शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

तारुखेडले गावात बिबट्या जेरबंद : निफाड तालुका

By admin | Updated: June 24, 2017 14:19 IST

गेल्या अनेक महिन्यानंतर वनविभागाच्या पिंजऱ्यात एक बिबट्या अडकल्याने तारुखेडले गावातील रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

नाशिक : मागील दोन महिन्यांपासून निफाड तालुक्यातील गोदाकाठ पंचक्रोशी परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. गेल्या अनेक महिन्यानंतर वनविभागाच्या पिंजऱ्यात एक बिबट्या अडकल्याने तारुखेडले गावातील रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.तारुखेडले गावातील एका ऊसाच्या शेताच्या बांधालगत असलेल्या एका शेतमजूराच्या घराजवळील अंगणात खेळणाऱ्या पाच वर्षीय बालिकेवर बिबट्याने संध्याकाळी हल्ला केला होता. या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संपुर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात होती. तेव्हापासून वनविभागाने या भागातील उसाच्या शेतांमध्ये पिंजरे लावले होते. या पिंजऱ्यांमध्ये बिबट्या अडकणार कधी? असा प्रश्न रहिवाशांना पडला होता. नागरिकदेखील बिबट्या जेरबंद होण्याची प्रतिक्षा करत होते. अखेर शनिवारी बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांचा जीव भांड्यात पडला. पुर्ण वाढ झालेला नर जातीचा बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे वनविभागाच्या सुत्रांनी सांगितले. काही दिवसांपुर्वीच चापडगाव, भुसे, मांजरगाव परिसरातदेखील रात्री आठ वाजेच्या सुमारास बिबट्याने पांथस्थांना दर्शन दिले होते. तारुखेडलेपासून काही अंतरावर असलेल्या तामसवाडी गावातही बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करीत चार कोकरू ठार केले होते. अद्यापही गोदाकाठ बिबट्याच्या दहशतीने थरथरला आहे. या भागात उसशेतीचे मोठे क्षेत्र असल्यामुळे बिबट्यांसाठी अन्न व निवारा या दोन्ही गोष्टी सहजरित्या उपलब्ध होत असल्यामुळे बिबट्यांची या भागात संख्या वाढल्याचा निष्कर्ष वनविभागाने काढला आहे. सातत्याने गस्त व पिंजरे जास्त संख्येने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांवर विश्वास दाखवून संबंधित परिसरात लावण्याची मागणी होत आहे.