शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

कर्जमाफी मिळण्याची शक्यता बळावली !

By admin | Updated: March 11, 2017 23:28 IST

नाशिक : शेतकऱ्यांसाठी पूर्ण कर्जमाफीचे आश्वासन निवडणूक प्रचारात दिल्यामुळेच उत्तर प्रदेशात भाजपाला बहुमत मिळाले, असा दावा केला जात असून तोच धागा पकडून महाराष्ट्रातील शेतकरीही आशावादी झाले आहेत.

नाशिक : शेतकऱ्यांसाठी पूर्ण कर्जमाफीचे आश्वासन निवडणूक प्रचारात दिल्यामुळेच उत्तर प्रदेशात भाजपाला बहुमत मिळाले, असा दावा केला जात असून तोच धागा पकडून महाराष्ट्रातील शेतकरीही आशावादी झाले आहेत.  उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्याने या पक्षाचा सत्तास्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, भाजपाच्या या विजयाचा जितका आनंद कार्यकर्त्यांना झाला तितकाच आनंद शेतकरीही व्यक्त करीत आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणूक जाहीरनाम्यात भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. जाहीर सभांमधून त्याचा वारंवार उल्लेखही करण्यात आला. उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची घोषणा करणारे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातही सरकार असून, जो न्याय उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांसाठी लावला जात आहे, तोच न्याय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही लागू करून त्यांनाही कर्जमुक्त करावे, अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. अर्थातच हा निवडणूक जुमला असल्याचे समजून त्याबाबत फारसे कोणी मनावर घेत नसले तरी आता निवडणूक निकालानंतर भाजपाच्या हाती उत्तर प्रदेशची सत्ता आल्याने निवडणूक प्रचारात दिलेल्या आश्वासनांची त्यांना पूर्तता करावी लागणार आहे.