शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पुन्हा लॉकडाऊन शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:38 IST

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून, आता दिवसाकाठी ६० ते ७० जणांना कोरोना संसर्ग होत असल्याचे आढळत आहे. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतरच ही परिस्थिती उद््भवली आहे. त्यामुळे आता शहरात पुन्हा लॉकडाऊन करून निर्बंध वाढविण्याबाबत राज्य शासन निर्णय घेणार आहे. यासंदर्भात दोन दिवसांपासून शासनाकडून आढावा घेण्यात आला आहे.

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून, आता दिवसाकाठी ६० ते ७० जणांना कोरोना संसर्ग होत असल्याचे आढळत आहे. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतरच ही परिस्थिती उद््भवली आहे. त्यामुळे आता शहरात पुन्हा लॉकडाऊन करून निर्बंध वाढविण्याबाबत राज्य शासन निर्णय घेणार आहे. यासंदर्भात दोन दिवसांपासून शासनाकडून आढावा घेण्यात आला आहे. ताजी माहितीदेखील महापालिकेने शासनाला दिली आहे. त्यामुळे यासंदर्भात लवकरच शासन निर्णय घेऊ शकेल, अशी माहिती आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीदिली. शहरात कोरोनाबाधितांची संख्या अत्यंत झपाट्याने वाढत आहे. सुरुवातीला ४० ते ५० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येत होते. आता तर ५० ते ६० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. शहरात गेल्या ६ जूनपासून बाजारपेठा खुल्या करण्यास परवानगी दिल्यानंतर प्रचंड गर्दी होऊ लागली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला आणि दुसºयाच दिवशी शहरातील बाजारपेठांमध्ये दुकाने रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास सवलत दिली. त्यामुळे गर्दी कमी होईल ही अपेक्षा फोल ठरली आणि आणखी गर्दी वाढली.त्यातच आता शहरात रुग्णसंख्या प्रचंड वाढली असून, आठ जणांचा तर मृत्यू झाल्याने आता शहरात पुन्हा निर्बंध घालण्याची मागणी होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ‘लोकमत’शी बोलतानाही माहिती दिली.------------------४शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी त्यापेक्षा कोरोनामुळे होणारे मृत्यू वाचविण्याचे आव्हान असल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले. शहरात कोरोना संसर्ग शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्क्रिनिंग करण्यात येत असून, त्यामुळे बाधितांची संख्यादेखील वाढण्याची शक्यता आहेआणखी तीनशेबेड््स वाढविणारशहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून, ती कमी होण्याची चिन्हे नसल्याने पूर्वतयारीचा भाग म्हणून आणखी तीनशे खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे.------------------४बाजारपेठा खुल्या करण्यास परवानगी दिल्यानंतर प्रचंड गर्दी होऊ लागली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला.४शहरातील बाजारपेठांमध्ये दुकाने रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास सवलत दिली. त्यामुळे गर्दी कमी होईल ही अपेक्षा फोल ठरली. आवाहन करूनही नागरिक रस्त्यावर.४बाजारपेठेतील गर्दी कमी करण्यासाठी सम-विषम फॉर्म्युलाचेदेखील पालन होत नसल्याने कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.------------------शहरात बाधितांची संख्या वाढली असून, निर्बंध शिथिल झाल्यानंतर नागरिक कोरोनाबाबत स्वयंशिस्त बाळगत नसल्याने संसर्ग वाढत आहे. शहरात निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी स्थितीचे निरीक्षण करण्यात येत आहे. या संदर्भातील माहिती शासनाला माहिती दिली जात आहेत.- राधाकृष्ण गमे, आयुक्त, मनपा

टॅग्स :Nashikनाशिक