शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या १२० जणांची यादी ईडीला पाठवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:30 IST

नाशिक : शिवसेनेच्या नेत्यांवर केंद्रातील भाजप सरकारच्या इशाऱ्यानुसार कारवाई होत असल्याचा आरोप करतानाच ईडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय संस्थांनी भाजप ...

नाशिक : शिवसेनेच्या नेत्यांवर केंद्रातील भाजप सरकारच्या इशाऱ्यानुसार कारवाई होत असल्याचा आरोप करतानाच ईडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय संस्थांनी भाजप कार्यकर्त्यांसारखं वागू नये, आपल्याकडेही भाजपच्या १२० लोकांची यादी असून, ती आपण ईडीला पाठवणार असल्याचा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (दि. १२) नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना दिला आहे.

केंद्र सरकारकडून राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी ईडीचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप करतानाच संजय राऊत यांनी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक ईडीच्या प्रश्नांना उत्तर द्यायला समर्थ असल्याचे सांगत त्यांनी सरनाईक यांची पाठराखणही केली. त्याचप्रमाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला एकत्र लढताना यश आले असून नागपूर, पुणे येथील भाजपचा किल्ला ढासळला आहे, त्यामुळे राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महाविकास आघाडी एकत्र लढविणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले असून, त्याची सुरुवात नाशिकपासून होणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये याविषयी मतभिन्नता असली तरी याविषयी पक्षाच्या नेत्यांचा निर्णय झाल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, केंद्र सरकार दिल्लीतील शेतकरी आंदोलनात फूट पाडू शकले नाही. सध्या देशातील वातावरण पेटले असून, सरकारने आता माघार घ्यावी, असा सल्ला देतानाच लोकसभेत कायदा पुन्हा चर्चेत आणून शेतकऱ्यांना अपेक्षित कायदा करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले

इन्फो-१

मुंबईत शिवसेनेचीच सत्ता, मनसेला टोला

शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर आता मुंबई महापालिकेत मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोलताना मुंबईत शिवसेनाच सर्वात मोठा पक्ष असून, कोणी कोणाबरोबरही गेले तरी सत्ता शिवसेनेचीच येणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत हैदराबादमध्ये भाजपला ओवैसी मिळाले, मुंबईत काय ते बघू असे म्हणत त्यांनी मनसेलाही टोला लगावला.

इन्फो-२

पवार यूपीए अध्यक्ष झाले तर स्वागत

राष्ट्रीय पुरोगामी आघाडी (यूपीए)चे नेतृत्व कोणी करावे, ही केवळ चर्चा सुरू आहे. याविषयी कोणताही निर्णय झालेला नाही. शिवसेना यूपीएमध्ये नसली तरी महाराष्ट्राचा नेता यूपीएचा अध्यक्ष झाला तर त्याचे स्वागतच असल्याचे सांगत राऊत यांनी शरद पवार यांच्या संभाव्य यूपीए अध्यक्षपदावर निवडीचे स्वागत केले आहे. नरसिंह राव पंतप्रधान झाले त्यावेळी खरे तर शरद पवारच पंतप्रधान झाले असते. मात्र, त्यांच्यावर अन्याय झाला, त्यावेळी शरद पवारच पंतप्रधान व्हायला हवे होते, देशाचं नेतृत्व करण्याची सगळ्यात जास्त क्षमता आहे. परंतु, त्यांचे कर्तृत्व हाच त्यांना मोठा अडथळा ठरल्याची खंतही राऊत यांनी यावेळी व्यक्त केली.