शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
5
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
6
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
7
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
8
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
9
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
10
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
11
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
12
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
14
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
15
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
16
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
17
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
18
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
19
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
20
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...

ठिकठिकाणी कचरा; रिकाम्या बाटल्या, गुटख्याच्या पुड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:08 IST

राज्य परिवहन महामंडळाने १ ते १५ डिसेंबर या कालावधीत बसस्थानक आणि स्थानकाच्या आवारातील स्वच्छता मोहीम राबविली. याबरोबरच चालक-वाहक विश्रांती ...

राज्य परिवहन महामंडळाने १ ते १५ डिसेंबर या कालावधीत बसस्थानक आणि स्थानकाच्या आवारातील स्वच्छता मोहीम राबविली. याबरोबरच चालक-वाहक विश्रांती आणि स्वागत कक्षाबरोबरच स्वच्छतागृहांची स्वच्छता या कालावधीत करण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ स्थानकामध्ये करण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात स्वच्छता होतानाचे चित्र अभावानेच दिसले. रोजच प्रवाशांची ये-जा असल्यामुळे दैनंदिन स्वच्छता महत्त्वाची ठरते. त्यातच कोरोनाचा प्रभाव आणि आता नव्याने आढळणाऱ्या रुग्णांमुळे सतर्कता तितकीच महत्त्वाची आहे.

शहरात ठक्कर बझार, महामार्ग, जुने सीबीएस, निमाणी, नाशिक रोड ही महत्त्वाची बसस्थानके आहेत. जिल्ह्यात एकूण १३ ठिकाणी महत्त्वाची बसस्थानके आहेत. शहरातील स्थानकांवर प्रवाशांची होणारी गर्दी जिल्ह्यातील अन्य स्थानकांवर होत नसली, तरी अस्वच्छतेच्या बाबतीत जिल्ह्यातील स्थानकेदेखील अस्वच्छतेच्या गर्तेत आहे.

बसस्थानकांवरील अस्वच्छता अत्यंत गंभीर विषय आहे. आवारात पडलेल्या रिकाम्या बाटल्या, गुटख्यांच्या पुड्या तसेच खाद्यपदार्थांचे रॅपर यामुळे संपूर्ण स्थानक परिसरात अस्वच्छता निर्माण होते. स्वच्छता करण्यासाठी ठेका देण्यात आलेला होता, तेव्हाही तक्रारी होत्या आणि ठेकेदार रद्द झाल्यानंतरदेखील अस्वच्छतेच्या तक्रारी आहेत. महामंडळाचे स्वच्छता कर्मचारी स्वच्छतेचे कामकाज करीत असले, तरी स्थानकांचे आवार आणि कर्मचाऱ्यांची संख्या पाहता स्थानकांवरील स्वच्छता हा प्रश्न नेहमीच उपस्थित होत राहणार आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्क

राज्य परिवहन महामंडळाने १ ते १५ डिसेंबर या कालावधीत बसस्थानक आणि स्थानकाच्या आवारातील स्वच्छता मोहीम राबविली. या बरोबरच चालक-वाहक विश्रांती आणि स्वागत कक्षाबरोबरच स्वच्छतागृहांची स्वच्छता या कालावधीत करण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ स्थानकांमध्ये करण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात स्वच्छता होतानाचे चित्र अभावानेच दिसले. रोजच प्रवाशांची ये-जा असल्यामुळे दैनंदिन स्वच्छता महत्त्वाची ठरते. त्यातच कोरोनाचा प्रभाव आणि आता नव्याने आढळणाऱ्या रुग्णांमुळे सतर्कता तितकीच महत्त्वाची आहे.

शहरात ठक्कर बझार, महामार्ग, जुने सीबीएस, निमाणी, नाशिक रोड ही महत्त्वाची बसस्थानके आहेत. जिल्ह्यात एकूण १३ ठिकाणी महत्त्वाची बसस्थानके आहेत. शहरातील स्थानकांवर प्रवाशांची होणारी गर्दी जिल्ह्यातील अन्य स्थानकांवर होत नसली, तरी अस्वच्छतेच्या बाबतीत जिल्ह्यातील स्थानकेदेखील अस्वच्छतेच्या गर्तेत आहे.

बसस्थानकांवरील अस्वच्छता अत्यंत गंभीर विषय आहे. आवारात पडलेल्या रिकाम्या बाटल्या, गुटख्यांच्या पुड्या तसेच खाद्यपदार्थांचे रॅपर यामुळे संपूर्ण स्थानक परिसरात अस्वच्छता निर्माण होते. स्वच्छता करण्यासाठी ठेका देण्यात आलेला होता, तेव्हाही तक्रारी होत्या आणि ठेकेदार रद्द झाल्यानंतरदेखील अस्वच्छतेच्या तक्रारी आहेत. महामंडळाचे स्वच्छता कर्मचारी स्वच्छतेचे कामकाज करीत असले, तरी स्थानकांचे आवार आणि कर्मचाऱ्यांची संख्या पाहता स्थानकांवरील स्वच्छता हा प्रश्न नेहमीच उपस्थित होत राहणार आहे.