शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी आता थेट मंत्र्यांची पत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:11 IST

दरवर्षी जून महिन्यात पूर्ण होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या गेल्यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने स्थगित केल्या. यंदाही शासनाने मार्चमध्ये सर्व आस्थापनांना पत्र ...

दरवर्षी जून महिन्यात पूर्ण होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या गेल्यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने स्थगित केल्या. यंदाही शासनाने मार्चमध्ये सर्व आस्थापनांना पत्र पाठवून ३० जूनपर्यंत बदल्यांबाबत कोणतेही निर्णय घेऊ नयेत, अशा सूचना केल्या होत्या. ३० जूननंतर शासनाकडून बदल्यांबाबत पुढील आदेश प्राप्त होतील, असा अंदाज बांधून खातेप्रमुखांनी बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार करून ठेवली आहे. मात्र जुलै उजाडूनही अद्याप शासनाकडून बदलीसंदर्भात कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे यंदाही बदल्या होतील की नाही याबाबत शासकीय यंत्रणा साशंक असताना दुसरीकडे मात्र बदलीसाठी इच्छुक कर्मचाऱ्यांकडून थेट पालकमंत्री व आपापल्या खात्याच्या मंत्र्यांकडून तसेच आमदार व खासदारांकडून बदलीसाठी शिफारस पत्रे घेऊन ते संबंधित खातेप्रमुखांकडे सादर केले जात आहेत. या पत्रांमध्ये मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ‘उचित कार्यवाही करावी’ अशा सूचना देण्यात आल्या आहेत. बदलीसाठी एकदा पत्र दिल्यानंतर काय कार्यवाही झाली यासाठी मंत्र्यांकडून विचारणाही केली जात असून, प्रशासन पातळीवर बदल्यांसाठी दखल घेतली जात नसल्याने कर्मचाऱ्यांकडून अप्रत्यक्ष प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे.

नाशिक जिल्हा परिषदेच्या अनेक कर्मचाऱ्यांकडून असा प्रयत्न केला जात असून, यामुळे प्रशासकीय अधिकारी पेचात सापडले आहेत.

गेल्यावर्षी शासनाने बदल्यांसाठी अनुमती दिली नसली तरी, दिव्यांग, विधवा, दुर्धर आजारी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या काही प्रमाणात स्थानिक पातळीवर करण्यात आल्या होत्या. यंदा मात्र त्याबाबतही कोणतीही सुस्पष्टता नसल्याने काय निर्णय घ्यावा, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. गेल्या वर्षी बदल्या न झाल्याने गैरसोयीच्या ठिकाणी बदलून गेलेल्या कर्मचाऱ्यांना सर्वसाधारण बदल्यांची आतुरता लागली आहे.