शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी योजना : सहा हजार शेतकºयांना लाभ; कळवण तालुक्यातील स्थिती ३७ कोटींंचे कर्ज माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:04 IST

कळवण तालुक्यातील ५ हजार ९६९ कर्जदार सभासदांची ३७ कोटी २४ लाख ६५ हजार रु पयांची कर्ज माफी झाली असल्याची माहिती नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक धनंजय पवार यांनी कळवण येथे दिली.

कळवण : राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कळवण तालुक्यातील ५ हजार ९६९ कर्जदार सभासदांची ३७ कोटी २४ लाख ६५ हजार रु पयांची कर्ज माफी झाली असल्याची माहिती नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक धनंजय पवार यांनी कळवण येथे दिली. शासनाकडून कळवण तालुक्यातील ५ हजार ९६९ कर्जदार सभासद शेतकºयांची ग्रीन लिस्ट प्राप्त झाली आहे. त्यात कळवण तालुक्यातील १ लाख ५० हजार रु पयांच्या आतील ३ हजार ६६० शेतकºयांना पूर्ण कर्ज माफीचा लाभ मिळाला असून त्यांची कर्जाची एकूण रक्कम २१ कोटी ७४ लाख ८१ हजार १७ रु पये आहे. सदर रक्कम जिल्हा बँकेच्या संबंधित शाखेत कर्जदार सभासदाच्या कर्जखात्यात जमा करण्यात आली आहे. तर उर्वरित दीड लाखांवर कर्ज असलेल्या १ हजार ७१९ शेतकºयांसाठी १४ कोटी ४४ लाख ४६ हजार रु पये शासनाकडून मंजूर करण्यात आले आहेत; मात्र संबंधित कर्जदार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी दीड लाखांच्यावरील रक्कम ३१ मार्च २०१८ पर्यंत भरणे आवश्यक आहे. या शिवाय कळवण तालुक्यातील नियमित कर्जदार असलेल्या ५९० कर्जदार शेतकºयांसाठीदेखील प्रोत्साहन रक्कम म्हणून १ कोटी ५ लाख ३८ हजार रु पये मंजूर झाले आहेत तालुक्यातील १ लाख ५० हजार रु पयांवरील कर्जदार असलेल्या शेतकºयांनी आपली रक्कम लवकरात लवकर जिल्हा बॅँकेच्या शाखेत भरून पूर्ण शासनाच्या कर्ज माफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बॅक संचालक धनंजय पवार व बँकेचे विभागीय अधिकारी जयवंत बोरसे यांनी केले. कर्जमाफी योजनेंतर्गत कळवण तालुक्यातील बहुतांशी कुटुंबातील शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज भरले आहेत. बँकांनाही आपल्याकडील कृषी कर्जदार शेतकºयांची संपूर्ण आॅनलाइन भरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. राष्ट्रीयीकृत बँकांनीदेखील शेतकºयांची माहिती आॅनलाइन भरली होती. कुठेच मंजूर यादी पाहायला उपलब्ध नसल्याने कर्जदार शेतकरी बँकामध्ये गेल्यानंतर कर्जमाफीबाबत कुठलीच माहिती दिली जात नाही, सर्व याद्या वरिष्ठ कार्यालयाकडून येणार असल्याचे उत्तर शेतकºयांना मिळत आहे. शासनाच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार तरी कधी, असा संतप्त सवाल शेतकºयांतून उपस्थित केला जात आहे. आतापर्यंत ज्या बँकांना पात्र शेतकºयांसाठी कर्जमाफीची रक्कम मिळाली आहे. ती किती शेतकºयांच्या खात्यावर वर्ग झाली. यात राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज घेतलेल्या शेतकºयांची संख्या किती आहे, याची अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे.