शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात केवळ ४३५ कोटींचे कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:13 IST

जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका आणि सहकार क्षेत्रातील बँका मिळून खरिपात शेतकऱ्यांना २७८० कोटी रुपये कर्ज वाटपाचे ...

जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका आणि सहकार क्षेत्रातील बँका मिळून खरिपात शेतकऱ्यांना २७८० कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असला तरी अद्याप निम्मेही कर्ज वाटप झालेले नाही. आतापर्यंत केवळ १६ टक्के कर्ज वाटप करण्यात आले आहे. कोरोनामुळे अनेक बँकांमध्ये उपस्थिती कमी आहे. त्याचबरोबर अनेक बँकांचे केवळ पैसे काढणे आणि पैसे भरणे एवढीच काम सुरू असून बाकी सर्व कामे पूर्णपणे ठप्प असल्याने कर्जवाटपाच्या कामात अडथळा येत असल्याचा दावा शासकीय यंत्रणांनी केला आहे. २८ मेपर्यंत जिल्ह्यात राष्टीयीकृत बँकांनी २३२ कोटी रुपये तर, जिल्हा बँकेने १५५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक कामगिरी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर्षी राष्ट्रीयीकृत बँकांवर अधिकाधिक जोर देण्यात आला असून या बँकांना तब्बल १८६९ कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

चौकट-

राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज मिळविण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात धावपळ करावी लागते. संपूर्ण कागदपत्रे जमा करूनही जाचक अटींमुळे अनेक शेतकरी खरीप कर्जापासून वंचित राहात असल्याचा मागील काही वर्षांचा अनुभव आहे. गावोगावच्या विकास सहकारी सोसायट्यांमार्फत कर्जपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेतकरीवर्गांकडून होत आहे. नोटाबंदीनंतर अनेक सहकारी सोसायट्या अडचणीत आल्या असून, ग्रामीण भागातील अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सोसायट्यांचे कामकाज सुरळीत करावे, अशी मागणीही शेतकरीवर्गांकडून होत आहे.

चौकट-

बँकनिहाय कर्ज वाटप उद्दिष्ट (कोट)

राष्ट्रीयीकृत बँका - १८६९

खासगी बँका -३६८

ग्रामीण बँका - ८

सहकारी क्षेत्र - ५३५