शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

कर्जमाफीचे जिल्हा बँकेला दीड हजार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:19 IST

राज्य शासनाने दीड लाखाच्या आतील व दीड लाखापर्यंतच्या शेतकरी कर्जदारांना दिलेल्या कर्जमाफीचा लाभ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे थकबाकीदार असलेल्या १ लाख २४ हजार ३०८ शेतकरी सभासदांना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच या सव्वा लाख शेतकºयांचे १५०२ कोटी रुपयेही जिल्हा बॅँकेला शासनाकडून प्राप्त होणार आहे.

नाशिक : राज्य शासनाने दीड लाखाच्या आतील व दीड लाखापर्यंतच्या शेतकरी कर्जदारांना दिलेल्या कर्जमाफीचा लाभ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे थकबाकीदार असलेल्या १ लाख २४ हजार ३०८ शेतकरी सभासदांना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच या सव्वा लाख शेतकºयांचे १५०२ कोटी रुपयेही जिल्हा बॅँकेला शासनाकडून प्राप्त होणार आहे. शासनाने नुकतीच दीड लाखाच्या आत ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार असलेल्या सभासदांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली. त्यानुसार बॅँकेकडून दीड लाखापर्यंत कर्ज घेतलेल्या ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार असलेल्या ९० हजार ९३१ शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी मिळणार आहे.या ९० हजार ९३१ शेतकºयांच्या कर्जमाफीपोटीची रक्कम ६८६ कोटी रूपये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत जमा होणार आहे. तसेच दीड लाखांपेक्षा जास्त मात्र दीड लाखापर्यंत कर्जमाफीच्या लाभास पात्र असलेल्या ३३ हजार ३७७ शेतकºयांचे ८१६ कोटी रुपयेही जिल्हा बॅँकेत जमा होणार आहे. मात्र त्यासाठी या ३३ हजार ३७७ शेतकºयांना त्यांच्याकडील दीड लाखांपुढील कर्जाची थकबाकीची रक्कम सुमारे ३१६ कोटी रुपये आधी जिल्हा बॅँकेत जमा करावे लागणार आहेत. त्यानंतरच त्यांना कर्जमाफीची ५०० कोटींची रक्कम मिळणार आहे. जिल्हा बॅँकेकडील दीड लाखांच्या आतील ९० हजार ९३१ शेतकरी व दीड लाखांच्या पुढील मात्र दीड लाखांपर्यंतच्या कर्जमाफीच्या लाभास पात्र असलेले ३३ हजार ३७७ शेतकरी असे एकूण १ लाख २४ हजार ३०८ शेतकºयांना एकूण दीड लाखांपर्यंतची सुमारे १५०२ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. आॅक्टोबर २०१७ पासून ही कर्जमाफीची रक्कम राज्य शासनाकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत जमा होण्यास सुरुवात होणार आहे. कर्जमाफीची एकरकमी रक्कम जिल्हा बॅँकेला मिळणार असल्याने जिल्हा बॅँकेच्या आर्थिक स्थिरतेला बळ मिळणार आहे.‘दीड लाखांच्या पुढे थकबाकीदार असलेल्या मात्र दीड लाखांपर्यंतची कर्जमाफीस पात्र असलेल्या ३३ हजार ३७७ शेतकºयांनी त्यांच्या कर्जमाफीसाठी त्यांची दीड लाखांपुढील सुमारे ३१६ कोटींची रक्कम आधी जिल्हा बॅँकेत जमा करणे गरजेचे आहे. त्यानंतरच त्यांना दीड लाखांपर्यंतच्या सुमारे ५०० कोटींच्या कर्जमाफी रकमेचा लाभ मिळेल. त्यासाठी शेतकरी बांधवांनी त्यांच्याकडील दीड लाखांपुढील रक्कम तातडीने भरावी.’- राजेंद्र बकाल, कार्यकारी संचालक, जिल्हा बॅँक.