शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

शहरात पुन्हा लॉकडाऊन शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:38 IST

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून, आता दिवसाकाठी ६० ते ७० जणांना कोरोना संसर्ग होत असल्याचे आढळत आहे. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतरच ही परिस्थिती उद््भवली आहे. त्यामुळे आता शहरात पुन्हा लॉकडाऊन करून निर्बंध वाढविण्याबाबत राज्य शासन निर्णय घेणार आहे. यासंदर्भात दोन दिवसांपासून शासनाकडून आढावा घेण्यात आला आहे.

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून, आता दिवसाकाठी ६० ते ७० जणांना कोरोना संसर्ग होत असल्याचे आढळत आहे. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतरच ही परिस्थिती उद््भवली आहे. त्यामुळे आता शहरात पुन्हा लॉकडाऊन करून निर्बंध वाढविण्याबाबत राज्य शासन निर्णय घेणार आहे. यासंदर्भात दोन दिवसांपासून शासनाकडून आढावा घेण्यात आला आहे. ताजी माहितीदेखील महापालिकेने शासनाला दिली आहे. त्यामुळे यासंदर्भात लवकरच शासन निर्णय घेऊ शकेल, अशी माहिती आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीदिली. शहरात कोरोनाबाधितांची संख्या अत्यंत झपाट्याने वाढत आहे. सुरुवातीला ४० ते ५० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येत होते. आता तर ५० ते ६० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. शहरात गेल्या ६ जूनपासून बाजारपेठा खुल्या करण्यास परवानगी दिल्यानंतर प्रचंड गर्दी होऊ लागली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला आणि दुसºयाच दिवशी शहरातील बाजारपेठांमध्ये दुकाने रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास सवलत दिली. त्यामुळे गर्दी कमी होईल ही अपेक्षा फोल ठरली आणि आणखी गर्दी वाढली.त्यातच आता शहरात रुग्णसंख्या प्रचंड वाढली असून, आठ जणांचा तर मृत्यू झाल्याने आता शहरात पुन्हा निर्बंध घालण्याची मागणी होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ‘लोकमत’शी बोलतानाही माहिती दिली.------------------४शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी त्यापेक्षा कोरोनामुळे होणारे मृत्यू वाचविण्याचे आव्हान असल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले. शहरात कोरोना संसर्ग शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्क्रिनिंग करण्यात येत असून, त्यामुळे बाधितांची संख्यादेखील वाढण्याची शक्यता आहेआणखी तीनशेबेड््स वाढविणारशहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून, ती कमी होण्याची चिन्हे नसल्याने पूर्वतयारीचा भाग म्हणून आणखी तीनशे खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे.------------------४बाजारपेठा खुल्या करण्यास परवानगी दिल्यानंतर प्रचंड गर्दी होऊ लागली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला.४शहरातील बाजारपेठांमध्ये दुकाने रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास सवलत दिली. त्यामुळे गर्दी कमी होईल ही अपेक्षा फोल ठरली. आवाहन करूनही नागरिक रस्त्यावर.४बाजारपेठेतील गर्दी कमी करण्यासाठी सम-विषम फॉर्म्युलाचेदेखील पालन होत नसल्याने कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.------------------शहरात बाधितांची संख्या वाढली असून, निर्बंध शिथिल झाल्यानंतर नागरिक कोरोनाबाबत स्वयंशिस्त बाळगत नसल्याने संसर्ग वाढत आहे. शहरात निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी स्थितीचे निरीक्षण करण्यात येत आहे. या संदर्भातील माहिती शासनाला माहिती दिली जात आहेत.- राधाकृष्ण गमे, आयुक्त, मनपा

टॅग्स :Nashikनाशिक