शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

कमळ फुलूनही सेनेचे आव्हान कायम

By admin | Updated: February 25, 2017 01:14 IST

कॉँग्रेस, माकपा नेस्तनाबूत : भाजपाच्या घोडदौडीने राजकीय गणितं बदलणार

सातपूर : एका जागेवर असलेल्या सेनेला पाच जागा, तर एकाच जागेवरील भाजपाला नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत आठ जागा मिळाल्याने सातपूर विभागावर तसे म्हटले तर भाजपा वरचढ ठरली असली तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अंगाने पहायचे झाल्यास भाजपाला अधिक जागा मिळूनही त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत होईलच याची छातीठोक खात्री देता येणार नाही.  सिडकोप्रमाणेच कामगार वर्गाचा भरणा असलेल्या सातपूरवासीयांनी प्रत्येक निवडणुकीत कोणा एका पक्षामागे फरफटत जाण्याची भूमिका कधीच घेतली नाही, त्यामुळे सर्वपक्षीयांना सातपूरने साथ दिल्याने येथील राजकीय वातावरणही निकोप राहिले. परंतु पक्षीय पातळीवर चर्चा करायची झाल्यास गेल्या २५ वर्षांत पहिल्यांदाच भाजपाला सातपूरमध्ये ‘अच्छे दिन’ पहावयास मिळाले. साधारणत: १९९७ च्या निवडणुकीत कमल विधाते यांनी भाजपाची उमेदवारी करून महापालिकेत प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर मात्र भाजपाला थेट पंधरा-सतरा वर्षांची प्रतीक्षा करावी लागली.  दिनकर पाटील यांनी पोटनिवडणूक भाजपाकडून लढवून कमळ फुलविले खरे पण अर्थातच कमळ पाटील यांच्या कर्तुत्वाने फुलले, त्यात पक्षाचे योगदान तसे नव्हतेच. त्यामुळे काल-परवा झालेल्या निवडणुकीत भाजपाला लाटेचा जसा फायदा झाला तसाच तो निवडून येण्याची क्षमता असलेल्या आयात उमेदवारांमुळेही झाला.  एका जागेवर असलेल्या भाजपाला आठ जागांवर विजय मिळाला तर एकाच जागेवर असलेल्या सेनेलाही पाच जागांवर विजय मिळाल्याने सातपूरवर भाजपा व सेना या दोनच पक्षांना खऱ्या अर्थाने मतदारांनी कौल दिला, असे मानावे लागेल. गेल्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहा जागा होत्या, त्या घटून आता दोनच जागांवर पक्षाचे इंजिन थांबले असले तरी, त्या दोन्ही जागा पक्षावर नव्हे तर उमेदवारांच्या कुवतीवरच राखता आल्या हे सत्य नाकारून चालणार नाही. स्थायी समितीचे सभापती सलीम शेख यांच्या उमेदवारीचा हा विजय आहे. तथापि, पक्षाचे चिन्ह असल्याने त्या जागा मनसेच्या खात्यावरच जातील. दिनकर पाटील यांनी चारही जागा खेचून आणल्या तशाच शशीकांत जाधव यांनीही चार जागा आपल्या ताब्यात घेतल्या. सद्यस्थितीत दिनकर पाटील व आमदार सीमा हिरे यांच्यातील ‘सख्य’ सर्वश्रृत असून, पाटील यांच्या पुत्राच्या पराभवास हिरे याच कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढून तशी तक्रारही पाटील यांनी पक्षाकडे केली आहे. त्यावरून भाजपातील अंतर्गत कलहाची जाणीव होण्यास हरकत नसावी. अशा परिस्थितीत दोन वर्षांनी विधानसभेची निवडणूक झाल्यास त्याचे चित्र काय असेल याचे आडाखे आताच बांधले जात असले तरी, भाजपाच्या बरोबरीने सेनाही तितकीच पुढे आल्याने भाजपाला वाटते तितके सोपे असेल असे वाटत नाही.  गेल्या वीस वर्षांपासून सातपूरमधून रिपाइंकडून निवडून येणारे प्रकाश लोंढे यांचा पराभव तसा म्हटला तर धक्कादायक म्हणावा लागेल. अनेक राजकीय लाटा आल्या व गेल्या मात्र लोंढे यांचे स्थान कायम होते. यंदा मात्र भाजपाच्या लाटेत त्यांचा पालापाचोळा झाला.