शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अनुषंगाने शिक्षणाची पायाभरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:12 IST

नाशिक: कोरोना संक्रमणानंतर शिक्षणाची संकल्पनाच बदलू पाहत असून शैक्षणिक क्षेत्रात नव्या संकल्पनाची रुजवात होत असताना दिसते. ...

नाशिक: कोरोना संक्रमणानंतर शिक्षणाची संकल्पनाच बदलू पाहत असून शैक्षणिक क्षेत्रात नव्या संकल्पनाची रुजवात होत असताना दिसते. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यापीठांच्या शिक्षणाची दिशा तर अधिक व्यापक होणार असल्याने पारंपरिक आणि विशेष विद्यापीठांची सीमारेषा पुसट होत जाणार आहे. विद्यापीठांमध्ये होऊ घातलेल्या या बदलाच्या अनुषंगाने आताच पायाभरणी सुरू केली असल्याचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई वायुनंदन यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा गुरुवारी (दि. १) ३२ वा वर्धापन दिन असून या पार्श्वभूमीवर कुलगुरू वायुनंदन यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. खुल्या शिक्षणाचे महत्त्व ओळखून ३२ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या विद्यापीठात सद्यस्थितीत सहा लाख इतके विद्यार्थी असल्याने मुक्त शिक्षणाचा प्रवाह गतिमान झाला असल्याबाबत कुलगुरू वायुनंदन यांना विचारले असता, त्यांनी शिक्षणाची ही ज्ञानगंगा प्रशस्त आणि अधिक प्रदीर्घ होत जाणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

कोरोनाच्या काळात पारंपरिक विद्यापीठांना मर्यादा आलेल्या असताना मुक्त विद्यापीठाने राज्यात शिक्षणाची गती तंत्रज्ञानाच्या बळावर कायम राखल्याचे वायुनंदन यांनी सांगितले. ऑडिओ, व्हिडिओच्या माध्यमातील शिक्षणाचा पाया आणि इस्रोच्या मदतीने अभ्यासकेंद्रे जोडून घरोघरी शिक्षण पोहोचविण्याचा विद्यापीठाचा अनुभव असून ३२ वर्षांत लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम विकसित करून विद्यापीठ राज्यात अग्रेसर असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोनानंतर शिक्षणातील संकल्पना बदलत आहेच, शिवाय नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात मुक्त तसेच पारंपरिक विद्यापीठाची संकल्पना एकसारखीच असणार आहे. त्यामुळे विद्यापीठ इतरांवर अवलंबून न राहता स्वत:ची साधनसामुग्री निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.

विद्यापीठाच्या स्वमालकीची अभ्यास केंद्रे, विविध विद्याशाखा, त्यासाठी लागणारे तज्ज्ञ शिक्षक, पुस्तक निर्मिती विभाग, शिक्षकेतर कर्मचारी, अभ्यास मंडळावरील तज्ज्ञ याबाबत अन्य कोणत्याही संस्थांवर विसंबून न राहता विद्यापीठाने स्वत:ची साधनसामुग्री उभारण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. शिक्षणात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे कुलगुरू वायुनंदन यांनी सांगितले.

--इन्फो--

१) महाराष्ट्रातील पहिला व भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा ऑनलाईन पदवीदान सोहळा मुक्त विद्यापीठाने मार्च २०२१ मध्ये यशस्वीपणे घेतला. व्हर्च्युअल रिॲलिटी पद्धतीचा हा सोडला देशभर गाजला

२) मागील वर्षी सर्व परीक्षा ऑनलाईन घेणारे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ म्हणून बहुमान

३) नॅक ॲक्रिडेशन मिळविण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल

४) कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग एक्सलन्सी पुरस्कार दोनदा मिळविणारे एकमेव विद्यापीठ