शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

शहरात पुन्हा लॉकडाऊन शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:38 IST

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून, आता दिवसाकाठी ६० ते ७० जणांना कोरोना संसर्ग होत असल्याचे आढळत आहे. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतरच ही परिस्थिती उद््भवली आहे. त्यामुळे आता शहरात पुन्हा लॉकडाऊन करून निर्बंध वाढविण्याबाबत राज्य शासन निर्णय घेणार आहे. यासंदर्भात दोन दिवसांपासून शासनाकडून आढावा घेण्यात आला आहे.

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून, आता दिवसाकाठी ६० ते ७० जणांना कोरोना संसर्ग होत असल्याचे आढळत आहे. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतरच ही परिस्थिती उद््भवली आहे. त्यामुळे आता शहरात पुन्हा लॉकडाऊन करून निर्बंध वाढविण्याबाबत राज्य शासन निर्णय घेणार आहे. यासंदर्भात दोन दिवसांपासून शासनाकडून आढावा घेण्यात आला आहे. ताजी माहितीदेखील महापालिकेने शासनाला दिली आहे. त्यामुळे यासंदर्भात लवकरच शासन निर्णय घेऊ शकेल, अशी माहिती आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीदिली. शहरात कोरोनाबाधितांची संख्या अत्यंत झपाट्याने वाढत आहे. सुरुवातीला ४० ते ५० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येत होते. आता तर ५० ते ६० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. शहरात गेल्या ६ जूनपासून बाजारपेठा खुल्या करण्यास परवानगी दिल्यानंतर प्रचंड गर्दी होऊ लागली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला आणि दुसºयाच दिवशी शहरातील बाजारपेठांमध्ये दुकाने रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास सवलत दिली. त्यामुळे गर्दी कमी होईल ही अपेक्षा फोल ठरली आणि आणखी गर्दी वाढली.त्यातच आता शहरात रुग्णसंख्या प्रचंड वाढली असून, आठ जणांचा तर मृत्यू झाल्याने आता शहरात पुन्हा निर्बंध घालण्याची मागणी होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ‘लोकमत’शी बोलतानाही माहिती दिली.------------------४शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी त्यापेक्षा कोरोनामुळे होणारे मृत्यू वाचविण्याचे आव्हान असल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले. शहरात कोरोना संसर्ग शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्क्रिनिंग करण्यात येत असून, त्यामुळे बाधितांची संख्यादेखील वाढण्याची शक्यता आहेआणखी तीनशेबेड््स वाढविणारशहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून, ती कमी होण्याची चिन्हे नसल्याने पूर्वतयारीचा भाग म्हणून आणखी तीनशे खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे.------------------४बाजारपेठा खुल्या करण्यास परवानगी दिल्यानंतर प्रचंड गर्दी होऊ लागली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला.४शहरातील बाजारपेठांमध्ये दुकाने रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास सवलत दिली. त्यामुळे गर्दी कमी होईल ही अपेक्षा फोल ठरली. आवाहन करूनही नागरिक रस्त्यावर.४बाजारपेठेतील गर्दी कमी करण्यासाठी सम-विषम फॉर्म्युलाचेदेखील पालन होत नसल्याने कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.------------------शहरात बाधितांची संख्या वाढली असून, निर्बंध शिथिल झाल्यानंतर नागरिक कोरोनाबाबत स्वयंशिस्त बाळगत नसल्याने संसर्ग वाढत आहे. शहरात निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी स्थितीचे निरीक्षण करण्यात येत आहे. या संदर्भातील माहिती शासनाला माहिती दिली जात आहेत.- राधाकृष्ण गमे, आयुक्त, मनपा

टॅग्स :Nashikनाशिक