शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

मळगाव बंधाऱ्यातील गाळाचा उपसा

By admin | Updated: December 31, 2015 22:27 IST

सटाणा : परिसर होणार टॅँकरमुक्त; रब्बीला आधार; साठवले साडेचार दलघफू पाणी

सटाणा : शहरासाठी पाणीटंचाई तशी पाचवीला पुजलेलीच. डिसेंबरपासूनच प्रशासनाला टंचाई निवारणासाठी कसरत करावी लागते. त्यातच नववसाहत भागातील पाण्यासाठीची ओरड यावर पालिकेचे गटनेते काका रौंदळ, प्रगतिशील शेतकरी मधुकर नानाजी सोनवणे यांनी पुढाकार घेत शहरालगत असलेल्या मळगाव वळण बंधाऱ्यात गेल्या पंधरा वर्षांपासून साचलेला गाळ लोकसहभागातून उपसण्याचे काम केले. साडेपाच लाख रुपये खर्चून सुमारे वीस हजार मेट्रिक टन गाळ उपसण्यात आला. यामुळे बंधाऱ्यात तब्बल साडेचार दलघफू पाणी साठून भूजल पातळीत वाढ झाली. यामुळे सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांना या पाण्याचा आधार तर मिळालाच; परंतु शहरातील सुमारे साडेसहाशे खासगी आणि सार्वजनिक विंधनविहिरीतील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन संपूर्ण परिसर ‘जलयुक्त’ होण्यास मदत झाली आहे.शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत असलेल्या पाणीपुरवठा योजना तुटपुंज्या ठरत आहेत. त्यातच नद्यानाल्यांना गेल्या सात ते आठ वर्षात पूर न गेल्यामुळे भूजलपातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरी, पालिका प्रशासनाच्या विहिरी, शहरातील खासगी आणि सार्वजनिक विंधनविहिरी ठप्प झाल्या आहेत. परिणामी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी वाढत असते. डिसेंबर सुरू झाला की टॅँकर सुरू असे समीकरण ठरलेलेच. यावर मात करण्यासाठी शासन अथवा पालिका प्रशासनावर विसंबून न राहता पालिकेचे गटनेते काका रौंदळ, प्रगतिशील शेतकरी मधुकर नानाजी सोनवणे, प्रदीप उखा सोनवणे यांनी जलसुरक्षित करण्याचा निर्धार केला. त्यांनी पुढाकार घेऊन आरम नदीवर बांधलेल्या मळगाव वळण बंधाऱ्यात गेल्या पंधरा वर्षांपासून साचलेला गाळ उपसण्याबरोबरच शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर नदी खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामासाठी लोकसहभागाची संकल्पना पुढे आणली आणि त्याला शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. दोन जेसीबी आणि वीस ट्रॅक्टरने पंधरा दिवस गाळ उपसण्याचे काम करून वीस हजार मेट्रिक टन गाळ काढला. तसेच नदी पात्राचे खोली वाढवून रुंदीकरण करण्यात आले. यामुळे या बंधाऱ्यात पाण्याची साठवणूक झाल्यामुळे सटाण्याची जलश्रीमंती दुष्काळी गावासाठी नक्कीच प्रेरक ठरेल.