शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

नाशिकमध्ये लवकरच महाउद्योग गुंतवणूक करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:11 IST

नाशिक - गेल्या पंधरा ते वीस वर्षात नाव घ्यावा असा मोठा उद्योग नाशिकमध्ये आला नसला तरी आता ...

नाशिक - गेल्या पंधरा ते वीस वर्षात नाव घ्यावा असा मोठा उद्योग

नाशिकमध्ये आला नसला तरी आता ही प्रतीक्षा संपण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्याच्या उद्योग क्षेत्राला कलाटणी देऊ शकेल अशा एका मोठ्या उद्योगाची

गुंतवणूक नाशिक जिल्ह्यात होणे जवळपास निश्चित झाले आहे. दिंडोरी

तालुक्यातील तळेगाव -अक्राळे येथे हा प्रकल्प होेणार आहे. त्यामुळे

नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राला चालना मिळू शकेल असा विश्वास महाराष्ट्र

औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी व्यक्त

केला आहे.

लोकमतच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने अंबड येथील मुख्य

कार्यालयात आयोजित लोकमत संवाद कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली.

लोकमतचे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी आणि सहायक उपाध्यक्ष

बी.बी.चांडक यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी गवळी यांनी नाशिकच्या

औद्योगिक क्षेत्राची बलस्थाने सांगताना कृषी सधन जिल्हा असल्याने कृषी

आधारित प्रक्रिया उद्योगांना अधिक संधी असल्याचे सांगितले.

नाशिक शहरात सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहत प्रामुख्याने आहे. याठिकाणी

महिंद्रा तसेच बॉश सारख्या कारखान्यांनी नाशिकचे अर्थकारण बदलून टाकले.

असेच मोठे उद्योग नाशिकला यावेत यासाठी प्रयत्न असतात. स्थानिक उद्योजक

आणि नागरिकांनी तशी मागणी वेळोवेळी केली असली तरी गेल्या पंधरा ते वीस

वर्षात असा उद्योग येऊ शकला नाही. परंतु आता दिंडोरी तालुक्यातील तळेगाव

अक्राळे येथे असा प्रकल्प होणे जवळपास निश्चित झाले आहे. सुमारे दीडशे

एकर क्षेत्रात हा प्रकल्प असू शकेल,त्यामुळे अर्थकारण वाढेल आणि

रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतील असे सांगून नितीन गवळी यांनी तळेगाव

- अक्राळे येथील औद्योगिक वसाहतीचे महत्त्वही त्यामुळे वाढेल असे सांगितले. दिंडोरी येथील

अक्राळे औद्योगिक वसाहत फार दूर नाही.

उद्योजकांच्या मागणीनुसार या वसाहतीचे दर कमी केले परंतु अपेक्षित

प्रतिसाद मिळालेला नाही. वास्तविक, सातपूर- अंबड औद्योगिक वसाहतीतील ज्या

उद्योजकांना विस्तार करायचा आहे, त्यांना परवडतील अशा दरात त्याठिकाणी

भूखंड उपलब्ध आहेत. आतापर्यंत या वसाहतीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला

नसला तरी यापुढे मात्र निश्चित मिळेल असा विश्वासही गवळी यांनी व्यक्त

केला.

.....इन्फो...

राजूर बहुला येथेही एमआयडीसी

नाशिक शहरालगत मुंबई आग्रा महामार्गावर राजूर बहुला येथे सुमारे अडीचशे

एकर क्षेत्रात एमआयडीसी होत आहे. मालेगाव येथेही साडे तीनशे एकर

क्षेत्रात वसाहत प्रस्तावित आहे. उद्योगांसाठी उपलब्ध जागा संपली

की,नवीन औद्योगिक क्षेत्राचा विचार सुरू होतो. त्यामुळे लवकरच या नवीन

जागी उद्योग साकारतील असे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी सांगितले.

इन्फो...

गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातही लॉकडाऊन

होते. मात्र, मे महिन्यात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाले आणि सातपूर तसेच

अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योग चक्र सुरू झाले. नाशिकच्या उद्योग

क्षेत्रात परप्रांतीय कामगारांची संख्या कमी असल्याने कोणी कामगार बाहेर

गेले नाही की उद्योग क्षेत्रावर त्याचा प्रतिकूल परिणाम देखील झाला नाही,

असे स्पष्ट करून नितीन गवळी यांनी कोरोना काळात निर्बंध शिथिल झाल्यानंतर

मुंबई पुण्याच्या तुलनेत नाशिकमधील सत्तर टक्के उद्योग सुरू झाले होते.

अर्थात, उत्पादनाला अपेक्षित मागणी नसल्याने अडचण झाली असेही ते म्हणाले.

--------

प्रशांत खरोटे यांनी फोटो काल डेस्कॅनवर सेव्ह केलेले आहे.