शहरं
Join us  
Trending Stories
1
आसाम ते मणिपूर पावसाचा प्रकोप! ४८ जणांचा मृत्यू, ६०० ठिकाणी भूस्खलन, १५०० गावांना फटका
2
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या पंजाबी युट्यूबरला अटक; ज्योती मल्होत्राशी होतं कनेक्शन
3
३ मूलांकांवर राहते अखंड स्वामी कृपा, दत्त-गुरु कृपेने भरघोस पैसा; कधीच काहीही कमी पडत नाही!
4
सोन्याचे दागिने विकताय? थांबा! 'या' ३ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर नफ्याऐवजी होईल 'तोटा'
5
"हे खूप घृणास्पद, मी आता सहन करू शकत नाही"; ट्रम्प यांच्या निर्णयावर इलॉन मस्क संतापले
6
काळाचा घाला! लग्नावरुन परतणाऱ्या व्हॅनवर सिमेंटने भरलेला ट्रक उलटला, ९ जणांचा मृत्यू
7
१२ वर्षांनी गुरु-रवि युती, ७ राशींची ३० दिवस चांदीच चांदी; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-लाभ!
8
लग्नाच्या ३ महिन्यांनंतर पत्नीच्या घरी वरात घेऊन पोहोचला नवरा, पाहताच सासरेबुवा संतापले! नेमकं काय झालं? वाचाच...
9
तरुण दिसण्यासाठी दररोज न चुकता हा ज्यूस पिते मलायका अरोरा, तुम्हीही करा ट्राय
10
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील 'या' मुख्य कलाकाराला 'बिग बॉस १९'ची ऑफर? वाचा सविस्तर
11
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? 'या' ४ चुका टाळा, नाहीतर पैसे अडकतील!
12
जगाला धमकी देता देता ट्रम्प यांनी आपल्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली, अमेरिकेबाबत आली वाईट बातमी
13
पाकिस्तानला पुन्हा एकदा दिसणार भारतीय हवाई दलाची ताकद! सरावासाठी नोटम जारी
14
अमेरिका-चीनचं भांडण भारताच्या उंबरठ्यापर्यंत; जपान-जर्मनीही त्रस्त, कंपन्यांना टाळं ठोकण्याची वेळ
15
हा व्यक्ती आमिर खानला काही मिनिटांमध्ये करू शकतो कंगाल, कोण आहे तो व्यक्ती?
16
Share Market Today: ३ दिवसांनंतर शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १२१ अंकांनी वधारला, या स्टॉक्समध्ये तेजी
17
Sana Yousaf : "फ्रेंडशिप, रिजेक्शन आणि मर्डर कनेक्शन"; पाकिस्तानी टिकटॉकर सना युसूफची का झाली हत्या?
18
घणसोली बस आगारात अग्नितांडव; नवी मुंबई पालिकेच्या तीन बस जळून खाक, आगीचे कारण अस्पष्ट
19
"आई, हे मला जंगलात..."; हनिमूनला बेपत्ता झालेल्या कपलचा शेवटचा कॉल, सासूला काय सांगितलं?
20
कोण आहे देशातील सर्वात महागडं घर खरेदी करणारी महिला? ६३९ कोटी किंमत; ६४ कोटींची स्टँप ड्युटीच भरली

नाशिकरोडला भाजपविरुद्ध महाविकासची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:12 IST

नाशिकरोड : नाशिकरोड प्रभाग समिती सभापती निवडणुकीत भाजप व शिवसेना, राष्ट्रवादी मिळून समसमान सदस्य असल्याने चिठ्ठी पद्धतीने निवड निश्चित ...

नाशिकरोड : नाशिकरोड प्रभाग समिती सभापती निवडणुकीत भाजप व शिवसेना, राष्ट्रवादी मिळून समसमान सदस्य असल्याने चिठ्ठी पद्धतीने निवड निश्चित केल्यास ज्यांचे नशीब साथ देईल त्या पक्षाचा सभापती होईल, अशी चिन्हे आहेत. नाशिकरोड प्रभाग समितीमध्ये २३ सदस्य होते. त्यामध्ये भाजपचे १२ व शिवसेनेचे ११ सदस्य होते. दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या नगरसेविका सरोज अहिरे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवून त्या आमदार झाल्या. अहिरे यांनी राजीनामा दिल्याने प्रभाग २२ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जगदीश पवार निवडून आले. पहिले तीन वर्ष भाजपचे सुमन सातभाई, पंडित आवारे, विशाल संगमनेरे हे सभापती राहिले होते. मात्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांची युती होऊन राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे गेल्या प्रभाग सभापती निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी यांची युती झाल्याने त्यांचे संख्याबळ १२ होऊन बहुमत झाल्याने शिवसेनेच्या जयश्री खर्जुल या सभापतिपदी विराजमान झाल्या, तर भाजपच्या मीराबाई हांडगे यांचा पराभव झाला.

नाशिकरोड प्रभाग सभापतिपदासाठी शिवसेनेकडून नगरसेवक प्रशांत दिवे व भाजपकडून नगरसेविका सुमन सातभाई व मीराबाई हांडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सातभाई या यापूर्वी सभापती होऊन गेल्या असून, माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या गटाच्या म्हणून ओळखल्या जातात, तर मीराबाई हांडगे या विद्यमान आमदार राहुल ढिकले यांच्या गटाच्या ओळखल्या जातात. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर येणार असून, त्यावेळी उमेदवार निश्चित होणार आहे. पंचवटी प्रभाग समितीमध्ये कोणत्या गटाचे भाजपचे सभापती होतात त्यावर नाशिकरोडची भाजपची उमेदवारी निश्चित होईल, असे सध्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जगदीश पवार यांनी सभापतिपदासाठी दावा केला होता; मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज न भरल्यामुळे राष्ट्रवादीचा सभापतिपदावरील दावा संपुष्टात आला आहे. राज्यात आघाडी सरकार असून, शिवसेना व राष्ट्रवादी यांची युती होईल अशी अपेक्षा आहे. तसेच दिवे व पवार त्यांचे मामा-भाचे नाते आहे. शिवसेनेकडून एकच उमेदवार असून, भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळाली तरी ज्याचे नशीब बलवत्तर तो सभापतिपदी विराजमान होईल, असे सध्याचे चित्र आहे. तसेच चिठ्ठी काढताना ऐनवेळी कुठला नियम लावला जातो तेदेखील महत्त्वाचे आहे.