शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या ३०२ शाळांमध्ये २० पेक्षाही कमी पटसंख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:16 IST

जिल्हा परिषदेच्या शाळातील विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. मात्र, इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढत्या कलमुळे ...

जिल्हा परिषदेच्या शाळातील विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. मात्र, इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढत्या कलमुळे झेडपीच्या प्राथमिक शाळांमधील पटसंख्या कमी होत आहे. त्यातच कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण पद्धती सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या तुलनेत खासगी शाळा याबाबतीत पुढे आहेत. त्यामुळे एकीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळा व त्यांची पटसंख्याही वाढत असताना दुसरीकडे जिल्हा परिषद शाळेत कुठे १०, तर २० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने सर्व जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येबाबत अहवाल मागितला होता. यात जिल्ह्यातील ३०२ शाळांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या असल्याचे समोर आले आहे. अशा शाळांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत नव्या सत्रात या शाळांचे समायोजन तर केले जाणार नाही ना असा प्रश्न विद्यार्थी, पालक व शिक्षकांना भेडसावत असताना नाशिक जिल्ह्यातील २० पटसंख्येपेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या बहुतांश शाळा अतिदुर्गम व परिसरात दुसरी शाळा नसलेल्या भागात असल्या भागात असल्याने या शाळा समायोजनाचा निकषांना अनुसाून बंद होणार नसल्याचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

पॉइंटर -

जिल्हा परिषदेच्या एकूण शाळा - ३२००

२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा- ३०२

पटसंख्येअभावी यापूर्वी बंद झालेल्या शाळा -०००

कोट-

नाशिक जिल्ह्यातील ३०२ शाळांमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थीसंख्या आहेत. मात्र यातील बहुतांश सर्वच शाळा अतिदुर्गम आणि जवळपास अन्य शाळा नसलेल्या भागात आहे. त्यामुळे समायोजनाच्या निकषांमुळे यातील कोणतीही शाळा बंद होण्याची शक्यता नाही. तसेच शासनाकडून या शाळा बंद करण्यासंदर्भात कोणत्याही सूचना प्राप्त नाही. शासनांच्या सूचनांनुसारच या शाळांविषयी निर्णय घेतला जाईल.

- राजीव म्हसकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक नाशिक जिल्हा परिषद

इन्फो

पालकांना तूर्तास दिलासा

शासन निर्णयानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद कराव्या लागणार आहेत. शासनाच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार किमान ४०० ते ५०० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा आता तयार होणार आहेत. परंतु जिल्ह्यातील कमी पटसंख्येच्या शाळा अद्याप सुरू असल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे.

इन्फो

समायोजनाच्या विद्यार्थी पटसंख्येच्या नियमांनुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील शाळा बंद अद्याप बंद करण्यात आलेल्या नाहीत. तसेच या साळांच्या समयोजनाबाबतही शासनाकडून सूचना नसस्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अशा शाळांमधील विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला आहे.

इन्फो -

समायोजनाच्या सूचनांची प्रतीक्षा

नाशिक जिल्ह्यातील २० पेक्षा कमी पटसंख्येच्या बहुतांश शाळा अतिदुर्गम व परिसरात अन्य शाळा नसलेल्या भागात आहेत. त्यामुळे या शाळांना समायोजनाचे अनेक निकष लागू होत नसल्याने समायोजन प्रक्रियेत यातील शाळा बंद होण्याची शक्यता कमीच असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केेले आहे. त्याचप्रमाणे या शाळांच्या समायोजनाविषयी शासनाच्या सूचनाही अद्याप शिक्षण विभागाला प्राप्त झालेल्या नाही.