होत असताना अनुसूचित जाती-जमातीच्या हक्कांचे संरक्षणाच्या हेतूने मला घटना समितीमध्ये स्थान हवे होते; मात्र मसुदा समितीचे अध्यक्ष केल्याने धक्का बसल्याची खंत त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केली होती, असेही यावेळी पतंगे यांनी बोलताना अधोरेखित केले.