शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवरील कर्ज सरकारचेच पाप

By admin | Updated: May 20, 2017 02:25 IST

नाशिक : स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन मोदी सरकारने तीन वर्षांत पाळले नाही म्हणून शेतकऱ्यांवर कर्जमुक्ती मागण्याची वेळ आली

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन मोदी सरकारने तीन वर्षांत पाळले नाही म्हणून शेतकऱ्यांवर कर्जमुक्ती मागण्याची वेळ आली. शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्ज हे सरकारचेच पाप असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेनेच्या वतीने आयोजित कृषी अधिवेशनात बोलताना केला. कृषी अधिवेशनात राजू शेट्टी यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. शेट्टी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मी शेतकऱ्यांचीच भाषा बोलणार, त्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नसल्याचे स्पष्ट केले. शेतकऱ्याला कर्जमुक्तीची मागणी करण्याची वेळ का आली, याच्या मुळाशी जाण्याची गरज असल्याचे सांगत शेट्टी म्हणाले, शेतकरी कायम देण्याच्या भूमिकेत राहिला आहे परंतु आज त्याच्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे. नाशिक जिल्ह्यातच गेल्या दहा दिवसांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्यांचे लोण आता पश्चिम महाराष्ट्रातही जाऊन पोहोचले आहे. सरकारचे धोरण हे शेतकऱ्याचे मरण बनले आहे. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांच्या मध्यस्थीने आम्ही एनडीएसोबत राहिलो. त्यावेळी स्वामीनाथन आयोगाच्या सूत्रानुसार उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव बांधून देण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते. परंतु, तीन वर्षांत मोदी सरकारने हे आश्वासन पाळले नाही म्हणून शेतकऱ्यांवर कर्जमुक्तीची मागणी करण्याची वेळ आली आहे. २०१९ला होणारी लोकसभेची निवडणूक दूर नसल्याचा इशाराही शेट्टी यांनी यावेळी दिला. भाजपा वाल्याचा वाल्मिकी करायला निघाला आहे परंतु एवढ्या वाल्मिकींची महाराष्ट्राला गरज नाही, अशी टीका करताना शेट्टी यांनी सांगितले, मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा करत आहेत परंतु, मागील वर्षी तुरीला ११ हजार रुपये भाव असताना यावर्षी केवळ ४ हजार रुपये भाव देण्यात आला. सोयाबीनचाही ७ हजारावरून अडीच हजारांवर भाव आला. याच सरकारी धोरणांमुळे शेतकऱ्यांचे साडेअकरा लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची अशी थट्टा खपवून घेतली जाणार नाही. शेतकऱ्यांना अगोदर समृद्ध करा मग समृद्धी महामार्ग काढत विकासाचे मनोरे बांधा. कर्जमुक्ती हा शाश्वत उपाय नाही परंतु शेतकरी अत्यवस्थ झालेला आहे. शेतकऱ्याला उभा करायचा असेल तर त्याला कर्जमुक्तीची सलाइन दिली पाहिजे आणि उपचार म्हणून स्वामीनाथन आयोगाच्या सूत्राची अंमलबजावणी केली पाहिजे. सरकारने शेतकऱ्यांचा संप मोडून काढण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला दिलेल्या खुर्च्याही काढून घेण्याची ताकद शेतकऱ्यांच्या मनगटात असल्याचे शेट्टी यांनी ठणकावून सांगितले. दरम्यान, येत्या २२ मे पासून पुणे येथील महात्मा फुले यांच्या वाड्यापासून मुंबईपर्यंत आत्मक्लेश पदयात्रा काढण्यात येणार असून सेनेने साथ द्यावी, असे आवाहनही शेट्टी यांनी केले.