शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
2
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
3
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
4
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
5
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
6
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
7
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
8
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
9
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
10
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
11
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
12
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
13
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
14
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
15
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
16
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
17
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
18
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
19
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
20
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

भाजपच्या १२० जणांची यादी ईडीला पाठवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:30 IST

नाशिक : शिवसेनेच्या नेत्यांवर केंद्रातील भाजप सरकारच्या इशाऱ्यानुसार कारवाई होत असल्याचा आरोप करतानाच ईडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय संस्थांनी भाजप ...

नाशिक : शिवसेनेच्या नेत्यांवर केंद्रातील भाजप सरकारच्या इशाऱ्यानुसार कारवाई होत असल्याचा आरोप करतानाच ईडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय संस्थांनी भाजप कार्यकर्त्यांसारखं वागू नये, आपल्याकडेही भाजपच्या १२० लोकांची यादी असून, ती आपण ईडीला पाठवणार असल्याचा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (दि. १२) नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना दिला आहे.

केंद्र सरकारकडून राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी ईडीचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप करतानाच संजय राऊत यांनी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक ईडीच्या प्रश्नांना उत्तर द्यायला समर्थ असल्याचे सांगत त्यांनी सरनाईक यांची पाठराखणही केली. त्याचप्रमाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला एकत्र लढताना यश आले असून नागपूर, पुणे येथील भाजपचा किल्ला ढासळला आहे, त्यामुळे राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महाविकास आघाडी एकत्र लढविणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले असून, त्याची सुरुवात नाशिकपासून होणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये याविषयी मतभिन्नता असली तरी याविषयी पक्षाच्या नेत्यांचा निर्णय झाल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, केंद्र सरकार दिल्लीतील शेतकरी आंदोलनात फूट पाडू शकले नाही. सध्या देशातील वातावरण पेटले असून, सरकारने आता माघार घ्यावी, असा सल्ला देतानाच लोकसभेत कायदा पुन्हा चर्चेत आणून शेतकऱ्यांना अपेक्षित कायदा करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले

इन्फो-१

मुंबईत शिवसेनेचीच सत्ता, मनसेला टोला

शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर आता मुंबई महापालिकेत मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोलताना मुंबईत शिवसेनाच सर्वात मोठा पक्ष असून, कोणी कोणाबरोबरही गेले तरी सत्ता शिवसेनेचीच येणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत हैदराबादमध्ये भाजपला ओवैसी मिळाले, मुंबईत काय ते बघू असे म्हणत त्यांनी मनसेलाही टोला लगावला.

इन्फो-२

पवार यूपीए अध्यक्ष झाले तर स्वागत

राष्ट्रीय पुरोगामी आघाडी (यूपीए)चे नेतृत्व कोणी करावे, ही केवळ चर्चा सुरू आहे. याविषयी कोणताही निर्णय झालेला नाही. शिवसेना यूपीएमध्ये नसली तरी महाराष्ट्राचा नेता यूपीएचा अध्यक्ष झाला तर त्याचे स्वागतच असल्याचे सांगत राऊत यांनी शरद पवार यांच्या संभाव्य यूपीए अध्यक्षपदावर निवडीचे स्वागत केले आहे. नरसिंह राव पंतप्रधान झाले त्यावेळी खरे तर शरद पवारच पंतप्रधान झाले असते. मात्र, त्यांच्यावर अन्याय झाला, त्यावेळी शरद पवारच पंतप्रधान व्हायला हवे होते, देशाचं नेतृत्व करण्याची सगळ्यात जास्त क्षमता आहे. परंतु, त्यांचे कर्तृत्व हाच त्यांना मोठा अडथळा ठरल्याची खंतही राऊत यांनी यावेळी व्यक्त केली.