शहरं
Join us  
Trending Stories
1
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
2
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
3
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
7
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
8
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
9
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
10
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
11
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!
12
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
13
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
14
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
15
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
16
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
17
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
18
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
19
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
20
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश

जीवन म्हणजे निसर्गाशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:31 IST

दिंडोरी : माणसाचे जीवन म्हणजे निसर्गाशी एक प्रकारचा संवादच आहे. ज्या दिवशी माणसाचा श्वास थांबतो तेव्हा माणूस मरतो. निसर्गाचा ...

दिंडोरी : माणसाचे जीवन म्हणजे निसर्गाशी एक प्रकारचा संवादच आहे. ज्या दिवशी माणसाचा श्वास थांबतो तेव्हा माणूस मरतो. निसर्गाचा एक भाग माणूस असतो, म्हणून माणसाने निसर्ग संतुलन राखले पाहिजे, पर्यावरणाचे संरक्षण टिकवून ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन माजी जिल्हाधिकारी बी. जी. वाघ यांनी व्याख्यानात केले.

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत वाघ यांचे ‘नवीन शैक्षणिक धोरण’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी वाघ म्हणाले की, अंधश्रद्धा, रुढी-परंपरांमुळे माणसाची अधोगती होते. त्यामुळे माणसाच्या विकासासाठी शिक्षणाची गरज आहे आणि शिक्षण जर शास्त्रशुद्ध असेल तर माणसाचा विकास शक्य होतो. शिक्षण घेताना माणसाला विचार स्वातंत्र्य असले पाहिजे. अशा प्रकारचे विचार करण्याचे स्वातंत्र्य विचारवंत, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना फारसे मिळत नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक माणूस परिपूर्ण असतोच असे नाही. प्रत्येकाला आत्मशोध घेता आला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.संजय सानप यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास प्रा.दिलीप कुटे, डॉ.महादेव कांबळे, प्रा.डॉ.धीरज झाल्टे, प्रा.राजेंद्र डोईफोडे, प्रा.डॉ. अरविंद केदारे, प्रा.डॉ.संतोष भैलुमे, प्रा.तुकाराम भवर, प्रा.वैशाली गांगुर्डे, प्रा.पंकजा अहिरे, डॉ.रुपाली सानप, प्रा.योगेश डंबाळे, प्रा.सीताराम भोये आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.प्रल्हाद दुधाणे यांनी केले तर प्रा.नाना चव्हाण यांनी आभार मानले.