शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

‘बीच रास्ते में छोड दिया, यह कैसी व्यवस्था है?’

By admin | Updated: September 26, 2015 00:08 IST

‘बीच रास्ते में छोड दिया, यह कैसी व्यवस्था है?’

नाशिक : हमे त्र्यंबक जाना था, लेकिन बीच में उतार दिया अब बारा किलोमीटर कैसे जाएंगे, यह कैसी व्यवस्था है, कैसी सरकार है? असा प्रश्न करीत शासकीय यंत्रणांच्या घोळामुळे संताप व्यक्त करणाऱ्या भाविकांनी शासनाला शिव्यांची लाखोली वाहिली आणि सर्व पर्वण्या सुरळीत पार पडल्या असताना त्र्यंबकेश्वरच्या अखेरच्या पर्वणीत मात्र नाचक्कीला सामोरे जावे लागले.कुंभमेळ्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने साडेसहाशे बसगाड्यांचे नियोजन केले होते. अखेरच्या पर्वणीस भाविकांची संख्या जास्त असेल असा अगोदरच अंदाज बांधला जात होता. त्यामुळे खासगी वाहतुकीला खंबाळे, पहिने आणि अंबोली घाटात अडविण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर असलेल्या खंबाळे येथील वाहनतळावर गुरुवारी सकाळपासूनच खासगी मोटारी अडविण्यात आल्या होत्या. परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांनीच पुढे प्रवास करावा असे नियोजन होते; मात्र प्रत्यक्षात सारेच नियोजन बदलण्यात आले. कुंभमेळ्यातील भाविकांना त्र्यंबकजवळील सिंहस्थ बसस्थानकापर्यंत नेले जाईल असे सांगण्यात आले. परंतु दुसरीकडे मात्र खंबाळे या बाह्य वाहनतळावर प्रवाशांना सोडून अंतर्गत वाहनतळापर्यंत नेण्याची कोणतीही व्यवस्था केली नाही. परिणामी, खंबाळे ते त्र्यंबकेश्वर अशी तब्बल बारा किलोमीटर पायपीट करावी लागल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. कुटुंब कबिला आणि मित्र परिवारासमवेत त्र्यंबकेश्वर येथे जाऊन पुण्य पदरी पाडून घेण्याऐवजी मनस्तापच नशिबी आला.खंबाळा येथून त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या भाविकांची दुतर्फा रीघ लागली होती. त्यात अनेकांना किती किलोमीटर पायपीट करावी लागणार याचीही कल्पना नव्हती. अनेकांनी रस्त्यावरच ठाण मांडले. भाविकांना रस्त्यावर सोडून देणाऱ्या महामंडळाने त्यांना पुढील मार्गदर्शन केले नव्हते, परंतु त्यापेक्षाही संतापजनक म्हणजे नाशिकहून काही बसगाड्या थेट नाशिकहून प्रवाशांनी भरून पाठविल्या जात होत्या. या बसगाड्यांच्या टपावर बसवून आणि मागील बाजूस शिडीला लोंबळकून भाविक प्रवास करीत होते. एकीकडे भाविकांना बाह्य वाहनतळावर सोडून रिकाम्या जाणाऱ्या बस आणि दुसरीकडे बसच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची होत असलेली वाहतूक यामुळे पायपीट करणाऱ्या भाविकांनी संताप व्यक्त केला. (प्रतिनिधी)