शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
2
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
3
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
4
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
5
समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले...
6
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
7
८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा
8
भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की
9
जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC
10
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
11
मोठ्या पडद्यावर फ्लॉप पण बिझनेसमध्ये केली कमाल, चालवतोय १०००० कोटींची कंपनी; कमाईच्या बाबतीत अनेकांना टाकलं मागे
12
ट्रम्पसमोर नेतन्याहूंनी फोनवर कुणाची माफी मागितली? इस्रायल-गाझा युद्ध थांबवण्यात महत्वाची भूमिका
13
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
14
सारा तेंडुलकर जेव्हा पापाराझी समोर मराठीत बोलते...; Viral Video पाहून नेटकरीही पडले प्रेमात
15
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
16
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
18
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
19
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
20
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर

महाराष्टÑ पाणीदार होण्याचे स्वप्न पूर्णत्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 01:27 IST

कोनांबे : पानी फाउण्डेशनच्या कामामुळे पाण्याच्या दुष्काळाबरोबर ग्रामीण जनतेच्या डोळ्यातील पाणी दिसले. संपूर्ण महाराष्ट्र पाणीदार होण्याचे स्वप्न पूर्णत्वाकडे जात असल्याचे प्रतिपादन पानी फाउण्डेशनच्या किरण राव यांनी केले.

ठळक मुद्देकिरण राव : कोनांबेत महाराष्टÑदिनी घेतली राज्यातील श्रमदात्यांची भेटसिन्नर तालुक्यातील कोनांबे येथे सुरू असलेल्या पानी फाउण्डेशनच्या कामावर महाराष्ट्रदिनी महाश्रमदान

कोनांबे : पानी फाउण्डेशनच्या कामामुळे पाण्याच्या दुष्काळाबरोबर ग्रामीण जनतेच्या डोळ्यातील पाणी दिसले. संपूर्ण महाराष्ट्र पाणीदार होण्याचे स्वप्न पूर्णत्वाकडे जात असल्याचे प्रतिपादन पानी फाउण्डेशनच्या किरण राव यांनी केले.सिन्नर तालुक्यातील कोनांबे येथे सुरू असलेल्या पानी फाउण्डेशनच्या कामावर महाराष्ट्रदिनी महाश्रमदान करण्यासाठी आलेल्या श्रमिकांच्या व जलमित्रांच्या भेटीला राव आल्या असता त्यांनी जलमित्रांचे काम बघून कौतुक करत विश्वास व्यक्त केला. पहाटे साडेसहा वाजेच्या दरम्यान किरण राव यांचे सत्यजित भटकळ यांच्या बरोबर कोनांबेच्या माळरानावर आगमन झाले. यावेळी त्यांच्या बरोबर अभिनेत्री अनिता दाते, मिस इंडिया शिल्पी अवस्ती उपस्थित होत्या. यावेळी कोनांबे येथील महिला व विद्यार्थिनींनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. विविध भागातून आलेल्या श्रमजीवींचेही ग्रामस्थांनी तिलक लाऊन स्वागत केले. यावेळी नावनोंदणीनंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. उपस्थित सेलिब्रिटींनी श्रमदान करत सहभागी श्रमजीवी तसेच जलमित्रांबरोबर फोटो काढत उपस्थितांचा उत्साह वाढवला. यावेळी पानी फाउण्डेशनचे भटकळ, तहसीलदार नितीन गवळी, गटविकास अधिकारी निकम, सरपंच संजय डावरे आदींनी पाणी बचतीबाबत मार्गदर्शन केले. कोनांबेवासीयांनी केलेल्या व्यवस्थेबाबत उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.तीव्र उन्हाच्या झळा सोसत श्रमजीवी व जलमित्रांबरोबर उपस्थिती सेलिब्रिटींनीही सुमारे तीन तास श्रमदान केले. आज झालेल्या श्रमदानातून कोनांबे शिवारात सुमारे अकरा लाख लिटर पाण्याची भूजल पातळीत साठवण होईल एवढे काम झाल्याचे फाउण्डेशनचे सदस्य व जलमित्र बापू डावरे व साहेबराव डावरे यांनी सांगितले.दुष्काळाचा निपटारा करण्यासाठी सुरू झालेल्या या चळवळीत ग्रामीण भागातील लोकांच्या बरोबरीने शहरातील लोकांचा श्रमदानासाठी वाढता ओघ बघून खरोखरच थोड्याच दिवसात महाराष्ट्र पाणीदार होण्याच्या दिशेने ही चळवळ पाऊल टाकत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘सत्यमेव जयते’च्या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृती व जनतेच्या विविध समस्या जवळून बघता आल्या. नैसर्गिक पाण्याबरोबर जनतेच्या डोळ्यातील पाणी पुसण्याचा प्रयत्न करण्याची संधी माझ्या हाताला मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजते अशी कृतज्ञता राव यांनी जनतेशी संवाद साधतांना व्यक्त केली.