शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

खरिपासाठी कडवाचे आवर्तन सोडा

By admin | Updated: September 20, 2014 00:37 IST

शेतकऱ्यांची मागणी : उन्हाचा तडाख्याने कोमजू लागली पिके

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील खरीप हंगामातील पिके उन्हाच्या तडाख्याने कोमेजू लागली आहेत. पावसाअभावी जलस्रोत ठणठणीत कोरडे पडल्याने पिके वाचविण्यासाठी पाटबंधारे विभागाने खरीप हंगामासाठी कडवा कालव्याचे आवर्तन सोडावे, अशी एकमुखी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन पाटबंधारे विभागाचे अधिकारी व तहसीलदारांना देण्यात आले आहे. या भागातील खडांगळी, मेंढी, निमगाव (देवपूर) पंचाळे, पिंपळगाव (धनगरवाडी), श्रीरामपूर (शिंदेवाडी), रामपूर (पुतळेवाडी), उज्जनी आदि परिसर कडवा कालव्याच्या सिंचन लाभ क्षेत्रात येत आहे. मात्र या भागात गेल्या तीन वर्षांपासून पावसाने पाठ फिरविली आहे. यंदा सलग चौथ्यावर्षीही त्याची पुनरावृत्ती झाल्याने केवळ रिमझिम पावसावर पेरण्या उरकल्या आहेत. अत्यल्प पावसावर पिके जोमदार आली असली तरी आता उन्हाची तीव्र वाढू लागली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने या भागातील नद्या, बंधारे, पाझरतलाव व विहिरी आदि जलस्रोत ठणठणीत कोरडे पडले आहे. त्यामुळे खरीप हंगामातील ऐन बहरात आलेल्या खरीप हंगामातील पिके वाचविण्यासाठी पाणी कसे द्यायचे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. तालुक्याच्या पश्चिम व इगतपुरी तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने कडवा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्याचे ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले होते. मात्र ते पाणी पिकांना देण्यात आले नाही. आता पूरपाणी बंद करण्यात आले आहे. रिमझिम पावसाने उघडीप दिली असून, भाद्रपदातील कडक उन्हाची तीव्र वाढली आहे. उन्हामुळे पिके कोमेजू लागली असून, त्यांना पाण्याची गरज आहे. आता पाणी मिळाले नाही, तर यंदाचा खरीप हंगामही वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यंदा दोन महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावली आहे. त्यातही हा पाऊस तालुक्याच्या पश्चिम भागातच समाधानकारक झाला आहे. पूर्व भागात यंदा एकही जोरदार पाऊस झाला नसल्याने जलस्रोत भरले नाही. परिणामी भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. विहिरींना पाणी नाही. ‘विहिरीतच नाही, तर पोहऱ्यात कोठून येणार’ या उक्तीप्रमाणे पिकांना पाणी देण्यासाठी कडवाच्या आवर्तनाचा एकमेव पर्याय आहे. त्यासाठी पाटबंधारे विभागाने पूर्वभागातील पिके वाचविण्यासाठी कालव्याला त्वरित आवर्तन सोडावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे बाबासाहेब सापनर, रवींद्र पगार, पिंपळगावचे सरपंच गोवर्धन शिंदे, उज्जनीचे सरपंच नारायण सापनर, धनंजय थोरात, शिवाजी तळेकर, दत्ता पगार, निमगाव विकास संस्थेचे अध्यक्ष नवनाथ मुरडनर, किसन सापनर, भागवत सोनवणे, पुतळेवाडीचे सरपंच आबा जाधव, उपसरपंच सोपना वाईकर, कल्याण गिते, बाळासाहेब खैरनार आदींसह परिसरातील शेतकऱ्यांच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. (वार्ताहर)