शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

पाझर तलाव, नदी, नाले कोरडी ठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 15:23 IST

खर्डे : खर्डेसह परिसरात अद्याप दमदार पाऊस झाला नसल्याने छोटे मोठे पाझर तलाव व नदी नाले कोरडी ठाक असल्याने शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे . पावसाळा सुरू होऊन दोन महिने होत आले असतांनाही खर्डे व परिसरात दमदार पाऊस पडला नाही . यामुळे पाणी टंचाईचे संकट मिटण्याची चिन्हे दिसत नसल्याने नागरिकांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरूच आहे .

ठळक मुद्दे खर्डे : परिसरात दमदार पाऊस झाला नसल्याने चिंता

खर्डे : खर्डेसह परिसरात अद्याप दमदार पाऊस झाला नसल्याने छोटे मोठे पाझर तलाव व नदी नाले कोरडी ठाक असल्याने शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे . पावसाळा सुरू होऊन दोन महिने होत आले असतांनाही खर्डे व परिसरात दमदार पाऊस पडला नाही . यामुळे पाणी टंचाईचे संकट मिटण्याची चिन्हे दिसत नसल्याने नागरिकांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरूच आहे . मध्यंतरी झालेल्या पेरणीयुक्त पावसामुळे या परिसरात पेरण्या पूर्ण झाल्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे . तर दुसरीकडे मजुर वर्गाच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे . खर्डेसह ,कणकापूर ,शेरी ,वार्शी , मुलूकवाडी ,कांचणे व हनुमंतपाडा या ठिकाणी समाधानकारक पाउस नसल्याने नदी ,नाले व छोटी मोठी पाझर तलाव कोरडी ठाक पडली आहेत . खर्डे गावाला वार्शी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या उद्धभव विहिरीतून पाणी पुरवठा करण्यात येत आहे .मात्र धरणात फक्त मृत साठा शिल्लक असून त्याचाही अवैध उपसा होत असल्याने त्याचा परिणाम पाणी पुरवठाच्या विहिरीवर झाल्याने त्या लगतची विहीर अधिग्रहित करण्यात येऊन चार पाच दिवसाआड खर्डे गावाला पाणी पुरवठा करण्यात येत आहे . तोही मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने नागरीकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे .यामुळे धरण उशाशी कोरड घशाशी अशी म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली असून , परिसरात पाण्याचे संकट दूर होण्यासाठी मुसळधार पाऊस पडण्याच्या प्रतीक्षेत नागरिक आहेत . हा परिसर तसा डोंगर पायथ्याशी असतांना दिवसेंदिवस कमी होत असलेल्या पर्जन्यमानामुळे येथील नागरिकांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असल्याने याठिकाणी नवीन सिंचन प्रकल्प होणे आवश्यक आहे .