शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

तपमान वाढल्याने जनजीवन विस्कळीत

By admin | Updated: February 28, 2017 23:59 IST

खामखेडा : परिसरामध्ये गेल्या आठवड्यापासून तपमानात वाढ झाल्याने दुपारच्या वेळेस घरातून बाहेर पडणे मुस्कील झाले आहे. दुपारी रस्ते ओस पडत असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.

खामखेडा : परिसरामध्ये गेल्या आठवड्यापासून तपमानात वाढ झाल्याने दुपारच्या वेळेस घरातून बाहेर पडणे मुस्कील झाले आहे. दुपारी रस्ते ओस पडत असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.  कडक उन्हामुळे गेल्या आठ दिवसांपासून शेतकाम करणारे मजूर व शेतकरी यांच्याही कामाच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. शेतकरी सकाळी लवकर शेतात जाऊन पिकाना पाणी देणे तसेच मशागतीची कामे करून ११ वाजेनंतर घरी परतत असून, दुपारनंतर ४ वाजच्या दरम्यान पुन्हा शेतकामे करत आहेत. पशुपालकही सकाळी आपली गुरे, मेंढ्या, बकऱ्या आदि जनावरे चरण्यासाठी सकाळी लवकर डोंगरात नेऊन दुपारच्या वेळेस आपली जनावरे झाडाच्या सावली खाली असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. उन्हाळ्याची चाहूल लागल्याने रसवंती, शीतपेय दुकाने सजू लागली आहेत. उन्हामुळे नागरिक हैराण होऊन दुपारच्या वेळेस घरातून बाहेर पडणार नागरिक डोक्यात टोपी अथवा डोक्याला उपरणे बांधून व डोळ्यावर गॉगल लावून रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. काही महिला तर डोक्याला रु माल किंवा स्कार्प बांधून बाहेर पडतात.  आठवड्यातून काही दिवस दिवसा तर काही दिवस रात्री वीजपुरवठा नसतो. तेव्हा या वेळेस पंखे बंद असतात. घरासमोरील पडवित किंवा एखाद्या झाडाखाली बसावे लागते. या प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शेतकरी, शेतमजूर, पशुपालक याचे वेळापत्रक बदलले आहे. (वार्ताहर)