शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

महाराष्ट्राला संत संस्कारांची गरज

By admin | Updated: April 9, 2015 00:15 IST

रामकृष्ण लहवितकर : एन. एम. आव्हाड अभीष्टचिंतन व पुस्तक प्रकाशन सोहळा

 नाशिक : वाढलेला भ्रष्टाचार व व्यभिचार रोखण्यासाठी देशाला विशेषत: महाराष्ट्राला संत संस्कारांची गरज आहे. त्यासाठी सकस संत साहित्याची निर्मिती ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आचार्य डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी केले. सावरकरनगर येथील मते नर्सरी येथे ज्येष्ठ नेते एन. एम. आव्हाड यांचा अभीष्टचिंतन सोहळा व ‘चेतन चिंतामणीचा ठाव’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना डॉ. लहवितकर म्हणाले की, त्याकाळी संत साहित्याच्या माध्यमातून समाजाला विचार दिला. नंतरच्या काळात यामध्ये खंड पडल्याने भ्रष्टाचार, व्यभिचार वाढला आहे. त्यामुळे अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालून संत साहित्याची निर्मिती व्हायला हवी. एन. एम. आव्हाड यांच्या पुस्तकात अध्यात्म आणि विज्ञान यांची उत्तम सांगड घातली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी व्यासपीठावर वनाधिपती विनायकदादा पाटील, आमदार राजाभाऊ वाजे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार माणिकराव कोकाटे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शांताराम बनकर आदि उपस्थित होते. दरम्यान, यावेळी एन. एम. आव्हाड यांचा सपत्निक अभीष्टचिंतन सोहळा पार पडला. यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार आदि क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)