शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

आंब्याने अपत्यप्राप्ती, नाशिक पालिकेने भिडेंकडे मागितली दाम्पत्यांची यादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 03:14 IST

आंबा खाल्ल्याने दीडशे जणांना अपत्य प्राप्ती झाली, विशेषत: मुले झाली या संभाजी भिडे यांच्या कथित...

नाशिक : आंबा खाल्ल्याने दीडशे जणांना अपत्य प्राप्ती झाली, विशेषत: मुले झाली या संभाजी भिडे यांच्या कथित उद््गारानंतर महपाालिकेने त्यांच्याकडून अशाप्रकारच्या कुटुंबांची नाव-पत्त्यासहित यादी मागितली आहे.महापालिकेच्या नोटिसीला अद्याप भिडे यांच्याकडून उत्तर मिळालेले नाही. शिवप्रतिष्ठानचे संस्थेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी नाशिकमध्ये १० जून रोजी घेतलेल्या मेळाव्यात कथित वादग्रस्त विधान केले होते. त्यात आपल्या शेतातील आंबे १८० जणांना दिले. त्यातील १५० जणांना मुले झाल्याचा दावा केला होता. यासंदर्भातील तक्रारीनंतर आरोग्य सहसंचालकांच्या आदेशानुसार नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने भिडे यांना नोटीस बजावली आहे, त्यात भिडे यांनी उल्लेख केलेली आंब्याची झाडे किती आणि कुठे आहेत, याबाबत सविस्तर खुलावा करण्यास सांगितले असून, त्याचबरोबर ज्या दाम्पत्यांना आंबा दिल्याने मुलगा झाला अशा सर्व दाम्पत्याचे नाव आणि पत्त्यानिशी माहिती आपल्या खुलाशात नमूद करण्यास सांगण्यात आले आहे.महापालिकेने १८ जून रोजी नोटीस बजावली आहे. परंतु अद्याप त्याला उत्तर मिळाले नसून आता मुदत संपल्याने महापालिका काय कारवाई करते याकडे लक्ष लागून आहे.