शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
3
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
4
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
5
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
6
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
7
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
8
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
9
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
10
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
11
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
12
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
13
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
14
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
15
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
16
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
17
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
18
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
19
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
20
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!

साडेतीनशे शिक्षकांच्या नोकरीवर ‘गदा’

By admin | Updated: September 23, 2015 22:59 IST

आता शिक्षकांनाही द्यावी लागणार ‘सीईटी’

नाशिक : राज्य शासनाने २०१२ नंतर खासगी व्यवस्थापनावरील कोणत्याही शिक्षकांना भरती करण्यास बंदी घातली होती; मात्र या बंदीनंतरच्या काळातही ‘मान्यतेच्या’ पळवाटा काढून भरती करण्यात आलेल्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीवर गंडांतर येण्याची चिन्हे आहे. शासनाने यासंदर्भात राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांकडून २०१२ नंतर मान्यता दिलेल्या शिक्षकांची माहिती मागविल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यापुढे शासकीय किंवा खसगी व्यवस्थापनावरील शिक्षकांची भरती करताना सर्वच शिक्षकांना भरतीपूर्व केंद्रीय निवड परीक्षा (सीईटी) द्यावी लागणार आहे.दरम्यान, जिल्ह्णातील २०१२ नंतर भरती करण्यात आलेल्या सुमारे ८० अधिक प्राथमिक तर माध्यमिकचे सुमारे २४५ शिक्षकांच्या नोकऱ्यांवर त्यामुळे गंडांतर येण्याची चिन्हे असून या शिक्षकांची आस्थापना त्यामुळे धोक्यात आली आहे.जिल्ह्णात प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत २०१२ नंतर सुमारे ३९ शिक्षकांना नियुक्ती पत्र देण्यात आले असून यापैकी काही शिक्षकांना त्यांची आस्थापना असलेल्या संबंधित संस्थांकडून २०१२ पूर्वीच नियुक्तीचे आदेश देण्यात आल्याचे समजते; मात्र २०१२ नंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत या ३९ शिक्षकांना मान्यता आदेश देण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. २०१२ नंतर नाशिक व मालेगाव महापालिका हद्दीच्या क्षेत्रातील सुमारे ४२ ते ४३ शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्याचे समजते. तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत सुमारे २४५ शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्याची चर्चा आहे. प्रत्यक्षात राज्य शासनाने २०१२ नंतर भरती करण्यात आलेल्या सर्वच शिक्षकांची माहिती मागविली आहे. बंदी नंतरही भरती करण्यात आलेल्या अशा प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या नियुक्त्या त्यामुळे संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. या शिक्षकांच्या नोकऱ्यांवर त्यामुळे गंडांतर येण्याची शक्यता आहे. २१ आॅगस्ट २०१५ च्या शालेय शिक्षणाच्या परिपत्रकानुसार यापुढे राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांतील सर्व शिक्षकांच्या रिक्त जागा भरतीपूर्व केंद्रीय निवड परीक्षा (सीईटी परीक्षा) मार्फत भरण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी के. आर. ए. ए. कृती कार्यक्रम निश्चित केला आहे. ही भरती करताना जाहिरातीद्वारे आॅनलाइन अर्ज मागविण्यात येणार आहे. तसेच प्रश्नपत्रिका तयार करणे, लेखी परीक्षा घेणे, पेपर तपासणी, मुलाखती व निकाल जाहीर करणे असा भरतीसाठी कृती कार्यक्रम ठरवून दिला आहे. (प्रतिनिधी)