शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

कमी शिकला पण उमेदवारीत टिकला

By admin | Updated: February 12, 2017 22:30 IST

मालेगाव तालुका : केवळ १५ पदवीधर; ११ अशिक्षित तर उर्वरित जेमतेम शिकलेले

किशोर इंदोरकर मालेगाव कॅम्पजिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मैदानात उतरलेल्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आश्चर्यचकित करायला लावणारी आहे. एकूण १५१ उमेदवारांमध्ये फक्त १५ उमेदवार पदवीधर असून, ११ उमेदवारांनी शाळेचे तोंडही पाहिलेले नाही. उर्वरित उमेदवारांचे शिक्षण पाचवी ते बारावीपर्यंत झालेले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीमधील सर्वच उमेदवारांचे शिक्षण सुमार जेमतेम झाले आहे. यात कोणीही उच्चशिक्षित नाही. तालुक्यातील जिल्हा परिषदमधील सात गटांमध्ये अद्याप माघारीपूर्व ५३ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी फक्त चार उमेदवार पदवीधर आहेत, तर पदव्युत्तर चार, बारावी झालेले १५, दहावी झालेले १२ व पाचवी ते नववीपर्यंत शिक्षण झालेले तब्बल १६ उमेदवार आहेत. दोन उमेदवारांनी तर शाळेचे तोंड पाहिलेले नाही. यात प्रमुख लढत असलेल्या शिवसेना-भाजपाने अनेक पाचवी ते नववीपर्यंत शिक्षण झालेले व शाळेत न गेलेल्या उमेदवारांना आपल्या पक्षांची तिकिटे देऊन उमेदवारी बहाल केली. हीच स्थिती १४ गणांमध्येही अशीच आहे. गणांमध्ये विविध पक्षांचे एकूण ९८ व अपक्ष उमेदवार रिंगणात असून, या उमेदवारांमध्ये पदवीधर- ११, पदव्युत्तर- ९, बारावी- १७, दहावी- २०, तर पाचवी ते नववीपर्यंत शिक्षण झालेले तब्बल ३२ व अशिक्षित ९ उमेदवार रिंगणात आहेत. येथेही उच्चशिक्षित उमेदवारांचा अभाव दिसून येतो. येथे शिवसेना, भाजपातर्फे अनेक अल्पशिक्षित उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. १४ गणांमधील चिखल ओहोळ या नागरिकांचा मागास प्रवर्ग गणामध्ये एकूण सहा उमेदवार आहेत. यातील एकाही उमेदवाराने दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले नाही. यात चार उमेदवार पाचवी व दोन उमेदवार नववीपर्यंत शिकलेले आहेत. तीच परिस्थिती दाभाडी अनुसूचित जाती महिला या गटात पाच उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचीही दहावीपर्यंत मजल मारलेली नाही. यातील एक उमेदवार नववी, दोन उमेदवार पाचवीपर्यंत शाळा केली आहे. तर उर्वरित दोन उमेदवारांनी शाळेचे तोंडही पाहिलेले नाही. यातील एका उमेदवार भाजपाकडून उमेदवारी करत आहे. यामध्ये एकूण निवडणुकीत १५१ उमेदवार असले तरी माघारीनंतर ही संख्या कमी होणार आहे.