शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी रद्द; काही नाही स्वस्त

By admin | Updated: August 4, 2015 00:37 IST

कपडे वगळता इंधन, टायर्स, सौंदर्य प्रसाधने, स्टेशनरीचे दर ‘जैसे थे’

 नाशिक : महापालिका हद्दीत उद्योग व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांच्या मागणीनुसार जकातीपाठोपाठ एलबीटी रद्द करण्यात आला. त्यामुळे व्यापारी उद्योजक जितके सुखावले तितकेच नागरिकही स्वस्ताईच्या स्वप्नांनी हूरळून गेले. मात्र, एलबीटी रद्द होऊन आता तीन दिवस झाले, परंतु कोठेही या करापोटी होणारी वसुली थांबलेली नाही. त्यामुळे संबंधित वस्तूपोटी ग्राहकांकडून दोन ते तीन टक्के रक्कमेची बेकायदा वसुली सुरूच आहे. या साऱ्याच व्यावसायिकांनी आपल्याकडे जुनाच माल शिल्लक असल्याचे आणि कंपनीनेच एलबीटी वगळून आम्हाला माल विकला तरच स्वस्ताई होईल, असे सांगत मान सोडवून घेतली आहे. पूर्वी जकात हा कालबाह्य कर जिझीया कर असल्याची टीका व्यापारी-व्यावसायिक करीत होते. त्यामुळे २०१३ मध्ये राज्यशासनाने जकातीऐवजी स्थानिक संस्था कर म्हणजेच एलबीटी लागू केला. अर्थात, जकात रद्द झाली असली तरी दुसरा कोणता तरी कर लागू असल्याने व्यापारी उद्योजक त्रस्त होते. इतकेच नव्हे तर सरकारच्या कर धोरणामुळे इच्छा असूनदेखील ग्राहकांना स्वस्तात वस्तू विकता येत नाही, असे सांगून नागरिकांची कणव घेत होते, परंतु एखाद्या वस्तूचे दर वाढल्यानंतर लगेचच त्याची अंमलबजावणी करणारे व्यावसायिक दर कमी झाल्यानंतर मात्र लगेचच त्याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करतात, हेच चित्र येथेही दिसते आहे. कोणत्याही वस्तूच्या किमतीवर दोन ते तीन टक्के स्थानिक संस्था कर आकारणी होत असते. आता ती ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या उद्योग व्यवसायांना लागू असली तरी ज्यांना यातून सूट मिळाली तेही नागरिकांना दिलासा देण्याच्या तयारीत नसल्याचे ‘लोकमत’ने विविध व्यावसायिक आस्थापना आणि दुकानदारांना भेट दिल्यावर आढळले.