शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

जलकुंभाला जोडलेल्या जलवाहिनीला गळती

By admin | Updated: October 24, 2015 22:06 IST

हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया

पंचवटी : यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणातील जलसाठा लक्षात घेऊन प्रशासनाने काही दिवसांपासून पाणीकपात केली खरी; मात्र हिरावाडीतील पाण्याच्या पाटालगत गेल्या अनेक महिन्यांपासून जलकुंभाला जोडल्या जाणाऱ्या जलवाहिनीला गळती लागल्याने दैनंदिन हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे जलकुंभाला जोडली जाणारी ही जलवाहिनी असून, तिलाच गळती लागल्याने पाणीकपातीचा फायदा काय, असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वजे्रश्वरी ते हिरावाडी पाण्याच्या पाटालगत असलेल्या जलवाहिनीला गळती लागली असली तरी, याकडे पाणीपुरवठा विभागाचे लक्ष वेधले गेले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. धरणात जलसाठा कमी असल्याच्या कारणावरून प्रशासनाने एकवेळ पाणीकपात केली आहे. परंतु हिरावाडी पाण्याच्या पाटालगत जलवाहिनीला गळती लागलेली असल्याने पाणी बचतीपेक्षा अधिकच वाया जात आहे. पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष झाल्याने पाणी गळती थांबविणार कोण? असा सवाल नागरिकांनी केला आहे. एकीकडे मनपा प्रशासन पाणी बचतीबाबत जनजागृती करत असले तरी दुसरीकडे पाणी गळतीकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. (वार्ताहर)