शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

जीवघेणा प्रवास : वाहनधारकांची दररोज तारेवरची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 16:43 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर व संगमनेर तालुक्याला जोडणाऱ्या नांदूरशिंगोटे - निमोण रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे झाल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. पावसाने रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी या रस्त्याची लाखो रुपये खर्च करून मलमपट्टी केली जाते परंतु रस्त्याची अवस्था जैसे-थे असल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देनांदूरशिंगोटे - निमोण रस्त्यावर खड्डेच खड्डे

नांदूरशिंगोटे : सिन्नर व संगमनेर तालुक्याला जोडणाऱ्या नांदूरशिंगोटे - निमोण रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे झाल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. पावसाने रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी या रस्त्याची लाखो रुपये खर्च करून मलमपट्टी केली जाते परंतु रस्त्याची अवस्था जैसे-थे असल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.नांदूरशिंगोटे - निमोण रस्ता नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असून चार ते पाच तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. निमोण रस्त्याने मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ असल्याने दरवर्षी पावसाळ्यात सदर रस्त्याची दुरावस्था होत आहे. शिर्डी, शनिशिंगणापूर, मोहटादेवी, मढी, भगवानगड आदी तिर्थक्षेत्र असणाऱ्या ठिकाणी याच रस्त्याचा वापर केला जातो. मालवाहतूकीचे प्रमाण जास्त असल्याने रस्ता नेहमीच खराब होत आहे. या मार्गाने प्रवास करताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना अंदाज येत नाही. त्यामुळे अनेक वेळा छोटे मोठे अपघात होत आहेत. तसेच अनेक ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण उखडल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य झाल्याने चिखलातूनच वाहनधारकांना वाट काढावी लागते. नांदूरशिंगोटे ते निमोण हा सात किलोमीटरचा रस्ता असून अडीच किलोमीटर पर्यंत जिल्हा हद्द आहे. परिसरातील गावांना जोडणारा मुख्य रस्ता असल्याने वाहन धारकांना खड्यांमध्ये रस्ता शोधावा लागत आहे. नांदूरशिंगोटे गावातील दहा टक्के नागरिक निमोण रोड लगत वस्तीवर वास्तव करत असल्याने त्यांना गावात दळणवळणासाठी हाच एकमेव रस्ता असल्याने लवकरात लवकर रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे.चौकट : नांदूरशिंगोटे-लोणी-कोल्हापूर हा रस्तादळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. जिल्हा हद्दीपर्यंत रस्त्यावर जागोजाग खडे पडल्याचने वाहनांचे नुकसान होत आहे. रात्रीच्यावेळी अंधारात खड़े वाचविताना दुचाकीस्वारांचे दररोज छोटे-मोठे अपघात होतआहे. लोणी रस्त्याने अवजड वाहनांची वाहतूक वाढल्याने रस्त्यावरील खड्डे त्रासदायक ठरू लागले आहे. त्यामुळे दररोजची डोकेदुखी ठरत असल्याने रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीचे काम तातडीने करण्यात यावे.अरुण शेळके, संचालक, लोकशिक्षण मंडळ, नांदूरशिंगोटे. 

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग