शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

महाभारताचे झाले दैवीकरण

By admin | Updated: July 17, 2017 00:15 IST

नाशिक : रामायण-महाभारत पुराण किंवा महापुराण नसून उत्तम दर्जाचे ऐतिहासिक असे महाकाव्य आहे. हिंदू समाजापुढे कीर्तनकार व प्रवचनकारांनी या महाकाव्यामधील इतिहासाला कमी महत्त्व देत दैवीकरण केले

विवेक घळसासी : हिरे स्मृती व्याख्यानमालेचा समारोपलोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : रामायण-महाभारत पुराण किंवा महापुराण नसून उत्तम दर्जाचे ऐतिहासिक असे महाकाव्य आहे. मात्र दुर्दैवाने हिंदू समाजापुढे कीर्तनकार व प्रवचनकारांनी या महाकाव्यामधील इतिहासाला कमी महत्त्व देत दैवीकरण केले, अशी खंत विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी व्यक्त केली. ग्रामोदय शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित पोपटराव हिरे स्मृती व्याख्यानमालेचे अंतिम पुष्प घळसासी यांनी रविवारी (दि.१६) गुंफले. रावसाहेब थोरात सभागृहात सुरू असलेल्या तीनदिवसीय व्याख्यानमालेचा समारोप झाला. यावेळी घळसासी यांनी ‘महाभारत : इतिहास की महाकाव्य’ या विषयावर बोलताना सांगितले की, रामायण, महाभारत यांसारख्या महाकाव्यांवर या देशात मालिका दाखविल्या गेल्या. या मालिका केवळ हिंदू वसाहतींमध्ये अथवा भारतातच श्रद्धेने बघितल्या गेल्या, असे मुळीच नाही तर बिगर हिंदू वसाहतींसह बांगलादेश, पाकिस्तानमध्येही या मालिकांनी गारुड केले; मात्र मालिकांमधून या महाकाव्यांचा मनोरंजनाचा प्रयत्न अधिक झाला हे दुर्दैव आहे. दुरदर्शनवरील महाभारताच्या मालिका बघून प्रेक्षकांच्या मनावर तातकालीन परिणाम झाला होता. त्यानंतर मात्र याव्दारे झालेले प्रबोधन प्रेक्षक विसरूनच गेले असेही त्यांनी सांगितले.प्रवचनकार व कीर्तनकारांनी या ऐतिहासिक महाकाव्याचे दैवीकरण करण्यावर अधिक भर दिल्याने त्याचा परिणाम समाजावर अत्यंत वाईट स्वरूपात झाला. यामुळे हिंदू समाजाच्या चेतना पूर्णपणे थंड झाल्या आणि कीर्तनकारांचे कीर्तन रंगले, प्रवचन खुलले आणि महाकाव्यामधील इतिहास मात्र गुदमरला याचा खेद वाटतो. परमेश्वरापेक्षा बिदागीवर लक्ष ठेवून परमार्थाचे धडे देणे म्हणजे एकप्रकारे व्यवसायच आहे.  धार्मिक क्षेत्रात काम करताना बिदागीला कमी आणि परमेश्वराला अधिक महत्त्व दिले गेले पाहिजे; मात्र दुर्दैवाने तसे होताना अद्यापही दिसत नाही, असे घळसासी म्हणाले. यावेळी माजी आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सीमा हिरे, विजय कदम, राजेंद्र कलाल, प्रा. यशवंत पाटील, दौलतराव घुमरे, शिवाजी गांगुर्डे, योगेश हिरे आदी मान्यवर उपस्थित होते.