शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी प्रयत्न करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 00:18 IST

आम्हाला शेतकऱ्यांना कायमस्वरूपी चिंतामुक्त करायचे आहे. शेतकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी नियोजन चालू आहे. शेतकºयांची दु:खे कायमची दूर व्हावीत म्हणून उपाययोजना करण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे. या कामास कदाचित वेळ लागेल; परंतु आपण यात नक्कीच यशस्वी होऊ, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दादाभुसे यांनी केले.

ठळक मुद्देदादा भुसे : ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन

मालेगाव : आम्हाला शेतकऱ्यांना कायमस्वरूपी चिंतामुक्त करायचे आहे. शेतकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी नियोजन चालू आहे. शेतकºयांची दु:खे कायमची दूर व्हावीत म्हणून उपाययोजना करण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे. या कामास कदाचित वेळ लागेल; परंतु आपण यात नक्कीच यशस्वी होऊ, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.मालेगाव शहर व तालुक्यातील विविध ज्येष्ठ नागरिक संघटनांतर्फे कृषिमंत्री आमदार दादा भुसे यांचा रविवारी ज्येष्ठ नागरिक सभागृहात सत्कार करण्यात आला. त्यावेळी भुसे बोलत होते. अध्यक्षस्थानी बी.के. नागपुरे होते.निंबा सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मालेगाव ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष डी. आर. हिरे, सौंदाणे ज्येष्ठ नागरिक संस्थेचे एस. एस. देवरे, स्वामी विवेकानंद ज्येष्ठ नागरिक संस्था सोयगावचे अध्यक्ष पी.बी. कुलकर्णी, खडकी, ज्येष्ठ नागरिक संस्थेचे हरी सावंत, पाटणे ज्येष्ठ नागरिक संस्थेचे हरिदास आहिरे, झोडगे ज्येष्ठ नागरिक संस्थेचे गुलाबराव देसले, सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संस्था सायन्याचे काळू सावंत, तालुका पेन्शनर संघटनेचे वाय. जी. अहिरराव, विनायक ज्येष्ठ नागरिक संघटनेचे प्रभाकर वारुळे, कौळाणचे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे जगन्नाथ बच्छाव, पुरुषोत्तम ठाकूर, जलसेवा कर्मचारी संघटनेचे पिंजन, बुवा दादा शिक्षण संस्थेचे व्ही.आर. पाटील, आश्रय संस्थेचे श्यामकांत पाटील, मालेगाव महानगरपालिका पेन्शनर शिक्षक संघटनेचे वाय. व्ही. वाघ आदींनी भुसे यांचा सत्कार केला. प्रा. पद्मा वाव्हळ, शालिनी डहाळे, नलिनी माळी, रोहिदास, कमलाकर चौधरी, दत्तात्रय परचुरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन भगवान बागुल यांनी केले. सुखदेव देवरे यांनी आभार मानले.भुसे म्हणाले, कृषी विभाग हा खूप मोठा विभाग आहे. या विभागाच्या योजना इतर विभागांवर अवलंबून आहेत. राज्यात कधी जास्त तर कधी कमी पाऊस पडतो, कधी गारपीट होते, कधी पिकांवर रोगराई येते. अशा विविध कारणांनी राज्यातील शेतकरी दुष्टचक्र ात अडकतो. या सर्व प्रश्नांवर मात करण्यासाठी सर्व विभागांशी समन्वय साधावा लागतो. कृषी विद्यापीठातील संशोधकांनी शेतकरी हितासाठी केलेले संशोधन शेतकºयांपर्यंत जावे म्हणून आपण सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :Politicsराजकारण