शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

कर्जमाफीचे जिल्हा बँकेला दीड हजार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:19 IST

राज्य शासनाने दीड लाखाच्या आतील व दीड लाखापर्यंतच्या शेतकरी कर्जदारांना दिलेल्या कर्जमाफीचा लाभ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे थकबाकीदार असलेल्या १ लाख २४ हजार ३०८ शेतकरी सभासदांना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच या सव्वा लाख शेतकºयांचे १५०२ कोटी रुपयेही जिल्हा बॅँकेला शासनाकडून प्राप्त होणार आहे.

नाशिक : राज्य शासनाने दीड लाखाच्या आतील व दीड लाखापर्यंतच्या शेतकरी कर्जदारांना दिलेल्या कर्जमाफीचा लाभ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे थकबाकीदार असलेल्या १ लाख २४ हजार ३०८ शेतकरी सभासदांना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच या सव्वा लाख शेतकºयांचे १५०२ कोटी रुपयेही जिल्हा बॅँकेला शासनाकडून प्राप्त होणार आहे. शासनाने नुकतीच दीड लाखाच्या आत ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार असलेल्या सभासदांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली. त्यानुसार बॅँकेकडून दीड लाखापर्यंत कर्ज घेतलेल्या ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार असलेल्या ९० हजार ९३१ शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी मिळणार आहे.या ९० हजार ९३१ शेतकºयांच्या कर्जमाफीपोटीची रक्कम ६८६ कोटी रूपये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत जमा होणार आहे. तसेच दीड लाखांपेक्षा जास्त मात्र दीड लाखापर्यंत कर्जमाफीच्या लाभास पात्र असलेल्या ३३ हजार ३७७ शेतकºयांचे ८१६ कोटी रुपयेही जिल्हा बॅँकेत जमा होणार आहे. मात्र त्यासाठी या ३३ हजार ३७७ शेतकºयांना त्यांच्याकडील दीड लाखांपुढील कर्जाची थकबाकीची रक्कम सुमारे ३१६ कोटी रुपये आधी जिल्हा बॅँकेत जमा करावे लागणार आहेत. त्यानंतरच त्यांना कर्जमाफीची ५०० कोटींची रक्कम मिळणार आहे. जिल्हा बॅँकेकडील दीड लाखांच्या आतील ९० हजार ९३१ शेतकरी व दीड लाखांच्या पुढील मात्र दीड लाखांपर्यंतच्या कर्जमाफीच्या लाभास पात्र असलेले ३३ हजार ३७७ शेतकरी असे एकूण १ लाख २४ हजार ३०८ शेतकºयांना एकूण दीड लाखांपर्यंतची सुमारे १५०२ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. आॅक्टोबर २०१७ पासून ही कर्जमाफीची रक्कम राज्य शासनाकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत जमा होण्यास सुरुवात होणार आहे. कर्जमाफीची एकरकमी रक्कम जिल्हा बॅँकेला मिळणार असल्याने जिल्हा बॅँकेच्या आर्थिक स्थिरतेला बळ मिळणार आहे.‘दीड लाखांच्या पुढे थकबाकीदार असलेल्या मात्र दीड लाखांपर्यंतची कर्जमाफीस पात्र असलेल्या ३३ हजार ३७७ शेतकºयांनी त्यांच्या कर्जमाफीसाठी त्यांची दीड लाखांपुढील सुमारे ३१६ कोटींची रक्कम आधी जिल्हा बॅँकेत जमा करणे गरजेचे आहे. त्यानंतरच त्यांना दीड लाखांपर्यंतच्या सुमारे ५०० कोटींच्या कर्जमाफी रकमेचा लाभ मिळेल. त्यासाठी शेतकरी बांधवांनी त्यांच्याकडील दीड लाखांपुढील रक्कम तातडीने भरावी.’- राजेंद्र बकाल, कार्यकारी संचालक, जिल्हा बॅँक.