शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडणार

By admin | Updated: November 1, 2015 22:19 IST

गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडणार

 नाशिक : महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या निर्णयानुसार आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी अखेर गंगापूर धरणातून १.३६ टीएमसी पाणी रविवारी मध्यरात्रीनंतर सोडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने रात्री उशिरा घेतला आहे. पाण्याचा विसर्ग होणार असल्याने गोदाकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नदीपात्रालगतच्या शेतकऱ्यांकडून विरोध होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करतानाच विद्युतपुरवठाही खंडित केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिली. दोन आठवड्यांपूर्वी औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या निर्णयानुसार आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने केलेल्या नियोजनानुसार नाशिक व नगर जिल्'ातून सुमारे १२.८४ टीएमसी पाणी जायकवाडी धरणासाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यात नाशिक जिल्'ातील गंगापूर तसेच गिरणा खोऱ्यातून ४.३६ टीएमसी पाणी सोडावे लागणार असल्याने या निर्णयाला सर्वपक्षीय विरोध झाला, तर नगरच्या पाण्याबाबत थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेची गेल्या शुक्रवारी (दि.३०) सुनावणी होऊन न्यायालयाने याचिका फेटाळल्या, परंतु जायकवाडीसाठी फक्त पिण्यासाठी पाणी सोडा, असे आदेश दिले. यापूर्वी जायकवाडी धरणात सोडण्यात येणारे पाणी पिण्यासाठी व सिंचन तसेच उद्योगासाठी सोडण्यात येणार होते, मात्र न्यायालयाने फक्त पिण्यासाठीच पाणी सोडा, असे सांगितल्यामुळे जायकवाडी धरणात पिण्यासाठी किती पाणी लागेल याचा आढावा घेण्यात येत होता. दरम्यान, रविवारी रात्री उशिरा जिल्हाधिकाऱ्यांकडे पोलीस आयुक्त, ग्रामीण पोलीस अधीक्षक, महावितरण आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक होऊन गंगापूर धरणातून जायकवाडी धरणासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या निर्णयानुसार १.३६ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, रविवारी मध्यरात्रीनंतर गंगापूर धरणातून ३००० क्यूसेक या दराने (सरासरी ८५०० लिटर प्रतिसेकंद) पाण्याचा विसर्ग होणार असून, गोदाकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही गोदाकाठ परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत शिवाय पोलीस बंदोबस्तात पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे.