शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पालेभाज्या-फळभाज्या महागल्या

By admin | Updated: July 3, 2014 00:09 IST

पालेभाज्या-फळभाज्या महागल्या

 

नाशिक : जून महिन्यात वरुणराजाने उघडीप दिल्यामुळे बळीराजासह सर्वांनाच पावसाची ओढ लागली आहे. पालेभाज्या-फळभाज्या यांच्या उत्पादनासाठी जूनमध्ये आलेला पाऊस पूरक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे; मात्र जून महिना संपला असून जुलै महिना सुरू झाला; मात्र अद्याप शहरासह जिल्ह्यात कोठेही वरुणराजाची कृपादृष्टी झाली नसल्याने शेतमालाची आवक बाजारात घटल्याने पालेभाज्या, फळभाज्यांची मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली आहे.जून महिन्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यांमध्ये पावसाने हजेरी लावणे सर्वांनाच अपेक्षित असते; मात्र पावसाने ओढ दिल्यामुळे त्याचा परिणाम धरणामधील जलसाठ्याबरोबर विहिरींच्या पाण्याच्या पातळीवरही परिणाम झाल्याने शेतमालाच्या उत्पादनाची आवकही घटल्याने बाजारात पालेभाज्या, फळभाज्या कडाडल्या असून, सर्वसामान्यांना खरेदी करणे अवघड झाले आहे. शेपू, अंबाडी, चवळी, तांदुळका, पालक, मेथी, कोथिंबीर या सर्वच पालेभाज्यांच्या जुड्या महागल्या आहेत. बाजारात पालेभाज्यांची आवक घटल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनादेखील माल जास्त दराने खरेदी करावा लागत आहे. तसेच पालेभाज्याच्या एका जुडीमध्ये दोन जुड्या तयार करून निम्म्या किमतीमध्ये विक्री करावी लागत आहे. मोठी जुडी महाग असल्यामुळे ग्राहक खरेदी करत नाही. सर्वच पालेभाज्यांची मोठी जुडी १५ ते २० रुपये प्रति जुडीने विक्री होत आहे, तर यामधून निम्मी भाजीची केलेली लहान जुडी दहा रुपयाने किरकोळ बाजारात विक्री होत आहे. याचबरोबर कांदे, बटाटे, वांगे, शेवगा, ढोबळी मिरची, हिरवी मिरचीदेखील महागली आहे. कांदे २० रुपये व बटाटे पंचवीस रुपये किलोने किरकोळ बाजारात विकले जात आहे. (प्रतिनिधी)