शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

एलबीटी रद्द; काही नाही स्वस्त

By admin | Updated: August 4, 2015 00:37 IST

कपडे वगळता इंधन, टायर्स, सौंदर्य प्रसाधने, स्टेशनरीचे दर ‘जैसे थे’

नाशिक : महापालिका हद्दीत उद्योग व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांच्या मागणीनुसार जकातीपाठोपाठ एलबीटी रद्द करण्यात आला. त्यामुळे व्यापारी उद्योजक जितके सुखावले तितकेच नागरिकही स्वस्ताईच्या स्वप्नांनी हूरळून गेले. मात्र, एलबीटी रद्द होऊन आता तीन दिवस झाले, परंतु कोठेही या करापोटी होणारी वसुली थांबलेली नाही. त्यामुळे संबंधित वस्तूपोटी ग्राहकांकडून दोन ते तीन टक्के रक्कमेची बेकायदा वसुली सुरूच आहे. या साऱ्याच व्यावसायिकांनी आपल्याकडे जुनाच माल शिल्लक असल्याचे आणि कंपनीनेच एलबीटी वगळून आम्हाला माल विकला तरच स्वस्ताई होईल, असे सांगत मान सोडवून घेतली आहे. पूर्वी जकात हा कालबाह्य कर जिझीया कर असल्याची टीका व्यापारी-व्यावसायिक करीत होते. त्यामुळे २०१३ मध्ये राज्यशासनाने जकातीऐवजी स्थानिक संस्था कर म्हणजेच एलबीटी लागू केला. अर्थात, जकात रद्द झाली असली तरी दुसरा कोणता तरी कर लागू असल्याने व्यापारी उद्योजक त्रस्त होते. इतकेच नव्हे तर सरकारच्या कर धोरणामुळे इच्छा असूनदेखील ग्राहकांना स्वस्तात वस्तू विकता येत नाही, असे सांगून नागरिकांची कणव घेत होते, परंतु एखाद्या वस्तूचे दर वाढल्यानंतर लगेचच त्याची अंमलबजावणी करणारे व्यावसायिक दर कमी झाल्यानंतर मात्र लगेचच त्याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करतात, हेच चित्र येथेही दिसते आहे. कोणत्याही वस्तूच्या किमतीवर दोन ते तीन टक्के स्थानिक संस्था कर आकारणी होत असते. आता ती ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या उद्योग व्यवसायांना लागू असली तरी ज्यांना यातून सूट मिळाली तेही नागरिकांना दिलासा देण्याच्या तयारीत नसल्याचे ‘लोकमत’ने विविध व्यावसायिक आस्थापना आणि दुकानदारांना भेट दिल्यावर आढळले.