शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीनशे शिक्षकांच्या नोकरीवर ‘गदा’

By admin | Updated: September 23, 2015 22:59 IST

आता शिक्षकांनाही द्यावी लागणार ‘सीईटी’

नाशिक : राज्य शासनाने २०१२ नंतर खासगी व्यवस्थापनावरील कोणत्याही शिक्षकांना भरती करण्यास बंदी घातली होती; मात्र या बंदीनंतरच्या काळातही ‘मान्यतेच्या’ पळवाटा काढून भरती करण्यात आलेल्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीवर गंडांतर येण्याची चिन्हे आहे. शासनाने यासंदर्भात राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांकडून २०१२ नंतर मान्यता दिलेल्या शिक्षकांची माहिती मागविल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यापुढे शासकीय किंवा खसगी व्यवस्थापनावरील शिक्षकांची भरती करताना सर्वच शिक्षकांना भरतीपूर्व केंद्रीय निवड परीक्षा (सीईटी) द्यावी लागणार आहे.दरम्यान, जिल्ह्णातील २०१२ नंतर भरती करण्यात आलेल्या सुमारे ८० अधिक प्राथमिक तर माध्यमिकचे सुमारे २४५ शिक्षकांच्या नोकऱ्यांवर त्यामुळे गंडांतर येण्याची चिन्हे असून या शिक्षकांची आस्थापना त्यामुळे धोक्यात आली आहे.जिल्ह्णात प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत २०१२ नंतर सुमारे ३९ शिक्षकांना नियुक्ती पत्र देण्यात आले असून यापैकी काही शिक्षकांना त्यांची आस्थापना असलेल्या संबंधित संस्थांकडून २०१२ पूर्वीच नियुक्तीचे आदेश देण्यात आल्याचे समजते; मात्र २०१२ नंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत या ३९ शिक्षकांना मान्यता आदेश देण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. २०१२ नंतर नाशिक व मालेगाव महापालिका हद्दीच्या क्षेत्रातील सुमारे ४२ ते ४३ शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्याचे समजते. तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत सुमारे २४५ शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्याची चर्चा आहे. प्रत्यक्षात राज्य शासनाने २०१२ नंतर भरती करण्यात आलेल्या सर्वच शिक्षकांची माहिती मागविली आहे. बंदी नंतरही भरती करण्यात आलेल्या अशा प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या नियुक्त्या त्यामुळे संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. या शिक्षकांच्या नोकऱ्यांवर त्यामुळे गंडांतर येण्याची शक्यता आहे. २१ आॅगस्ट २०१५ च्या शालेय शिक्षणाच्या परिपत्रकानुसार यापुढे राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांतील सर्व शिक्षकांच्या रिक्त जागा भरतीपूर्व केंद्रीय निवड परीक्षा (सीईटी परीक्षा) मार्फत भरण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी के. आर. ए. ए. कृती कार्यक्रम निश्चित केला आहे. ही भरती करताना जाहिरातीद्वारे आॅनलाइन अर्ज मागविण्यात येणार आहे. तसेच प्रश्नपत्रिका तयार करणे, लेखी परीक्षा घेणे, पेपर तपासणी, मुलाखती व निकाल जाहीर करणे असा भरतीसाठी कृती कार्यक्रम ठरवून दिला आहे. (प्रतिनिधी)