शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी अभय; ‘नो रिफंड’

By admin | Updated: June 5, 2015 00:31 IST

थकबाकीदारांसाठीच योजना : नोंदणी केल्यानंतरच मिळणार सवलत

नाशिक : स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी थकविणाऱ्या, तसेच मुदतीत विवरणपत्र दाखल न करणाऱ्या व्यापारी-व्यावसायिकांसाठी महाराष्ट्र शासनाने व्याज व दंडमाफीची अभय योजना ३ जूनपासून लागू केली असून, त्यासंबंधीची अधिसूचना नाशिक महापालिकेला प्राप्त झाली आहे. या अभय योजनेचा लाभ केवळ थकबाकीदारांनाच मिळणार असून, यापूर्वी दंड व व्याज भरणाऱ्या व्यापाऱ्यांना अभय योजनेत कोणताही परतावा मिळणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, महापालिकेला अभय योजनेत दंडाच्या रकमेच्या माध्यमातून सुमारे ६० लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. एलबीटीचा भरणा न करणाऱ्या, तसेच नोंदणीही न केलेल्या व्यापाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने अभय योजना घोषित केली आहे. सदर योजना ३ जून ते ३१ जुलै २०१५ या कालावधीसाठी लागू असणार आहे. महापालिका क्षेत्रात एलबीटी लागू झाल्यापासून म्हणजे २१ मे २०१३ पासून ३१ मार्च २०१५ पर्यंतच्या कालावधीसाठी योजना लागू राहणार आहे. यापूर्वी मुदतीत विवरणपत्र दाखल न करणाऱ्या व्यापाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड, तसेच व्याजाची रक्कम भरावी लागली होती. शासनाने अभय योजना घोषित केल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांनाही परतावा मिळण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, केवळ थकबाकीदारांसाठीच ही अभय योजना लागू असून, यापूर्वी दंड व व्याज भरणाऱ्या व्यापाऱ्यांना कोणताही परतावा मिळणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, थकबाकीदार व्यापाऱ्यांनी या योजनेअंतर्गत महापालिकेला देय असलेल्या एलबीटीच्या थकबाकीपैकी मूळ कराची संपूर्ण रक्कम ३१ जुलैच्या आत भरल्यास त्यांना संपूर्ण व्याज व दंड माफ केला जाणार आहे. संबंधित व्यापारी/उद्योग घटकाने थकीत मूळ रकमेचा अंशत: भरणा केल्यास भरणा केलेल्या कराच्या प्रमाणात व्याज व दंडाची माफी देण्यात येणार आहे. मात्र न भरलेला कर व्याज व दंडासह वसूल केला जाणार आहे. अभय योजनेतील सवलतीचा लाभ घेण्यासाठी काही अटी-शर्ती घालण्यात आल्या आहेत. त्यात प्रामुख्याने ज्या व्यापाऱ्यांनी स्थानिक संस्था करांतर्गत अद्याप नोंदणी केलेली नसेल अशा व्यापाऱ्यांनी प्रथम नोंदणी करणे अनिवार्य आहे. व्यापाऱ्यांनी करदायित्व ज्या दिनांकापासून आले त्या दिनांकापासून ३१ मार्च २०१५ पर्यंतची विवरणे दाखल करून त्यानुसार करभरणा केला पाहिजे. अभय योजनेचा लाभ घेतल्यानंतर जर अपील पुनर्विलोकन अथवा रिट याचिका दाखल केली गेली तर, अभय योजनेनुसार संबंधित कालावधीसाठी दिलेल्या सवलती काढून घेतल्या जाणार आहेत. अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षाकरिता स्वतंत्रपणे आवेदनपत्र महापालिका आयुक्तांकडे सादर करणे आवश्यक आहे. व्यापाऱ्याला आवेदनपत्र सादर करताना अपील विनाशर्त मागे घ्यावे लागणार आहे. त्यानंतरच त्याला योजनेंतर्गत दंड व व्याजमाफी मिळणार आहे. व्यापाऱ्याने विवरणपत्र दाखल केलेले नसेल आणि त्याने जर अभय योजनेच्या काळात विवरण दाखल करून देय असलेल्या संपूर्ण कराचा भरणा केला, तर त्याला व्याज व दंडाची आकारणी होणार नाही. व्यापाऱ्याने विवरण अगोदरच दाखल केलेले असेल आणि जर त्याने पूर्वीच सुधारित विवरण दाखल करून अतिरिक्त करदायित्व मान्य केले असेल अथवा संपूर्ण कराचा भरणा केला असेल तर व्याज व दंडाची आकारणी होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे. (प्रतिनिधी)