शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी रद्दची घोषणा अडकणार कायद्याच्या कचाट्यात

By admin | Updated: August 3, 2015 23:41 IST

संभ्रमावस्था : आयुक्तांचे अधिकार वापरले शासनाने

नाशिक : राज्य शासनाने ५० कोटींच्या आतील उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांसाठी एलबीटी रद्द करण्याची घोषणा करत त्याची अंमलबजावणी सुरू केली खरी; परंतु सदर घोषणा आता कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली असून, माफी किंवा तडजोडीबाबत आयुक्तांचे अधिकार राज्य शासनाने वापरल्याबद्दल कायदेतज्ज्ञांनी घोषणेबाबत संभ्रम निर्माण झाला असल्याचे म्हटले आहे. राज्य शासनाने २३ जुलै रोजी अध्यादेश काढून ५० कोटींच्या वर उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना एलबीटी भरणे आणि त्यासाठी नोंदणी करणे अनिवार्य केले, तर ५० कोटींच्या आतील व्यापाऱ्यांना एलबीटी संपूर्ण रद्द करत त्यांना दिलासा दिला. याचवेळी शासनाने सदर अध्यादेशाबाबत हरकती व सूचनाही मागविल्या होत्या. सदर अध्यादेश जारी करताना शासनाने मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियमातील कलम १५२ (एन) नुसार सदर निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले होते, परंतु आता कायद्याचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी शासनाच्या या घोषणेबाबत कायद्याचा किस काढण्यास सुरुवात केली असून, राज्य शासनाने थेट आयुक्तांचे अधिकार वापरत कायद्याचा भंग केला असल्याचे मत व्यक्त केले आहे. कलम १५२ (एन) नुसार कर न भरणाऱ्या व्यापाऱ्यांना ४ ते १० पट दंड करण्याचा अधिकार आयुक्तांना असून, त्यात तडजोडीचेही अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. मात्र, राज्य शासनाने ५० कोटींच्या आतील व्यापाऱ्यांना सरसकट माफी देत एलबीटी रद्दची घोषणा करत आयुक्तांच्या अधिकारांवर गदा आणली आहे. शासनाचा हा निर्णय संभ्रम निर्माण करणारा असल्याचेही कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे. या मुद्द्यावर राज्यातील काही महापालिका न्यायालयातही जाऊ शकतात, अशी शक्यताही व्यक्त करण्यात आलेली आहे. याचबरोबर राज्य शासनाने अध्यादेश काढताना हरकती व सूचना मागविल्या होत्या; परंतु या हरकती व सूचनांना संधी न देताच शासनाने विधिमंडळात एलबीटी रद्दची घोषणा करून टाकल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)