शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

हजारो लिटर पाण्याची नासाडी

By admin | Updated: July 5, 2014 00:25 IST

हजारो लिटर पाण्याची नासाडी

मालेगाव : पुरेशा पर्जन्यमानाअभावी मालेगावसह संपूर्ण राज्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवत असताना मालेगाव शहरात मात्र काही ठिकाणी जलकुंभ ओसंडून वाहत आहेत, तर काही ठिकाणी जलवाहिनींच्या गळतीद्वारे रोज हजारो लिटर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे.मालेगाव मनपा पाणीपुरवठा विभागातर्फे गेल्या काही वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. मात्र हा पाणीपुरवठा शहरातील सर्वच विभागात समान पद्धतीने होत नाही. हद्दवाढीनंतर तर शहरात समाविष्ट भाग व पूर्वीच्या शहराच्या टोकाकडील भाग हे अद्याप पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहत आहेत. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे मनपा पाणीपुरवठा व मजीप्राच्या संबंधित अधिकारी व कर्मचार वर्गाच्या हलगर्जीपणामुळे बाराही महिने येथे कुठे ना कुठे सतत पिण्याच्या हजारो लिटर पाण्याची रोज नासाडी होत असते. त्यात प्रामुख्याने गिरणा धरण, तळवाडे साठवण तलाव येथील जलवाहिनी व शहरांतर्गत ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या जलकुंभातून होणाऱ्या गळतीचा समावेश आहे. घरगुती व सार्वजनिक नळाद्वारे होणारी गळती तसेच मनपा जलकुंभातून होणारी पाणीचोरी ही वेगळीच आहे. साधारण दोन महिन्यांपूर्वीच येथील कॅम्प रस्त्यावर अपर पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थाना-जवळ जलवाहिनीचा जोड तुुटल्याने त्यातून आठ ते दहा फूट उंच उसळी घेत तब्बल चार तास हजारो लिटर पाणी वाया गेले. त्याआधी कॅम्प टीव्ही सेंटरलगतच्या जलकुंभाच्या निकृष्ट कामामुळे या जलकुंभातूनही हजारो लिटर पाणी वाया गेले. जुना आग्रारोड, दरेगाव चौफुली, दाभाडी शिवार येथूनही वाया जाणारे पाणी दृष्टीस पडणे हे नागरिकांच्या सवयीचे झाले आहे.दुसरीकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते दूरध्वनी वा भ्रमणध्वनी उचलत नाहीत. त्यामुळे मनपा व मजीप्राविषयी संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे शहराबरोबर तालुक्यातील खेडोपाडीची सर्वसामान्य जनता पाण्याच्या आसूसलेली असताना मालेगाव शहरात हजारो लिटर पाण्याची अशाप्रकारे होणारी नासाडी कितपत योग्य आहे, असा सवाल सर्वसामान्य मालेगावकरांकडून केला जात आहे.