शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

जिल्हा परिषदेच्या ३०२ शाळांमध्ये २० पेक्षाही कमी पटसंख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:16 IST

जिल्हा परिषदेच्या शाळातील विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. मात्र, इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढत्या कलमुळे ...

जिल्हा परिषदेच्या शाळातील विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. मात्र, इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढत्या कलमुळे झेडपीच्या प्राथमिक शाळांमधील पटसंख्या कमी होत आहे. त्यातच कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण पद्धती सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या तुलनेत खासगी शाळा याबाबतीत पुढे आहेत. त्यामुळे एकीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळा व त्यांची पटसंख्याही वाढत असताना दुसरीकडे जिल्हा परिषद शाळेत कुठे १०, तर २० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने सर्व जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येबाबत अहवाल मागितला होता. यात जिल्ह्यातील ३०२ शाळांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या असल्याचे समोर आले आहे. अशा शाळांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत नव्या सत्रात या शाळांचे समायोजन तर केले जाणार नाही ना असा प्रश्न विद्यार्थी, पालक व शिक्षकांना भेडसावत असताना नाशिक जिल्ह्यातील २० पटसंख्येपेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या बहुतांश शाळा अतिदुर्गम व परिसरात दुसरी शाळा नसलेल्या भागात असल्या भागात असल्याने या शाळा समायोजनाचा निकषांना अनुसाून बंद होणार नसल्याचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

पॉइंटर -

जिल्हा परिषदेच्या एकूण शाळा - ३२००

२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा- ३०२

पटसंख्येअभावी यापूर्वी बंद झालेल्या शाळा -०००

कोट-

नाशिक जिल्ह्यातील ३०२ शाळांमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थीसंख्या आहेत. मात्र यातील बहुतांश सर्वच शाळा अतिदुर्गम आणि जवळपास अन्य शाळा नसलेल्या भागात आहे. त्यामुळे समायोजनाच्या निकषांमुळे यातील कोणतीही शाळा बंद होण्याची शक्यता नाही. तसेच शासनाकडून या शाळा बंद करण्यासंदर्भात कोणत्याही सूचना प्राप्त नाही. शासनांच्या सूचनांनुसारच या शाळांविषयी निर्णय घेतला जाईल.

- राजीव म्हसकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक नाशिक जिल्हा परिषद

इन्फो

पालकांना तूर्तास दिलासा

शासन निर्णयानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद कराव्या लागणार आहेत. शासनाच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार किमान ४०० ते ५०० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा आता तयार होणार आहेत. परंतु जिल्ह्यातील कमी पटसंख्येच्या शाळा अद्याप सुरू असल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे.

इन्फो

समायोजनाच्या विद्यार्थी पटसंख्येच्या नियमांनुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील शाळा बंद अद्याप बंद करण्यात आलेल्या नाहीत. तसेच या साळांच्या समयोजनाबाबतही शासनाकडून सूचना नसस्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अशा शाळांमधील विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला आहे.

इन्फो -

समायोजनाच्या सूचनांची प्रतीक्षा

नाशिक जिल्ह्यातील २० पेक्षा कमी पटसंख्येच्या बहुतांश शाळा अतिदुर्गम व परिसरात अन्य शाळा नसलेल्या भागात आहेत. त्यामुळे या शाळांना समायोजनाचे अनेक निकष लागू होत नसल्याने समायोजन प्रक्रियेत यातील शाळा बंद होण्याची शक्यता कमीच असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केेले आहे. त्याचप्रमाणे या शाळांच्या समायोजनाविषयी शासनाच्या सूचनाही अद्याप शिक्षण विभागाला प्राप्त झालेल्या नाही.