शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

शेतकऱ्यांची लूट सुरूच; नव्या दरानेच खत विक्री !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:14 IST

जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीला प्रारंभ झाला आहे. ट्रॅक्टर व बैलांच्या साहाय्याने शेतीची मशागत केली जात आहे. पेट्रोल व ...

जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीला प्रारंभ झाला आहे. ट्रॅक्टर व बैलांच्या साहाय्याने शेतीची मशागत केली जात आहे. पेट्रोल व डिझेलच्या दराने शंभरी पार केली आहे. मशागतीच्या वाढत्या खर्चापाठोपाठ आता रासायनिक खतांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. भविष्यात खतांची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी रासायनिक खते खरेदी करण्यास सुरुवात केली आहे; मात्र सहकारी रासायनिक खत उत्पादक कंपन्यांच्या तुलनेत खासगी कंपन्यांकडून नवे दर आकारले जात आहेत. केंद्र शासनाने शेतकरी हिताचा निर्णय घेतला असला तरी त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. राज्यातील शेतकऱ्यांनी कमी दराने रासायनिक खते उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली होती. भुसे यांनी शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत केंद्रीय कृषिमंत्री यांना पत्र लिहून खतांचे दर कमी करण्याची विनंती केली होती. तसेच माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रातील मंत्र्यांची भेट घेऊन मागणी लावून धरली होती. केंद्र शासनानेही शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत खतांच्या अनुदानात वाढ करून शेतकऱ्यांना अल्प किमतीत खते उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत ; मात्र या निर्देशाला खत उत्पादक कंपन्यांकडून व जिल्ह्यातील होलसेल विक्रेते व तालुकाभरातील कृषी सेवा केंद्रांवर हरताळ फासला जात आहे. सहकारी कंपन्यांच्या खतांच्या किमती जैसे थे असल्या तरी खासगी खत विक्रेता कंपन्यांनी अव्वाच्या सव्वा भाव लावला आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे. कृषी विभागाच्या भरारी पथकाने चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

हे घ्या पुरावे...

१) गेल्यावर्षी युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण झाली होती. शेतकऱ्यांना रासायनिक खतांसाठी धावाधाव करावी लागत होती. कृषिमंत्री दादा भुसे यांनी औरंगाबाद येथे धाड टाकून चढ्या दराने खत विक्री करणाऱ्या दुकानदाराचा पर्दाफाश केला होता. यावर्षीही अशी परिस्थिती उद्‌भवू नये म्हणून आढावा बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत चढ्या दराने खत विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे निर्देश कृषिमंत्री भुसे यांनी दिले आहेत.

२) जिल्ह्यातील रासायनिक खतांच्या खत विक्री करणाऱ्या कृषी सेवा विक्री केंद्रांवर दुकानातील साठा, खतांचे दर व इतर बाबी दुकानाच्या प्रवेशद्वारावर ठळक अक्षरात फलक लावणे गरजेचे असताना बहुतांशी केंद्रांवर अशा पद्धतीचे फलक दिसून येत नाही. परिणामी शेतकऱ्यांना रासायनिक खतांच्या खरेदीसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. जिल्ह्यातील दुकानदारांनी दरपत्रक लावणे बंधनकारक आहे.

३) यंदा हवामान खात्याने चांगला पाऊस होण्याचे भाकीत केले आहे. गेल्यावर्षीही समाधानकारक पाऊस झाल्याने खतांच्या मागणीत वाढ झाली होती. जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये मागणीपेक्षा पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. खतांचे नियतन नोंदविण्यात आले असून, बफर स्टॉक कशा पद्धतीने उपलब्ध होतो. यावर पुढील चित्र अवलंबून राहणार आहे.

कोट...

केंद्र शासनाने खतांच्या अनुदानात वाढ केली आहे. शेतकऱ्यांना जुन्या दरात रासायनिक खते उपलब्ध होणे गरजेचे आहे ; मात्र काही दुकानदारांकडून चढ्या दराने रासायनिक खतांची विक्री करून आर्थिक लूट केली जात आहे. खतांच्या किमतीवर नियंत्रण आणावे.

- चंद्रकांत शेवाळे, शेतकरी

कोट...

दोन वर्षांपासून निसर्गाने साथ दिली आहे; मात्र इंधनाचे व रासायनिक खतांचे वाढलेले दर, मजूर टंचाई, अवकाळी पाऊस, कोरोना महामारीमुळे शेतमालाचे घसरलेले दर यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहे. यातच रासायनिक खतांची दरवाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने कडक पावले उचलण्याची गरज आहे.

- विवेक देसले, शेतकरी

मालेगाव तालुक्याचे खरीप लागवड क्षेत्र - ८० हजार ८७५ हेक्टर क्षेत्र

===Photopath===

250521\131225nsk_5_25052021_13.jpg

===Caption===

मालेगाव येथील कृषी सेवा केंद्रावर रासायनिक खते खरेदी करताना शेतकरी.