शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

पालखेडच्या आवर्तनासाठी भुजबळांचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 00:35 IST

नाशिक : येवला, निफाड तालुक्यासह मनमाड शहराला पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून, पालखेड धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी लवकरात लवकर आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

ठळक मुद्दे छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे पत्राद्वारे मागणी पालखेड डाव्या कालव्यातून लवकरात लवकर आवर्तन सोडण्यात यावे

नाशिक : येवला, निफाड तालुक्यासह मनमाड शहराला पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून, पालखेड धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी लवकरात लवकर आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.यासंदर्भात छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, येवला शहर, तालुक्यातील ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तसेच मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाºया जलाशयांमधील पाणीसाठा संपत आल्यामुळे येवला शहारासोबतच ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून असलेली गावे तसेच मनमाड शहरात पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. जवळपास आठवडाभर पुरेल एवढा पाणीसाठा या जलाशयांमध्ये शिल्लक आहे. पालखेड धरणसमूहामध्ये येवला, मनमाड व निफाड येथील बिगरसिंचन योजनांसाठी पाणी आरक्षित असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.येवला व मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाºया जलाशयांसोबतच येवला व निफाड तालुक्यातील प्रासंगिक आरक्षण असलेले बंधारे भरून दिल्यास अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे येवला, मनमाड शहर तसेच येवला व निफाड तालुक्यातील पाणीप्रश्न लक्षात घेऊन पालखेड डाव्या कालव्यातून लवकरात लवकर आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या पत्रात केली आहे.