शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

कांद्याला किमान तीन हजार रु पये प्रतिक्ंिवटल भाव हवा

By admin | Updated: July 21, 2014 01:10 IST

कांद्याला किमान तीन हजार रु पये प्रतिक्ंिवटल भाव हवा

 

लासलगाव : केंद्र सरकार कांदा भाववाढीचा मोठा गहजब करीत असून, कांदा उत्पादकांच्या बाबतीत सरकार रडीचा डाव खेळत आहे. शहरी ग्राहकांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी जर सरकार कांद्यावर निर्बंध लादणार असेल तर कांद्याला किमान तीन हजार रुपये प्रतिक्ंिवटल भाव द्यायलाच हवा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी केली आहे.लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शेतकरी संघटनेचे मराठवाडा विभागप्रमुख कालिदास आपटे, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजी नांदखिले, बाळासाहेब पटारे, शंकर गायकवाड, लासलगाव खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम मेमाणे, लासलगाव बाजार समितीचे सचिव बी. वाय. होळकर आदिंसह शेतकरी संघटनेचे राज्यातील महत्त्वाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.निवडणूक काळात भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा देण्याचे जाहीर केले होते. सध्या कांद्यासह इतर शेतमालाच्या बाजारभावाची परिस्थिती पाहता केंद्रातील सरकार आपल्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासत असून, शेतकरी संघटना ही फसवणूक कदापि सहन करणार नसल्याचा सुतोवाच शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा हा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही, असे पाटील म्हणाले.ज्या वस्तूंचा समावेश जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत केला जातो त्या मालाला हमीभाव देणे बंधनकारक आहे. कांद्याला जीवनावश्यकच्या यादीत टाकण्याच्या घोषणेला पंधरवडा उलटून गेला तरी हमीभाव जाहीर न झाल्याने केंद्र शासनाच्या कांदा विषयक धोरणाविषयी शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष खदखदत असल्याचे चित्र आहे. जर शासन तीन हजार रुपये हमीभाव देणार नसेल तर सरकारने कांद्याच्या बाबतीत हस्तक्षेप करणे चुकीचे असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. गारपिटीमुळे उन्हाळ कांद्याचे एकरी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले असून, सध्या कांद्याचे दर वाढले असल्याचे शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.