शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

जीवन म्हणजे निसर्गाशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:31 IST

दिंडोरी : माणसाचे जीवन म्हणजे निसर्गाशी एक प्रकारचा संवादच आहे. ज्या दिवशी माणसाचा श्वास थांबतो तेव्हा माणूस मरतो. निसर्गाचा ...

दिंडोरी : माणसाचे जीवन म्हणजे निसर्गाशी एक प्रकारचा संवादच आहे. ज्या दिवशी माणसाचा श्वास थांबतो तेव्हा माणूस मरतो. निसर्गाचा एक भाग माणूस असतो, म्हणून माणसाने निसर्ग संतुलन राखले पाहिजे, पर्यावरणाचे संरक्षण टिकवून ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन माजी जिल्हाधिकारी बी. जी. वाघ यांनी व्याख्यानात केले.

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत वाघ यांचे ‘नवीन शैक्षणिक धोरण’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी वाघ म्हणाले की, अंधश्रद्धा, रुढी-परंपरांमुळे माणसाची अधोगती होते. त्यामुळे माणसाच्या विकासासाठी शिक्षणाची गरज आहे आणि शिक्षण जर शास्त्रशुद्ध असेल तर माणसाचा विकास शक्य होतो. शिक्षण घेताना माणसाला विचार स्वातंत्र्य असले पाहिजे. अशा प्रकारचे विचार करण्याचे स्वातंत्र्य विचारवंत, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना फारसे मिळत नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक माणूस परिपूर्ण असतोच असे नाही. प्रत्येकाला आत्मशोध घेता आला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.संजय सानप यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास प्रा.दिलीप कुटे, डॉ.महादेव कांबळे, प्रा.डॉ.धीरज झाल्टे, प्रा.राजेंद्र डोईफोडे, प्रा.डॉ. अरविंद केदारे, प्रा.डॉ.संतोष भैलुमे, प्रा.तुकाराम भवर, प्रा.वैशाली गांगुर्डे, प्रा.पंकजा अहिरे, डॉ.रुपाली सानप, प्रा.योगेश डंबाळे, प्रा.सीताराम भोये आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.प्रल्हाद दुधाणे यांनी केले तर प्रा.नाना चव्हाण यांनी आभार मानले.