शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

पालेभाज्या-फळभाज्या महागल्या

By admin | Updated: July 3, 2014 00:09 IST

पालेभाज्या-फळभाज्या महागल्या

 

नाशिक : जून महिन्यात वरुणराजाने उघडीप दिल्यामुळे बळीराजासह सर्वांनाच पावसाची ओढ लागली आहे. पालेभाज्या-फळभाज्या यांच्या उत्पादनासाठी जूनमध्ये आलेला पाऊस पूरक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे; मात्र जून महिना संपला असून जुलै महिना सुरू झाला; मात्र अद्याप शहरासह जिल्ह्यात कोठेही वरुणराजाची कृपादृष्टी झाली नसल्याने शेतमालाची आवक बाजारात घटल्याने पालेभाज्या, फळभाज्यांची मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली आहे.जून महिन्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यांमध्ये पावसाने हजेरी लावणे सर्वांनाच अपेक्षित असते; मात्र पावसाने ओढ दिल्यामुळे त्याचा परिणाम धरणामधील जलसाठ्याबरोबर विहिरींच्या पाण्याच्या पातळीवरही परिणाम झाल्याने शेतमालाच्या उत्पादनाची आवकही घटल्याने बाजारात पालेभाज्या, फळभाज्या कडाडल्या असून, सर्वसामान्यांना खरेदी करणे अवघड झाले आहे. शेपू, अंबाडी, चवळी, तांदुळका, पालक, मेथी, कोथिंबीर या सर्वच पालेभाज्यांच्या जुड्या महागल्या आहेत. बाजारात पालेभाज्यांची आवक घटल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनादेखील माल जास्त दराने खरेदी करावा लागत आहे. तसेच पालेभाज्याच्या एका जुडीमध्ये दोन जुड्या तयार करून निम्म्या किमतीमध्ये विक्री करावी लागत आहे. मोठी जुडी महाग असल्यामुळे ग्राहक खरेदी करत नाही. सर्वच पालेभाज्यांची मोठी जुडी १५ ते २० रुपये प्रति जुडीने विक्री होत आहे, तर यामधून निम्मी भाजीची केलेली लहान जुडी दहा रुपयाने किरकोळ बाजारात विक्री होत आहे. याचबरोबर कांदे, बटाटे, वांगे, शेवगा, ढोबळी मिरची, हिरवी मिरचीदेखील महागली आहे. कांदे २० रुपये व बटाटे पंचवीस रुपये किलोने किरकोळ बाजारात विकले जात आहे. (प्रतिनिधी)