शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

इंदिरानगर परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा

By admin | Updated: October 17, 2016 00:39 IST

विस्कळीत नियोजन : नागरिकांमध्ये नाराजी

इंदिरानगर : गेल्या काही दिवसांपासून इंदिरानगर परिसरात अवेळी आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहरात पाणीपुरवठ्याच्या नियोजनानुसार पुरवठा होत असताना इंदिरानगरला मात्र पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पाळले जात नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.इंदिरानगर येथे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मध्यंतरी शहरात एकवेळ पाणीपुरवठा केला जात असताना नागरिकांना पुरेसे पाणी मिळत होते. परंतु आता नव्याने पाणीपुरवठ्याचे नियोजन केले असतानाही पाणी मिळत नसल्याने पालिकेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.येथे गेल्या दहा दिवसांपासून श्रीकृष्ण कॉलनी, जाखडीनगर, गणेशनगर, महारुद्र कॉलनी, अरुणोदय सोसायटी, जिल्हा परिषद कॉलनी, मोदकेश्वर कॉलनी, सिद्धी विनायक सोसायटी, शास्त्रीनगर या परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. परिसरात केवळ अर्धा तासच तेही कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.सणासुदीचा काळ असतानाही अचानक अघोषित पाणी कपात करण्यात आलीच कशी असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाकडून कोणतेही कारण दिले जात नसल्यामुळे नागरिकांच्या संतापात अधिकच भर पडली आहे. याप्रकरणी आयुक्तांनी लक्ष घालावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.