शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

नदीकाठालगत विक्रेत्यांची तारांबळ

By admin | Updated: August 1, 2016 01:11 IST

व्यवसाय ठप्प : नदीपात्रात पोहण्याचा लुटला आनंद

नाशिक : गोदावरी नदीपात्रात दोन टप्प्यांत धरणातून करण्यात आलेल्या अडीच हजार क्यूसेक पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरीला पूर आला होता. वीस दिवसांपूर्वी आलेल्या पुराच्या तुलनेत रविवारी (दि.३१) नदीपात्राच्या पाण्याची पातळी कमीच राहिल्याने कु ठल्याही प्रकारचे नुकसान झाले नाही.पावणे दहा वाजेच्या सुमारास अग्निशामक दलाचा पंचवटी केंद्राचा रेस्क्यू बंब घटनास्थळी रबर बोटीसह दाखल झाला. दरम्यान, तातडीने जवानांनी ध्वनिक्षेपकांवरून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत गोदाकाठापासून सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना देण्यास सुरुवात केली. देवमामलेदार मंदिराजवळील नागरिक, नीळकंठेश्वर मंदिर ते भांडीबाजारापर्यंतची दुकाने विक्रेत्यांनी तत्काळ बंद केली. तसेच भाजीबाजारामधील विक्रेत्यांनीदेखील पटांगण सोडून नारोशंकर मंदिराच्या रस्त्यालगत आश्रय घेतला. धरणातून आलेल्या पाण्यामुळे नदीकाठालगत विक्रेत्यांची तारांबळ उडाली. नदीवरील लहान पूल पाण्याखाली गेले होते. रोकडोबा मैदानापर्यंत पुराचे पाणी आले होते. नदीपात्रात दोन टप्प्यांमध्ये सोडण्यात आलेल्या पाण्याने लहान मंदिरे पाण्याखाली गेली होती. दुपारी दोन वाजेनंतर नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये अधिक वाढ झाल्याचे दिसून आले. जलसंपदा व पूर नियंत्रण विभागाने दिलेल्या माहितीनुसार अडीच वाजेपासून अहल्यादेवी होळकर पुलाखालून नदीपात्रात सुमारे अडीच हजार क्यूसेक पाणी प्रवाहित होत होते. वीस ते पंचवीस दिवसांपूर्वी आलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नदीपात्रात दुपारी अडीच वाजेपर्यंत साडेतीन हजार क्यूसेक पाणी पोहचले होते. त्यामुळे दोन वर्षांत प्रथमच नदी दुथडी भरून वाहिली. (प्रतिनिधी)