शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
3
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
4
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
5
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
6
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
7
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."
8
प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना, त्यामुळे आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद; प्रशासनाचा निर्णय
9
"मराठी माणूस एकटवला, म्हणून..."; निदर्शनांवर निर्बंधांच्या मागणीवरून मिलिंद देवरांवर टीकेची झोड 
10
जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा
11
ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...
12
घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार?
13
२३ वर्षीय प्रियकर, ८३ वर्षीय प्रेयसी! अनोखी प्रेमकहाणी आली चर्चेत; मैत्रिणीच्या घरी गेला अन्...
14
पक्ष्यांसह विमानांच्या सुरक्षेवर आता ‘बर्डगार्ड’ ठेवणार वॉच; नवी मुंबई विमानतळ कंपनीची माहिती
15
३ वेळा १० थर, तरी विश्वविक्रम नाही; कुठेतरी पाणी मुरतंय, जय जवान गोविंदा पथकाचा आरोप
16
पत्नीने प्रेयसीसोबत लॉजवर पकडलं; घाबरलेल्या पतीने खाडीत मारली उडी, त्यानंतर 'असं' काही घडलं...
17
जगभ्रमंतीसाठी निघालेल्या नवी मुंबईच्या ट्रॅव्हल ब्लॉगरची दुचाकी इंग्लंडमध्ये चोरीला
18
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
19
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
20
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?

तपमान वाढल्याने जनजीवन विस्कळीत

By admin | Updated: February 28, 2017 23:59 IST

खामखेडा : परिसरामध्ये गेल्या आठवड्यापासून तपमानात वाढ झाल्याने दुपारच्या वेळेस घरातून बाहेर पडणे मुस्कील झाले आहे. दुपारी रस्ते ओस पडत असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.

खामखेडा : परिसरामध्ये गेल्या आठवड्यापासून तपमानात वाढ झाल्याने दुपारच्या वेळेस घरातून बाहेर पडणे मुस्कील झाले आहे. दुपारी रस्ते ओस पडत असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.  कडक उन्हामुळे गेल्या आठ दिवसांपासून शेतकाम करणारे मजूर व शेतकरी यांच्याही कामाच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. शेतकरी सकाळी लवकर शेतात जाऊन पिकाना पाणी देणे तसेच मशागतीची कामे करून ११ वाजेनंतर घरी परतत असून, दुपारनंतर ४ वाजच्या दरम्यान पुन्हा शेतकामे करत आहेत. पशुपालकही सकाळी आपली गुरे, मेंढ्या, बकऱ्या आदि जनावरे चरण्यासाठी सकाळी लवकर डोंगरात नेऊन दुपारच्या वेळेस आपली जनावरे झाडाच्या सावली खाली असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. उन्हाळ्याची चाहूल लागल्याने रसवंती, शीतपेय दुकाने सजू लागली आहेत. उन्हामुळे नागरिक हैराण होऊन दुपारच्या वेळेस घरातून बाहेर पडणार नागरिक डोक्यात टोपी अथवा डोक्याला उपरणे बांधून व डोळ्यावर गॉगल लावून रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. काही महिला तर डोक्याला रु माल किंवा स्कार्प बांधून बाहेर पडतात.  आठवड्यातून काही दिवस दिवसा तर काही दिवस रात्री वीजपुरवठा नसतो. तेव्हा या वेळेस पंखे बंद असतात. घरासमोरील पडवित किंवा एखाद्या झाडाखाली बसावे लागते. या प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शेतकरी, शेतमजूर, पशुपालक याचे वेळापत्रक बदलले आहे. (वार्ताहर)