शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

धोकादायक पुलावरून जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 23:18 IST

खेडलेझुंगे येथील गोदावरीवरील केटीवेअर धरणाचा पूल संरक्षण कठडा नसल्याने धोकादायक बनला असून, परिसरातील शेकडो नागरिक जीव मुठीत धरुन त्यावरून प्रवास करीत आहे.

ठळक मुद्देखेडलेझुंगे : कोरोनामुळे कामकाज ठप्प, मजुरांची वानवा

खेडलेझुंगे : येथील गोदावरीवरील केटीवेअर धरणाचा पूल संरक्षण कठडा नसल्याने धोकादायक बनला असून, परिसरातील शेकडो नागरिक जीव मुठीत धरुन त्यावरून प्रवास करीत आहे.मागील अवकाळी पावसामध्ये निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथील गोदावरी नदीवरील गावाच्या बाजूच्या (पुलाच्या उत्तर बाजूचा) पुलाचा भराव वाहून गेलेला होता. या पुलावरून परिसरातील विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी, नोकरदार वर्ग नाशिक, लासलगाव, सिन्नर, नगर, पुण्यासह परिसरातील गावांमधून नियमित ये-जा करीत असतात. परंतु पुलाच्या उत्तरेकडील भाग वाहून गेल्याने तेथील वाहतुक पावसाळ्यात बंद करण्यात आलेली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाचा जोर कमी होताच तेथे तात्पुरत्या स्वरूपात भराव टाकून वाहतुक सुरळीत करुन दिलेली होती.मागील काही दिवसांपासून गोदावरी नदीच्या पुलाचे पक्के काम सुरू झालेले आहे, परंतु कोरोनाच्या भीतीमुळे मजूर कामावर येत नसल्याने सध्या ते काम बंद आहे.या पुलावरून मोठ्या वाहनांची मोठ्या संख्येने वाहतूक होत होती. सध्या मोठ्या वाहनांसह इतर सर्व वाहनांची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे परिसरातील वाहनधारक, शेतकरी हे याच मोठ्या पुलाजवळ असलेल्या केटीवेअर बंधाऱ्यावरील अरुंद (अंदाजे रुंदी १५ फूट) पुलाचा वापर शेतकरी व परिसरातील छोटे वाहनधारक करीत आहेत. शेती कामासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात.यापूर्वी लोखंडी अँगलमधून लोखंडी सळ्या टाकून संरक्षक कठडा होता, परंतु आज रोजी पुलावर लोखंडी सळ्याच नाही तर लोखंडी अँगलही नाहीत. सदरचे अँगल पक्क्या बांधकामात गाडलेले असतानाही कुठे लुप्त झाले हा येथील नागरिकांना मोठा प्रश्न पडलेला आहे.चाकरमान्याची गैरसोय...मोठ्या पुलाचे काम सुरू असल्याने सध्या याच पुलावरून येथील परिसरातील विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, नोकरदार वर्ग, नगर, पुणे, सिन्नर, नाशिक, लासलगाव येथे कामानिमित्त, शेतमाल विक्रीसाठी नियमित ये-जा करीत आहे, परंतु या धरणावर संरक्षक कठडाच नसल्याने जीव मुठीत धरून येथून वावर करावा लागत आहे. पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे येथून ये-जा करणारे विद्यार्थी, शेतमजूर, रहिवासी यांच्या जीवितास धोका निर्माण होेऊन नागरिकांच्या जिवाशी खेळताना दिसत आहे.पाटबंधारे विभागाचे वरातीमागून घोडे....विशेष म्हणजे अरुंद, कठडे नसलेल्या या पुलावर कोणतेही दिशादर्शक फलक सार्वजनिक पाटबंधारे विभागाने लावलेले नाहीत. त्यामुळे मोठे अपघात होण्यापासून जर वाचवायचे असेल तर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी वरातीमागून घोडे नाचविण्यापेक्षा तातडीने लक्ष देत पुलावर संरक्षण उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.केटीवेअर बंधाºयाच्या पुलाला संरक्षक कठडा नसल्याने नागरिकांच्या जिवास धोका निर्माण झालेला आहे. तसेच याच पुलाच्या दक्षिण बाजूने मागील पावसाच्या पुराच्या पाण्यामुळे जमीन ढासळलेली आहे. सदर मोठ्या पुलावरील वाहतूक याच मार्गाने होत असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. संरक्षक कठाडा नसल्यामुळे यापुर्वी अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहे. याबाबत वारंवार मागणी करूनही याकडे पाटबंधारे विभाग लक्ष देत नाही़

टॅग्स :Governmentसरकारpwdसार्वजनिक बांधकाम विभाग