शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्टÑ पाणीदार होण्याचे स्वप्न पूर्णत्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 01:27 IST

कोनांबे : पानी फाउण्डेशनच्या कामामुळे पाण्याच्या दुष्काळाबरोबर ग्रामीण जनतेच्या डोळ्यातील पाणी दिसले. संपूर्ण महाराष्ट्र पाणीदार होण्याचे स्वप्न पूर्णत्वाकडे जात असल्याचे प्रतिपादन पानी फाउण्डेशनच्या किरण राव यांनी केले.

ठळक मुद्देकिरण राव : कोनांबेत महाराष्टÑदिनी घेतली राज्यातील श्रमदात्यांची भेटसिन्नर तालुक्यातील कोनांबे येथे सुरू असलेल्या पानी फाउण्डेशनच्या कामावर महाराष्ट्रदिनी महाश्रमदान

कोनांबे : पानी फाउण्डेशनच्या कामामुळे पाण्याच्या दुष्काळाबरोबर ग्रामीण जनतेच्या डोळ्यातील पाणी दिसले. संपूर्ण महाराष्ट्र पाणीदार होण्याचे स्वप्न पूर्णत्वाकडे जात असल्याचे प्रतिपादन पानी फाउण्डेशनच्या किरण राव यांनी केले.सिन्नर तालुक्यातील कोनांबे येथे सुरू असलेल्या पानी फाउण्डेशनच्या कामावर महाराष्ट्रदिनी महाश्रमदान करण्यासाठी आलेल्या श्रमिकांच्या व जलमित्रांच्या भेटीला राव आल्या असता त्यांनी जलमित्रांचे काम बघून कौतुक करत विश्वास व्यक्त केला. पहाटे साडेसहा वाजेच्या दरम्यान किरण राव यांचे सत्यजित भटकळ यांच्या बरोबर कोनांबेच्या माळरानावर आगमन झाले. यावेळी त्यांच्या बरोबर अभिनेत्री अनिता दाते, मिस इंडिया शिल्पी अवस्ती उपस्थित होत्या. यावेळी कोनांबे येथील महिला व विद्यार्थिनींनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. विविध भागातून आलेल्या श्रमजीवींचेही ग्रामस्थांनी तिलक लाऊन स्वागत केले. यावेळी नावनोंदणीनंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. उपस्थित सेलिब्रिटींनी श्रमदान करत सहभागी श्रमजीवी तसेच जलमित्रांबरोबर फोटो काढत उपस्थितांचा उत्साह वाढवला. यावेळी पानी फाउण्डेशनचे भटकळ, तहसीलदार नितीन गवळी, गटविकास अधिकारी निकम, सरपंच संजय डावरे आदींनी पाणी बचतीबाबत मार्गदर्शन केले. कोनांबेवासीयांनी केलेल्या व्यवस्थेबाबत उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.तीव्र उन्हाच्या झळा सोसत श्रमजीवी व जलमित्रांबरोबर उपस्थिती सेलिब्रिटींनीही सुमारे तीन तास श्रमदान केले. आज झालेल्या श्रमदानातून कोनांबे शिवारात सुमारे अकरा लाख लिटर पाण्याची भूजल पातळीत साठवण होईल एवढे काम झाल्याचे फाउण्डेशनचे सदस्य व जलमित्र बापू डावरे व साहेबराव डावरे यांनी सांगितले.दुष्काळाचा निपटारा करण्यासाठी सुरू झालेल्या या चळवळीत ग्रामीण भागातील लोकांच्या बरोबरीने शहरातील लोकांचा श्रमदानासाठी वाढता ओघ बघून खरोखरच थोड्याच दिवसात महाराष्ट्र पाणीदार होण्याच्या दिशेने ही चळवळ पाऊल टाकत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘सत्यमेव जयते’च्या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृती व जनतेच्या विविध समस्या जवळून बघता आल्या. नैसर्गिक पाण्याबरोबर जनतेच्या डोळ्यातील पाणी पुसण्याचा प्रयत्न करण्याची संधी माझ्या हाताला मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजते अशी कृतज्ञता राव यांनी जनतेशी संवाद साधतांना व्यक्त केली.