शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
4
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
5
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
6
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
7
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
8
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
9
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
10
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
11
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
12
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
13
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
14
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
15
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
16
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
17
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
18
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
19
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
20
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 

भाजपच्या १२० जणांची यादी ईडीला पाठवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:30 IST

नाशिक : शिवसेनेच्या नेत्यांवर केंद्रातील भाजप सरकारच्या इशाऱ्यानुसार कारवाई होत असल्याचा आरोप करतानाच ईडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय संस्थांनी भाजप ...

नाशिक : शिवसेनेच्या नेत्यांवर केंद्रातील भाजप सरकारच्या इशाऱ्यानुसार कारवाई होत असल्याचा आरोप करतानाच ईडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय संस्थांनी भाजप कार्यकर्त्यांसारखं वागू नये, आपल्याकडेही भाजपच्या १२० लोकांची यादी असून, ती आपण ईडीला पाठवणार असल्याचा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (दि. १२) नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना दिला आहे.

केंद्र सरकारकडून राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी ईडीचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप करतानाच संजय राऊत यांनी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक ईडीच्या प्रश्नांना उत्तर द्यायला समर्थ असल्याचे सांगत त्यांनी सरनाईक यांची पाठराखणही केली. त्याचप्रमाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला एकत्र लढताना यश आले असून नागपूर, पुणे येथील भाजपचा किल्ला ढासळला आहे, त्यामुळे राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महाविकास आघाडी एकत्र लढविणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले असून, त्याची सुरुवात नाशिकपासून होणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये याविषयी मतभिन्नता असली तरी याविषयी पक्षाच्या नेत्यांचा निर्णय झाल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, केंद्र सरकार दिल्लीतील शेतकरी आंदोलनात फूट पाडू शकले नाही. सध्या देशातील वातावरण पेटले असून, सरकारने आता माघार घ्यावी, असा सल्ला देतानाच लोकसभेत कायदा पुन्हा चर्चेत आणून शेतकऱ्यांना अपेक्षित कायदा करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले

इन्फो-१

मुंबईत शिवसेनेचीच सत्ता, मनसेला टोला

शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर आता मुंबई महापालिकेत मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोलताना मुंबईत शिवसेनाच सर्वात मोठा पक्ष असून, कोणी कोणाबरोबरही गेले तरी सत्ता शिवसेनेचीच येणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत हैदराबादमध्ये भाजपला ओवैसी मिळाले, मुंबईत काय ते बघू असे म्हणत त्यांनी मनसेलाही टोला लगावला.

इन्फो-२

पवार यूपीए अध्यक्ष झाले तर स्वागत

राष्ट्रीय पुरोगामी आघाडी (यूपीए)चे नेतृत्व कोणी करावे, ही केवळ चर्चा सुरू आहे. याविषयी कोणताही निर्णय झालेला नाही. शिवसेना यूपीएमध्ये नसली तरी महाराष्ट्राचा नेता यूपीएचा अध्यक्ष झाला तर त्याचे स्वागतच असल्याचे सांगत राऊत यांनी शरद पवार यांच्या संभाव्य यूपीए अध्यक्षपदावर निवडीचे स्वागत केले आहे. नरसिंह राव पंतप्रधान झाले त्यावेळी खरे तर शरद पवारच पंतप्रधान झाले असते. मात्र, त्यांच्यावर अन्याय झाला, त्यावेळी शरद पवारच पंतप्रधान व्हायला हवे होते, देशाचं नेतृत्व करण्याची सगळ्यात जास्त क्षमता आहे. परंतु, त्यांचे कर्तृत्व हाच त्यांना मोठा अडथळा ठरल्याची खंतही राऊत यांनी यावेळी व्यक्त केली.