शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

महाराष्टÑ पाणीदार होण्याचे स्वप्न पूर्णत्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 01:27 IST

कोनांबे : पानी फाउण्डेशनच्या कामामुळे पाण्याच्या दुष्काळाबरोबर ग्रामीण जनतेच्या डोळ्यातील पाणी दिसले. संपूर्ण महाराष्ट्र पाणीदार होण्याचे स्वप्न पूर्णत्वाकडे जात असल्याचे प्रतिपादन पानी फाउण्डेशनच्या किरण राव यांनी केले.

ठळक मुद्देकिरण राव : कोनांबेत महाराष्टÑदिनी घेतली राज्यातील श्रमदात्यांची भेटसिन्नर तालुक्यातील कोनांबे येथे सुरू असलेल्या पानी फाउण्डेशनच्या कामावर महाराष्ट्रदिनी महाश्रमदान

कोनांबे : पानी फाउण्डेशनच्या कामामुळे पाण्याच्या दुष्काळाबरोबर ग्रामीण जनतेच्या डोळ्यातील पाणी दिसले. संपूर्ण महाराष्ट्र पाणीदार होण्याचे स्वप्न पूर्णत्वाकडे जात असल्याचे प्रतिपादन पानी फाउण्डेशनच्या किरण राव यांनी केले.सिन्नर तालुक्यातील कोनांबे येथे सुरू असलेल्या पानी फाउण्डेशनच्या कामावर महाराष्ट्रदिनी महाश्रमदान करण्यासाठी आलेल्या श्रमिकांच्या व जलमित्रांच्या भेटीला राव आल्या असता त्यांनी जलमित्रांचे काम बघून कौतुक करत विश्वास व्यक्त केला. पहाटे साडेसहा वाजेच्या दरम्यान किरण राव यांचे सत्यजित भटकळ यांच्या बरोबर कोनांबेच्या माळरानावर आगमन झाले. यावेळी त्यांच्या बरोबर अभिनेत्री अनिता दाते, मिस इंडिया शिल्पी अवस्ती उपस्थित होत्या. यावेळी कोनांबे येथील महिला व विद्यार्थिनींनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. विविध भागातून आलेल्या श्रमजीवींचेही ग्रामस्थांनी तिलक लाऊन स्वागत केले. यावेळी नावनोंदणीनंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. उपस्थित सेलिब्रिटींनी श्रमदान करत सहभागी श्रमजीवी तसेच जलमित्रांबरोबर फोटो काढत उपस्थितांचा उत्साह वाढवला. यावेळी पानी फाउण्डेशनचे भटकळ, तहसीलदार नितीन गवळी, गटविकास अधिकारी निकम, सरपंच संजय डावरे आदींनी पाणी बचतीबाबत मार्गदर्शन केले. कोनांबेवासीयांनी केलेल्या व्यवस्थेबाबत उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.तीव्र उन्हाच्या झळा सोसत श्रमजीवी व जलमित्रांबरोबर उपस्थिती सेलिब्रिटींनीही सुमारे तीन तास श्रमदान केले. आज झालेल्या श्रमदानातून कोनांबे शिवारात सुमारे अकरा लाख लिटर पाण्याची भूजल पातळीत साठवण होईल एवढे काम झाल्याचे फाउण्डेशनचे सदस्य व जलमित्र बापू डावरे व साहेबराव डावरे यांनी सांगितले.दुष्काळाचा निपटारा करण्यासाठी सुरू झालेल्या या चळवळीत ग्रामीण भागातील लोकांच्या बरोबरीने शहरातील लोकांचा श्रमदानासाठी वाढता ओघ बघून खरोखरच थोड्याच दिवसात महाराष्ट्र पाणीदार होण्याच्या दिशेने ही चळवळ पाऊल टाकत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘सत्यमेव जयते’च्या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृती व जनतेच्या विविध समस्या जवळून बघता आल्या. नैसर्गिक पाण्याबरोबर जनतेच्या डोळ्यातील पाणी पुसण्याचा प्रयत्न करण्याची संधी माझ्या हाताला मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजते अशी कृतज्ञता राव यांनी जनतेशी संवाद साधतांना व्यक्त केली.