शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

एलईडी घोटाळा अन् रस्तोरस्ती अंधार काळा

By admin | Updated: February 1, 2017 01:06 IST

चौकशीचा फेरा : पथदीपांबाबत अद्यापही सर्वाधिक तक्रारी

नाशिक : मनसेच्या सत्ताकाळात साडेतीन वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेले पथदीप काढून त्याठिकाणी एलईडीच्या दिव्यांचा प्रकाश पाडण्याचा उद्योग केला गेला परंतु, सुमारे २०२ कोटी रुपयांच्या एलईडी फिटिंग्ज बसविण्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा ठपका ठेवत प्रकरण न्यायप्रवीष्ट झाले. गेल्या साडेतीन वर्षांत महापालिकेत एलईडीचा घोटाळा गाजला, त्यात उपअभियंता निलंबित झाला, मात्र अद्यापही एलईडीचा तिढा कायम आहे. परिणामी, अद्यापही शहरात ठिकठिकाणांहून बंद पथदीपांबाबतच्या तक्रारींचा पाऊस महापालिकेच्या अ‍ॅप्ससह तक्रार निवारण केंद्रावर पडत असतो. त्यामुळे महापालिका निवडणुकीत एलईडीचाही मुद्दा तापण्याची शक्यता आहे.  शहरात अस्तित्वात असलेले पथदीप काढून त्याठिकाणी वीज बिलाचा खर्च कमी करणारे आणि उजळणारे एलईडी दिव्यांची फिटिंग्ज बीओटी तत्त्वावर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी हैदराबाद येथील एमआयसी कंपनीला २०२ कोटी रुपयांचा ठेका दिला गेला. त्यानुसार, २८ आॅक्टोबर २०१३ रोजी त्याबाबतचे कार्यादेश काढण्यात आले. काही ठिकाणी एलईडी फिटिंग्ज बसविण्यास सुरुवात झाली परंतु, त्यांचा दर्जा निकृष्ट असल्याच्या तक्रारी महासभांमध्ये लोकप्रतिनिधींनी केल्या आणि तेथूनच एलईडीचा घोटाळाही समोर आला.  एलईडी फिटिंग्ज बसविण्यासंबंधी देण्यात आलेला ठेका हा संशयास्पद असल्याचा आरोप सदस्यांकडून महासभेत झाला. सदर कंपनीला ८० कोटी रुपयांच्या दिलेल्या बॅँक गॅरंटीने वादाला तोंड फुटले आणि प्रकरण पुढे न्यायप्रवीष्ट होऊन फिटिंग्ज बसविण्याला ब्रेक बसला. सुमारे ६५ हजार एलईडीऐवजी केवळ २०० ते २५० फिटिंग्ज बसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. एलईडीप्रकरणाचा फटका शहराला बसला आणि ठिकठिकाणी रस्त्यांवर खांब आहेत पण त्यावर दिवे नाहीत, अशी अभूतपूर्व परिस्थिती उद्भवली. प्रवीण गेडाम आयुक्तपदी असताना त्यांनी एलईडी घोटाळ्याचा परिणाम शहरातील वीज व्यवस्थेवर होऊ नये यासाठी सुमारे ३ कोटी रुपये खर्चाला महासभेकडून मंजुरी मिळवून दिवेलागणीची व्यवस्था केली. परंतु, अद्यापही शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे नोंदविल्या जात असतात. अंधारामुळे गुन्हेगारांना संधी मिळून गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे मनसेच्या सत्ताकाळात गाजलेला एलईडी घोटाळा महापालिका निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.