शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

मळगाव बंधाऱ्यातील गाळाचा उपसा

By admin | Updated: December 31, 2015 22:27 IST

सटाणा : परिसर होणार टॅँकरमुक्त; रब्बीला आधार; साठवले साडेचार दलघफू पाणी

सटाणा : शहरासाठी पाणीटंचाई तशी पाचवीला पुजलेलीच. डिसेंबरपासूनच प्रशासनाला टंचाई निवारणासाठी कसरत करावी लागते. त्यातच नववसाहत भागातील पाण्यासाठीची ओरड यावर पालिकेचे गटनेते काका रौंदळ, प्रगतिशील शेतकरी मधुकर नानाजी सोनवणे यांनी पुढाकार घेत शहरालगत असलेल्या मळगाव वळण बंधाऱ्यात गेल्या पंधरा वर्षांपासून साचलेला गाळ लोकसहभागातून उपसण्याचे काम केले. साडेपाच लाख रुपये खर्चून सुमारे वीस हजार मेट्रिक टन गाळ उपसण्यात आला. यामुळे बंधाऱ्यात तब्बल साडेचार दलघफू पाणी साठून भूजल पातळीत वाढ झाली. यामुळे सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांना या पाण्याचा आधार तर मिळालाच; परंतु शहरातील सुमारे साडेसहाशे खासगी आणि सार्वजनिक विंधनविहिरीतील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन संपूर्ण परिसर ‘जलयुक्त’ होण्यास मदत झाली आहे.शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत असलेल्या पाणीपुरवठा योजना तुटपुंज्या ठरत आहेत. त्यातच नद्यानाल्यांना गेल्या सात ते आठ वर्षात पूर न गेल्यामुळे भूजलपातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरी, पालिका प्रशासनाच्या विहिरी, शहरातील खासगी आणि सार्वजनिक विंधनविहिरी ठप्प झाल्या आहेत. परिणामी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी वाढत असते. डिसेंबर सुरू झाला की टॅँकर सुरू असे समीकरण ठरलेलेच. यावर मात करण्यासाठी शासन अथवा पालिका प्रशासनावर विसंबून न राहता पालिकेचे गटनेते काका रौंदळ, प्रगतिशील शेतकरी मधुकर नानाजी सोनवणे, प्रदीप उखा सोनवणे यांनी जलसुरक्षित करण्याचा निर्धार केला. त्यांनी पुढाकार घेऊन आरम नदीवर बांधलेल्या मळगाव वळण बंधाऱ्यात गेल्या पंधरा वर्षांपासून साचलेला गाळ उपसण्याबरोबरच शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर नदी खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामासाठी लोकसहभागाची संकल्पना पुढे आणली आणि त्याला शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. दोन जेसीबी आणि वीस ट्रॅक्टरने पंधरा दिवस गाळ उपसण्याचे काम करून वीस हजार मेट्रिक टन गाळ काढला. तसेच नदी पात्राचे खोली वाढवून रुंदीकरण करण्यात आले. यामुळे या बंधाऱ्यात पाण्याची साठवणूक झाल्यामुळे सटाण्याची जलश्रीमंती दुष्काळी गावासाठी नक्कीच प्रेरक ठरेल.