शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
4
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
5
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
6
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
7
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
8
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
9
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
10
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
11
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
12
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
13
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
14
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
15
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
16
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
17
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
18
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
19
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
20
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?

हजारो लिटर पाण्याची नासाडी

By admin | Updated: July 5, 2014 00:25 IST

हजारो लिटर पाण्याची नासाडी

मालेगाव : पुरेशा पर्जन्यमानाअभावी मालेगावसह संपूर्ण राज्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवत असताना मालेगाव शहरात मात्र काही ठिकाणी जलकुंभ ओसंडून वाहत आहेत, तर काही ठिकाणी जलवाहिनींच्या गळतीद्वारे रोज हजारो लिटर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे.मालेगाव मनपा पाणीपुरवठा विभागातर्फे गेल्या काही वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. मात्र हा पाणीपुरवठा शहरातील सर्वच विभागात समान पद्धतीने होत नाही. हद्दवाढीनंतर तर शहरात समाविष्ट भाग व पूर्वीच्या शहराच्या टोकाकडील भाग हे अद्याप पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहत आहेत. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे मनपा पाणीपुरवठा व मजीप्राच्या संबंधित अधिकारी व कर्मचार वर्गाच्या हलगर्जीपणामुळे बाराही महिने येथे कुठे ना कुठे सतत पिण्याच्या हजारो लिटर पाण्याची रोज नासाडी होत असते. त्यात प्रामुख्याने गिरणा धरण, तळवाडे साठवण तलाव येथील जलवाहिनी व शहरांतर्गत ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या जलकुंभातून होणाऱ्या गळतीचा समावेश आहे. घरगुती व सार्वजनिक नळाद्वारे होणारी गळती तसेच मनपा जलकुंभातून होणारी पाणीचोरी ही वेगळीच आहे. साधारण दोन महिन्यांपूर्वीच येथील कॅम्प रस्त्यावर अपर पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थाना-जवळ जलवाहिनीचा जोड तुुटल्याने त्यातून आठ ते दहा फूट उंच उसळी घेत तब्बल चार तास हजारो लिटर पाणी वाया गेले. त्याआधी कॅम्प टीव्ही सेंटरलगतच्या जलकुंभाच्या निकृष्ट कामामुळे या जलकुंभातूनही हजारो लिटर पाणी वाया गेले. जुना आग्रारोड, दरेगाव चौफुली, दाभाडी शिवार येथूनही वाया जाणारे पाणी दृष्टीस पडणे हे नागरिकांच्या सवयीचे झाले आहे.दुसरीकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते दूरध्वनी वा भ्रमणध्वनी उचलत नाहीत. त्यामुळे मनपा व मजीप्राविषयी संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे शहराबरोबर तालुक्यातील खेडोपाडीची सर्वसामान्य जनता पाण्याच्या आसूसलेली असताना मालेगाव शहरात हजारो लिटर पाण्याची अशाप्रकारे होणारी नासाडी कितपत योग्य आहे, असा सवाल सर्वसामान्य मालेगावकरांकडून केला जात आहे.