शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

धर्मनिरपेक्षतेसाठी देशाचे हिंदूकरण व्हावे

By admin | Updated: May 29, 2015 00:07 IST

योगी आदित्यनाथ : विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे व्याख्यान

नाशिक : देशात मुस्लिमांचा प्रभाव वाढला असून, हिंदूंची एकता नसल्याने अखंड भारत विखुरला आहे. जम्मू-काश्मीर या राज्यामधून तर केव्हाच हिंदूंना बाहेर काढले असून, पूर्वेत्तर राज्यांमध्ये धर्मांतराचे प्रमाण वाढले आहे. याविरोधात कोणीही बोलण्यास तयार नसल्याने हा देश खरच धर्मनिरपेक्ष आहे काय? असा प्रश्न पडतो. धर्मनिरपेक्षतेसाठी देशाचे हिंदूकरण व्हायला हवे, असे प्रतिपादन खासदार योगी आदित्यनाथ यांनी केले.भद्रकाली येथील साक्षी गणेश मंदिर येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ‘हिंदूत्त्व’ या विषयावर ते बोलत होते. पुढे बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, इस्लामिक मानसिकता जिहादची असून, मनुष्य संपविण्याची त्यांची वृत्ती आहे. त्यामुळे देशाच्या शालिनतेसाठी राष्ट्रवादाचा ध्यास धरायला हवा. त्यासाठी हिंदूत्त्वाचा पुरस्कार करण्याची गरज आहे. वास्तविक देशात समान कायदा असता तर अल्पसंख्याक आणि इतर वर्ग असा कधीही भेदभाव झाला नसता. थोडक्यात हिंदूकरण झाल्याशिवाय रामराज्य येणार नाही, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. तसेच त्यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर निशाना साधत त्यांच्या आगतिक राजकारणामुळेच भारताची दैना झाल्याचेही सांगितले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे शहरमंत्री मनोज जोशी, अपर्णा रामतीर्थकर, मृणाल बोडके, अमोल वडनेरे, माधव राठी, एकनाथ शेटे, गणेश सपकाळ आदि उपस्थित होते.