शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

संविधान बदलणार हा महाविनोद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 01:25 IST

नाशिक : संविधान समजून घेणे इतके सोपे नाही जितक ी त्याविषयी चर्चा केली जाते. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संविधान बदलण्याचा अजेंडा आहे, असा प्रचार-प्रसार करणाऱ्यांनाच मुळात संविधान समजलेले नाही, त्यामुळे त्यांनी असा अपप्रचार करणे हा मोठा विनोदाचा व मूर्खपणाचा भाग ठरू शकतो, अशी टीका ज्येष्ठ विचारवंत रमेश पतंगे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देरमेश पतंगे : बंडोपंत जोशी स्मृती व्याख्यानात केली टीका ‘सक्षम’ या संघटनेचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

‘सक्षम’ संस्थेचा उत्कृष्ट सामाजिक संस्था म्हणून गौरव करताना रमेश पतंगे. समवेत व्यासपीठावर डावीकडून लक्ष्मण सावजी, सुहास फरांदे, विजय साने, माजी महापौर दशरथ पाटील, आमदार सीमा हिरे, मंगला जोशी, निशिगंधा मोगल आदी.

 

 

नाशिक : संविधान समजून घेणे इतके सोपे नाही जितक ी त्याविषयी चर्चा केली जाते. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संविधान बदलण्याचा अजेंडा आहे, असा प्रचार-प्रसार करणाऱ्यांनाच मुळात संविधान समजलेले नाही, त्यामुळे त्यांनी असा अपप्रचार करणे हा मोठा विनोदाचा व मूर्खपणाचा भाग ठरू शकतो, अशी टीका ज्येष्ठ विचारवंत रमेश पतंगे यांनी व्यक्त केले.प्रसाद सोशल ग्रुप व राष्टÑीय विचार प्रबोधिनीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानात ‘आम्ही व आमचे संविधान’ या विषयावर पतंगे यांनी विचार मांडले. यावेळी त्यांनी भारतीय राज्यघटना निर्मितीचा प्रवास आपल्या खास शैलीत अभ्यासपूर्ण पद्धतीने उलगडून सांगितला. व्यासपीठावर महापौर रंजना भानसी, आमदार सीमा हिरे, उपमहापौर प्रथमेश गिते, भाजपाचे चिटणीस लक्ष्मण सावजी, विजय साने, माजी महापौर दशरथ पाटील, सुहास फरांदे, निशिगंधा मोगल, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, मंगला जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पतंगे म्हणाले, संविधान म्हणजे काय हे जाणून घेणे आणि समजून घेणे हे सोपे नाही. संविधानाचा विषय अत्यंत कठीण असून भारतीय संविधानाला मोठा इतिहास आहे. संविधानाची ताकद ही अमेरिकेला समजली. अमेरिकेला बलाढ्य हे त्यांच्या केवळ सात कलमांच्या संविधानाने केले, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्या तुलनेत भारतीय संविधान हे अत्यंत व्यापक व सार्वभौमत्वाचा स्वीकार करणारे आहे, असे पतंगे म्हणाले. दरम्यान, ‘सक्षम’ या संघटनेचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक व स्वागत देवदत्त जोशी यांनी के ले.घटना समितीत सर्व जाती-धर्माचे सदस्य१९४६ साली भारतीय राज्यघटना समिती गठित करण्यात आली. ही समिती कॉँग्रेस पक्षाची नव्हती तर देशाच्या घटनेसाठी तयार करण्यात आली होती. त्यामुळे या समितीमध्ये सर्व जाती-धर्माचे सदस्य होते, असेही ते म्हणाले. देशाची घटना तयार होत असताना अनुसूचित जाती-जमातीच्या हक्कांचे संरक्षणाच्या हेतूने मला घटना समितीमध्ये स्थान हवे होते; मात्र मसुदा समितीचे अध्यक्ष केल्याने धक्का बसल्याची खंत त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केली होती, असेही यावेळी पतंगे यांनी बोलताना अधोरेखित केले.