शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

धोकादायक पुलावरून जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 23:18 IST

खेडलेझुंगे येथील गोदावरीवरील केटीवेअर धरणाचा पूल संरक्षण कठडा नसल्याने धोकादायक बनला असून, परिसरातील शेकडो नागरिक जीव मुठीत धरुन त्यावरून प्रवास करीत आहे.

ठळक मुद्देखेडलेझुंगे : कोरोनामुळे कामकाज ठप्प, मजुरांची वानवा

खेडलेझुंगे : येथील गोदावरीवरील केटीवेअर धरणाचा पूल संरक्षण कठडा नसल्याने धोकादायक बनला असून, परिसरातील शेकडो नागरिक जीव मुठीत धरुन त्यावरून प्रवास करीत आहे.मागील अवकाळी पावसामध्ये निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथील गोदावरी नदीवरील गावाच्या बाजूच्या (पुलाच्या उत्तर बाजूचा) पुलाचा भराव वाहून गेलेला होता. या पुलावरून परिसरातील विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी, नोकरदार वर्ग नाशिक, लासलगाव, सिन्नर, नगर, पुण्यासह परिसरातील गावांमधून नियमित ये-जा करीत असतात. परंतु पुलाच्या उत्तरेकडील भाग वाहून गेल्याने तेथील वाहतुक पावसाळ्यात बंद करण्यात आलेली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाचा जोर कमी होताच तेथे तात्पुरत्या स्वरूपात भराव टाकून वाहतुक सुरळीत करुन दिलेली होती.मागील काही दिवसांपासून गोदावरी नदीच्या पुलाचे पक्के काम सुरू झालेले आहे, परंतु कोरोनाच्या भीतीमुळे मजूर कामावर येत नसल्याने सध्या ते काम बंद आहे.या पुलावरून मोठ्या वाहनांची मोठ्या संख्येने वाहतूक होत होती. सध्या मोठ्या वाहनांसह इतर सर्व वाहनांची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे परिसरातील वाहनधारक, शेतकरी हे याच मोठ्या पुलाजवळ असलेल्या केटीवेअर बंधाऱ्यावरील अरुंद (अंदाजे रुंदी १५ फूट) पुलाचा वापर शेतकरी व परिसरातील छोटे वाहनधारक करीत आहेत. शेती कामासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात.यापूर्वी लोखंडी अँगलमधून लोखंडी सळ्या टाकून संरक्षक कठडा होता, परंतु आज रोजी पुलावर लोखंडी सळ्याच नाही तर लोखंडी अँगलही नाहीत. सदरचे अँगल पक्क्या बांधकामात गाडलेले असतानाही कुठे लुप्त झाले हा येथील नागरिकांना मोठा प्रश्न पडलेला आहे.चाकरमान्याची गैरसोय...मोठ्या पुलाचे काम सुरू असल्याने सध्या याच पुलावरून येथील परिसरातील विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, नोकरदार वर्ग, नगर, पुणे, सिन्नर, नाशिक, लासलगाव येथे कामानिमित्त, शेतमाल विक्रीसाठी नियमित ये-जा करीत आहे, परंतु या धरणावर संरक्षक कठडाच नसल्याने जीव मुठीत धरून येथून वावर करावा लागत आहे. पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे येथून ये-जा करणारे विद्यार्थी, शेतमजूर, रहिवासी यांच्या जीवितास धोका निर्माण होेऊन नागरिकांच्या जिवाशी खेळताना दिसत आहे.पाटबंधारे विभागाचे वरातीमागून घोडे....विशेष म्हणजे अरुंद, कठडे नसलेल्या या पुलावर कोणतेही दिशादर्शक फलक सार्वजनिक पाटबंधारे विभागाने लावलेले नाहीत. त्यामुळे मोठे अपघात होण्यापासून जर वाचवायचे असेल तर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी वरातीमागून घोडे नाचविण्यापेक्षा तातडीने लक्ष देत पुलावर संरक्षण उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.केटीवेअर बंधाºयाच्या पुलाला संरक्षक कठडा नसल्याने नागरिकांच्या जिवास धोका निर्माण झालेला आहे. तसेच याच पुलाच्या दक्षिण बाजूने मागील पावसाच्या पुराच्या पाण्यामुळे जमीन ढासळलेली आहे. सदर मोठ्या पुलावरील वाहतूक याच मार्गाने होत असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. संरक्षक कठाडा नसल्यामुळे यापुर्वी अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहे. याबाबत वारंवार मागणी करूनही याकडे पाटबंधारे विभाग लक्ष देत नाही़

टॅग्स :Governmentसरकारpwdसार्वजनिक बांधकाम विभाग