शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी अभय; ‘नो रिफंड’

By admin | Updated: June 5, 2015 00:31 IST

थकबाकीदारांसाठीच योजना : नोंदणी केल्यानंतरच मिळणार सवलत

नाशिक : स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी थकविणाऱ्या, तसेच मुदतीत विवरणपत्र दाखल न करणाऱ्या व्यापारी-व्यावसायिकांसाठी महाराष्ट्र शासनाने व्याज व दंडमाफीची अभय योजना ३ जूनपासून लागू केली असून, त्यासंबंधीची अधिसूचना नाशिक महापालिकेला प्राप्त झाली आहे. या अभय योजनेचा लाभ केवळ थकबाकीदारांनाच मिळणार असून, यापूर्वी दंड व व्याज भरणाऱ्या व्यापाऱ्यांना अभय योजनेत कोणताही परतावा मिळणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, महापालिकेला अभय योजनेत दंडाच्या रकमेच्या माध्यमातून सुमारे ६० लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. एलबीटीचा भरणा न करणाऱ्या, तसेच नोंदणीही न केलेल्या व्यापाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने अभय योजना घोषित केली आहे. सदर योजना ३ जून ते ३१ जुलै २०१५ या कालावधीसाठी लागू असणार आहे. महापालिका क्षेत्रात एलबीटी लागू झाल्यापासून म्हणजे २१ मे २०१३ पासून ३१ मार्च २०१५ पर्यंतच्या कालावधीसाठी योजना लागू राहणार आहे. यापूर्वी मुदतीत विवरणपत्र दाखल न करणाऱ्या व्यापाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड, तसेच व्याजाची रक्कम भरावी लागली होती. शासनाने अभय योजना घोषित केल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांनाही परतावा मिळण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, केवळ थकबाकीदारांसाठीच ही अभय योजना लागू असून, यापूर्वी दंड व व्याज भरणाऱ्या व्यापाऱ्यांना कोणताही परतावा मिळणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, थकबाकीदार व्यापाऱ्यांनी या योजनेअंतर्गत महापालिकेला देय असलेल्या एलबीटीच्या थकबाकीपैकी मूळ कराची संपूर्ण रक्कम ३१ जुलैच्या आत भरल्यास त्यांना संपूर्ण व्याज व दंड माफ केला जाणार आहे. संबंधित व्यापारी/उद्योग घटकाने थकीत मूळ रकमेचा अंशत: भरणा केल्यास भरणा केलेल्या कराच्या प्रमाणात व्याज व दंडाची माफी देण्यात येणार आहे. मात्र न भरलेला कर व्याज व दंडासह वसूल केला जाणार आहे. अभय योजनेतील सवलतीचा लाभ घेण्यासाठी काही अटी-शर्ती घालण्यात आल्या आहेत. त्यात प्रामुख्याने ज्या व्यापाऱ्यांनी स्थानिक संस्था करांतर्गत अद्याप नोंदणी केलेली नसेल अशा व्यापाऱ्यांनी प्रथम नोंदणी करणे अनिवार्य आहे. व्यापाऱ्यांनी करदायित्व ज्या दिनांकापासून आले त्या दिनांकापासून ३१ मार्च २०१५ पर्यंतची विवरणे दाखल करून त्यानुसार करभरणा केला पाहिजे. अभय योजनेचा लाभ घेतल्यानंतर जर अपील पुनर्विलोकन अथवा रिट याचिका दाखल केली गेली तर, अभय योजनेनुसार संबंधित कालावधीसाठी दिलेल्या सवलती काढून घेतल्या जाणार आहेत. अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षाकरिता स्वतंत्रपणे आवेदनपत्र महापालिका आयुक्तांकडे सादर करणे आवश्यक आहे. व्यापाऱ्याला आवेदनपत्र सादर करताना अपील विनाशर्त मागे घ्यावे लागणार आहे. त्यानंतरच त्याला योजनेंतर्गत दंड व व्याजमाफी मिळणार आहे. व्यापाऱ्याने विवरणपत्र दाखल केलेले नसेल आणि त्याने जर अभय योजनेच्या काळात विवरण दाखल करून देय असलेल्या संपूर्ण कराचा भरणा केला, तर त्याला व्याज व दंडाची आकारणी होणार नाही. व्यापाऱ्याने विवरण अगोदरच दाखल केलेले असेल आणि जर त्याने पूर्वीच सुधारित विवरण दाखल करून अतिरिक्त करदायित्व मान्य केले असेल अथवा संपूर्ण कराचा भरणा केला असेल तर व्याज व दंडाची आकारणी होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे. (प्रतिनिधी)