शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

कर्जमाफीचे जिल्हा बँकेला दीड हजार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:19 IST

राज्य शासनाने दीड लाखाच्या आतील व दीड लाखापर्यंतच्या शेतकरी कर्जदारांना दिलेल्या कर्जमाफीचा लाभ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे थकबाकीदार असलेल्या १ लाख २४ हजार ३०८ शेतकरी सभासदांना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच या सव्वा लाख शेतकºयांचे १५०२ कोटी रुपयेही जिल्हा बॅँकेला शासनाकडून प्राप्त होणार आहे.

नाशिक : राज्य शासनाने दीड लाखाच्या आतील व दीड लाखापर्यंतच्या शेतकरी कर्जदारांना दिलेल्या कर्जमाफीचा लाभ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे थकबाकीदार असलेल्या १ लाख २४ हजार ३०८ शेतकरी सभासदांना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच या सव्वा लाख शेतकºयांचे १५०२ कोटी रुपयेही जिल्हा बॅँकेला शासनाकडून प्राप्त होणार आहे. शासनाने नुकतीच दीड लाखाच्या आत ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार असलेल्या सभासदांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली. त्यानुसार बॅँकेकडून दीड लाखापर्यंत कर्ज घेतलेल्या ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार असलेल्या ९० हजार ९३१ शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी मिळणार आहे.या ९० हजार ९३१ शेतकºयांच्या कर्जमाफीपोटीची रक्कम ६८६ कोटी रूपये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत जमा होणार आहे. तसेच दीड लाखांपेक्षा जास्त मात्र दीड लाखापर्यंत कर्जमाफीच्या लाभास पात्र असलेल्या ३३ हजार ३७७ शेतकºयांचे ८१६ कोटी रुपयेही जिल्हा बॅँकेत जमा होणार आहे. मात्र त्यासाठी या ३३ हजार ३७७ शेतकºयांना त्यांच्याकडील दीड लाखांपुढील कर्जाची थकबाकीची रक्कम सुमारे ३१६ कोटी रुपये आधी जिल्हा बॅँकेत जमा करावे लागणार आहेत. त्यानंतरच त्यांना कर्जमाफीची ५०० कोटींची रक्कम मिळणार आहे. जिल्हा बॅँकेकडील दीड लाखांच्या आतील ९० हजार ९३१ शेतकरी व दीड लाखांच्या पुढील मात्र दीड लाखांपर्यंतच्या कर्जमाफीच्या लाभास पात्र असलेले ३३ हजार ३७७ शेतकरी असे एकूण १ लाख २४ हजार ३०८ शेतकºयांना एकूण दीड लाखांपर्यंतची सुमारे १५०२ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. आॅक्टोबर २०१७ पासून ही कर्जमाफीची रक्कम राज्य शासनाकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत जमा होण्यास सुरुवात होणार आहे. कर्जमाफीची एकरकमी रक्कम जिल्हा बॅँकेला मिळणार असल्याने जिल्हा बॅँकेच्या आर्थिक स्थिरतेला बळ मिळणार आहे.‘दीड लाखांच्या पुढे थकबाकीदार असलेल्या मात्र दीड लाखांपर्यंतची कर्जमाफीस पात्र असलेल्या ३३ हजार ३७७ शेतकºयांनी त्यांच्या कर्जमाफीसाठी त्यांची दीड लाखांपुढील सुमारे ३१६ कोटींची रक्कम आधी जिल्हा बॅँकेत जमा करणे गरजेचे आहे. त्यानंतरच त्यांना दीड लाखांपर्यंतच्या सुमारे ५०० कोटींच्या कर्जमाफी रकमेचा लाभ मिळेल. त्यासाठी शेतकरी बांधवांनी त्यांच्याकडील दीड लाखांपुढील रक्कम तातडीने भरावी.’- राजेंद्र बकाल, कार्यकारी संचालक, जिल्हा बॅँक.