शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

खरिपासाठी कडवाचे आवर्तन सोडा

By admin | Updated: September 20, 2014 00:37 IST

शेतकऱ्यांची मागणी : उन्हाचा तडाख्याने कोमजू लागली पिके

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील खरीप हंगामातील पिके उन्हाच्या तडाख्याने कोमेजू लागली आहेत. पावसाअभावी जलस्रोत ठणठणीत कोरडे पडल्याने पिके वाचविण्यासाठी पाटबंधारे विभागाने खरीप हंगामासाठी कडवा कालव्याचे आवर्तन सोडावे, अशी एकमुखी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन पाटबंधारे विभागाचे अधिकारी व तहसीलदारांना देण्यात आले आहे. या भागातील खडांगळी, मेंढी, निमगाव (देवपूर) पंचाळे, पिंपळगाव (धनगरवाडी), श्रीरामपूर (शिंदेवाडी), रामपूर (पुतळेवाडी), उज्जनी आदि परिसर कडवा कालव्याच्या सिंचन लाभ क्षेत्रात येत आहे. मात्र या भागात गेल्या तीन वर्षांपासून पावसाने पाठ फिरविली आहे. यंदा सलग चौथ्यावर्षीही त्याची पुनरावृत्ती झाल्याने केवळ रिमझिम पावसावर पेरण्या उरकल्या आहेत. अत्यल्प पावसावर पिके जोमदार आली असली तरी आता उन्हाची तीव्र वाढू लागली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने या भागातील नद्या, बंधारे, पाझरतलाव व विहिरी आदि जलस्रोत ठणठणीत कोरडे पडले आहे. त्यामुळे खरीप हंगामातील ऐन बहरात आलेल्या खरीप हंगामातील पिके वाचविण्यासाठी पाणी कसे द्यायचे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. तालुक्याच्या पश्चिम व इगतपुरी तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने कडवा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्याचे ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले होते. मात्र ते पाणी पिकांना देण्यात आले नाही. आता पूरपाणी बंद करण्यात आले आहे. रिमझिम पावसाने उघडीप दिली असून, भाद्रपदातील कडक उन्हाची तीव्र वाढली आहे. उन्हामुळे पिके कोमेजू लागली असून, त्यांना पाण्याची गरज आहे. आता पाणी मिळाले नाही, तर यंदाचा खरीप हंगामही वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यंदा दोन महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावली आहे. त्यातही हा पाऊस तालुक्याच्या पश्चिम भागातच समाधानकारक झाला आहे. पूर्व भागात यंदा एकही जोरदार पाऊस झाला नसल्याने जलस्रोत भरले नाही. परिणामी भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. विहिरींना पाणी नाही. ‘विहिरीतच नाही, तर पोहऱ्यात कोठून येणार’ या उक्तीप्रमाणे पिकांना पाणी देण्यासाठी कडवाच्या आवर्तनाचा एकमेव पर्याय आहे. त्यासाठी पाटबंधारे विभागाने पूर्वभागातील पिके वाचविण्यासाठी कालव्याला त्वरित आवर्तन सोडावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे बाबासाहेब सापनर, रवींद्र पगार, पिंपळगावचे सरपंच गोवर्धन शिंदे, उज्जनीचे सरपंच नारायण सापनर, धनंजय थोरात, शिवाजी तळेकर, दत्ता पगार, निमगाव विकास संस्थेचे अध्यक्ष नवनाथ मुरडनर, किसन सापनर, भागवत सोनवणे, पुतळेवाडीचे सरपंच आबा जाधव, उपसरपंच सोपना वाईकर, कल्याण गिते, बाळासाहेब खैरनार आदींसह परिसरातील शेतकऱ्यांच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. (वार्ताहर)