शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

एलबीटी रद्दची घोषणा अडकणार कायद्याच्या कचाट्यात

By admin | Updated: August 3, 2015 23:41 IST

संभ्रमावस्था : आयुक्तांचे अधिकार वापरले शासनाने

नाशिक : राज्य शासनाने ५० कोटींच्या आतील उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांसाठी एलबीटी रद्द करण्याची घोषणा करत त्याची अंमलबजावणी सुरू केली खरी; परंतु सदर घोषणा आता कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली असून, माफी किंवा तडजोडीबाबत आयुक्तांचे अधिकार राज्य शासनाने वापरल्याबद्दल कायदेतज्ज्ञांनी घोषणेबाबत संभ्रम निर्माण झाला असल्याचे म्हटले आहे. राज्य शासनाने २३ जुलै रोजी अध्यादेश काढून ५० कोटींच्या वर उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना एलबीटी भरणे आणि त्यासाठी नोंदणी करणे अनिवार्य केले, तर ५० कोटींच्या आतील व्यापाऱ्यांना एलबीटी संपूर्ण रद्द करत त्यांना दिलासा दिला. याचवेळी शासनाने सदर अध्यादेशाबाबत हरकती व सूचनाही मागविल्या होत्या. सदर अध्यादेश जारी करताना शासनाने मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियमातील कलम १५२ (एन) नुसार सदर निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले होते, परंतु आता कायद्याचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी शासनाच्या या घोषणेबाबत कायद्याचा किस काढण्यास सुरुवात केली असून, राज्य शासनाने थेट आयुक्तांचे अधिकार वापरत कायद्याचा भंग केला असल्याचे मत व्यक्त केले आहे. कलम १५२ (एन) नुसार कर न भरणाऱ्या व्यापाऱ्यांना ४ ते १० पट दंड करण्याचा अधिकार आयुक्तांना असून, त्यात तडजोडीचेही अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. मात्र, राज्य शासनाने ५० कोटींच्या आतील व्यापाऱ्यांना सरसकट माफी देत एलबीटी रद्दची घोषणा करत आयुक्तांच्या अधिकारांवर गदा आणली आहे. शासनाचा हा निर्णय संभ्रम निर्माण करणारा असल्याचेही कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे. या मुद्द्यावर राज्यातील काही महापालिका न्यायालयातही जाऊ शकतात, अशी शक्यताही व्यक्त करण्यात आलेली आहे. याचबरोबर राज्य शासनाने अध्यादेश काढताना हरकती व सूचना मागविल्या होत्या; परंतु या हरकती व सूचनांना संधी न देताच शासनाने विधिमंडळात एलबीटी रद्दची घोषणा करून टाकल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)