शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

ठिकठिकाणी कचरा; रिकाम्या बाटल्या, गुटख्याच्या पुड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:08 IST

राज्य परिवहन महामंडळाने १ ते १५ डिसेंबर या कालावधीत बसस्थानक आणि स्थानकाच्या आवारातील स्वच्छता मोहीम राबविली. याबरोबरच चालक-वाहक विश्रांती ...

राज्य परिवहन महामंडळाने १ ते १५ डिसेंबर या कालावधीत बसस्थानक आणि स्थानकाच्या आवारातील स्वच्छता मोहीम राबविली. याबरोबरच चालक-वाहक विश्रांती आणि स्वागत कक्षाबरोबरच स्वच्छतागृहांची स्वच्छता या कालावधीत करण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ स्थानकामध्ये करण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात स्वच्छता होतानाचे चित्र अभावानेच दिसले. रोजच प्रवाशांची ये-जा असल्यामुळे दैनंदिन स्वच्छता महत्त्वाची ठरते. त्यातच कोरोनाचा प्रभाव आणि आता नव्याने आढळणाऱ्या रुग्णांमुळे सतर्कता तितकीच महत्त्वाची आहे.

शहरात ठक्कर बझार, महामार्ग, जुने सीबीएस, निमाणी, नाशिक रोड ही महत्त्वाची बसस्थानके आहेत. जिल्ह्यात एकूण १३ ठिकाणी महत्त्वाची बसस्थानके आहेत. शहरातील स्थानकांवर प्रवाशांची होणारी गर्दी जिल्ह्यातील अन्य स्थानकांवर होत नसली, तरी अस्वच्छतेच्या बाबतीत जिल्ह्यातील स्थानकेदेखील अस्वच्छतेच्या गर्तेत आहे.

बसस्थानकांवरील अस्वच्छता अत्यंत गंभीर विषय आहे. आवारात पडलेल्या रिकाम्या बाटल्या, गुटख्यांच्या पुड्या तसेच खाद्यपदार्थांचे रॅपर यामुळे संपूर्ण स्थानक परिसरात अस्वच्छता निर्माण होते. स्वच्छता करण्यासाठी ठेका देण्यात आलेला होता, तेव्हाही तक्रारी होत्या आणि ठेकेदार रद्द झाल्यानंतरदेखील अस्वच्छतेच्या तक्रारी आहेत. महामंडळाचे स्वच्छता कर्मचारी स्वच्छतेचे कामकाज करीत असले, तरी स्थानकांचे आवार आणि कर्मचाऱ्यांची संख्या पाहता स्थानकांवरील स्वच्छता हा प्रश्न नेहमीच उपस्थित होत राहणार आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्क

राज्य परिवहन महामंडळाने १ ते १५ डिसेंबर या कालावधीत बसस्थानक आणि स्थानकाच्या आवारातील स्वच्छता मोहीम राबविली. या बरोबरच चालक-वाहक विश्रांती आणि स्वागत कक्षाबरोबरच स्वच्छतागृहांची स्वच्छता या कालावधीत करण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ स्थानकांमध्ये करण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात स्वच्छता होतानाचे चित्र अभावानेच दिसले. रोजच प्रवाशांची ये-जा असल्यामुळे दैनंदिन स्वच्छता महत्त्वाची ठरते. त्यातच कोरोनाचा प्रभाव आणि आता नव्याने आढळणाऱ्या रुग्णांमुळे सतर्कता तितकीच महत्त्वाची आहे.

शहरात ठक्कर बझार, महामार्ग, जुने सीबीएस, निमाणी, नाशिक रोड ही महत्त्वाची बसस्थानके आहेत. जिल्ह्यात एकूण १३ ठिकाणी महत्त्वाची बसस्थानके आहेत. शहरातील स्थानकांवर प्रवाशांची होणारी गर्दी जिल्ह्यातील अन्य स्थानकांवर होत नसली, तरी अस्वच्छतेच्या बाबतीत जिल्ह्यातील स्थानकेदेखील अस्वच्छतेच्या गर्तेत आहे.

बसस्थानकांवरील अस्वच्छता अत्यंत गंभीर विषय आहे. आवारात पडलेल्या रिकाम्या बाटल्या, गुटख्यांच्या पुड्या तसेच खाद्यपदार्थांचे रॅपर यामुळे संपूर्ण स्थानक परिसरात अस्वच्छता निर्माण होते. स्वच्छता करण्यासाठी ठेका देण्यात आलेला होता, तेव्हाही तक्रारी होत्या आणि ठेकेदार रद्द झाल्यानंतरदेखील अस्वच्छतेच्या तक्रारी आहेत. महामंडळाचे स्वच्छता कर्मचारी स्वच्छतेचे कामकाज करीत असले, तरी स्थानकांचे आवार आणि कर्मचाऱ्यांची संख्या पाहता स्थानकांवरील स्वच्छता हा प्रश्न नेहमीच उपस्थित होत राहणार आहे.