शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

पिंजऱ्यावर धडका देत बिबट्याने गमावले सुळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:09 IST

इगतपुरी वनपरीक्षेत्रातील पिंपळगाव मोर गावाच्या शिवारात १ डिसेंबर रोजी पहाटे पिंजऱ्यात जेरबंद झालेला बिबट्या हा सुमारे साडेचार वर्षे वयाचा ...

इगतपुरी वनपरीक्षेत्रातील पिंपळगाव मोर गावाच्या शिवारात १ डिसेंबर रोजी पहाटे पिंजऱ्यात जेरबंद झालेला बिबट्या हा सुमारे साडेचार वर्षे वयाचा असून, हा बिबट्या जेरबंद झाल्यापासून अत्यंत आक्रमक आहे. जवळपास मागील एक महिन्यापासून लहानशा ट्रॅप पिंजऱ्यात बिबट्या कैदेत असल्याने तो अधिकच चिडखोर बनला आहे. या बिबबट्याने पिंजऱ्याच्या लोखंडी जाळीवर स्वत:चे डोके आदळून कपाळही काही दिवसांपूर्वी फोडून घेतले होते. उपचारानंतर ती जखम भरून आलीस असली, तरी बिबट्याने मात्र त्याचे दात या धडकांमध्ये कायमचे गमावले आहेत. एकूणच या लहानशा पिंजऱ्यात अडकल्यापासून बिबट्याची अधिकच वाताहत होताना दिसत आहे. या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करणे आता कदापि शक्य नाही. किंबहुना, ते मानवी जीवनासाठीही सुरक्षित नसल्यामुळे पुनर्वसन केंद्रात बिबट्याचे पुढील संगोपन केले जाणार आहे. मात्र, या बिबट्याचा बोरीवली किंवा जुन्नरचा प्रवासाला पश्चिम वनविभागाकडून ‘हिरवा कंदील’ कधी मिळेल? याकडे आता वन्यजीवप्रेमींचे लक्ष लागले आहे.

---इन्फो---

बोरीवली अन‌् माणिकडोह ‘हाउसफुल्ल’

बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील, तसेच जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट रेस्क्यू सेंटर सध्या हाउसफुल्ल झाले आहेत. बोरीवलीची एकूण क्षमता २४ बिबट्यांची असली, तरीही त्यांना संगोपनाकरिता काही पिंजरे रिकामे ठेवावे लागतात. त्यामुळे १८ बिबटे ठेवण्यापर्यंत तेथे बिबट्यांना स्वीकारले जाते. सध्या येथे १५ बिबटे असून, यामध्ये नाशिकचे तीन आहे. या ठिकाणी वैद्यकीय सोईसुविधाही तोकड्या आहेत. त्या तुलनेत माणिकडोह केंद्र मोठे असून, येथे ३६ बिबटे एकाच वेळी ठेवता येऊ शकतात आणि या केंद्रासाठी स्वतंत्र यंत्रणा व मनुष्यबळ कार्यरत आहे. मात्र, येथे सध्या ३४ बिबटे आहेत.

----कोट---

लहानशा पिंजऱ्यात बिबट्याला अधिक दिवस ठेवणे हे त्याच्या जिवावर बेतण्यासारखे आहे. जर बिबट्याने दात गमावले असतील, तर त्याचे पुढील आयुर्मानही एक प्रकारे कमी झाले आहे. या बिबट्याला अधिक आक्रमक होण्यास या लहान पिंजऱ्यातील कैद भाग पाडत आहे. त्यामुळे त्याला जुन्नर किंवा बोरीवलीला लवकर स्थलांतरित करणे गरजेचे आहे. या बिबट्याला कायमस्वरूपी आता पिंजऱ्यात ठेवणे हाच त्याच्यासाठी आणि मानवासाठी सुरक्षित पर्याय आहे. नाशिकला ‘रेस्क्यू सेंटर’ उभारले जावे, यासाठी २०१५ साली कृती आराखड्यात ही बाब प्रकर्षाने नमूद करण्यात आली आहे.

-विद्या अत्रेय, बिबट तज्ज्ञ, वाईल्ड लाइफ कॉन्झर्वेशन सोसायटी

---

फोटो आर वर २७बिबट्या नावाने सेव्ह.

--

स्पेशल स्टोरीचा टॅग वापरावा.