शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2016 22:30 IST

बळीराजा आनंदला : बंधाऱ्यांच्या पातळीत वाढ; संततधार कायम

नाशिक : बागलाणसह त्र्यंबकेश्वर व सुरगाणा येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी जनजीवन विस्कळीत झाले होते.सटाणा शहर व तालुक्यात बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या असून, खरिपाच्या पेरणीला आता वेग येणार आहे. दरम्यान, धरणांच्या पाणलोटक्षेत्रात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे पाण्याच्या पातळीत चांगल्यापैकी वाढ होत असल्यामुळे समाधानाचे वातावरण आहे.बागलाण तालुक्यात यंदाच्या हंगामात मृगाच्या अखेरच्या दिवशी बरसलेल्या चाळीस मिनिटांच्या पावसानंतर आज दुसऱ्यांदा पावसाला सुरुवात झाली. तब्बल चाळीस दिवस ऊन-सावलीच्या खेळामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला होता.सलग चार वर्षांपासूनच्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. थोडीफार पुंजी शिल्लक होती तिही यंदा खरिपाच्या मशागतीला आणि बियाणे व खताच्या खरेदीसाठी खर्ची पडली होती. मात्र पावसाचा मागमूसही दिसत नसल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. मुल्हेर, अंतापूर, ताहाराबाद, सोमपूर, जायखेडा, आसखेडा, ब्राह्मणपाडा, द्याने, नामपूर, राजपूर पांडे, उत्राणे, अंबासन तसेच काटवन परिसरातील चिराई, राहूड, बिलपुरी, टेंभे, इजमाणे, श्रीपूरवडे, नांदीन, दरेगाव, दसवेल, पिंपळकोठे, भडाणे व करंजाडी खोऱ्यातील मुंगसे, पिंगळवाडे, करंजाड, भुयाणे, निताने, पारनेर, लादुद, बिजोटे, आखतवाडे, आनंदपूर, गोराणे, वीरगाव, डांगसौंदाणे, निकवेल, दसाणे, केरसाणे, ब्राह्मणगाव, लखमापूर, अजमीर सौंदाणे, आराई, शेमळी, देवळाणे आदि भागात सायंकाळपर्यंत संततधार सुरूच होती. पावसामुळे खोळंबलेल्या खरीप पेरण्यांना वेग येणार आहे. (लोकमत चमू)