शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

दोन दुचाकीसह लाखो रु पयांचा ऐवज लंपास कळवण : सेना पदाधिकाऱ्यालाही फटका; पोलीस यंत्रणेविषयी तीव्र नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:09 IST

कळवण : शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शिवाजीनगर, महालक्ष्मी कॉलनीत भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून ७० हजार रुपयांच्या रोकडसह ९८ हजारांचा मुद्देमाल व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जितेंद्र वाघ यांच्या दुचाकीसह अन्य एक दुचाकी असा अडीच लाख रु पयांचा ऐवज चोरट्यांनी हातोहात लांबविला.

ठळक मुद्देपोलिसांची शहरात रात्रीची गस्ती वाढवावी, अशी मागणीकळवण पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

कळवण : शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शिवाजीनगर, महालक्ष्मी कॉलनीत भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून ७० हजार रुपयांच्या रोकडसह ९८ हजारांचा मुद्देमाल व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जितेंद्र वाघ यांच्या दुचाकीसह अन्य एक दुचाकी असा अडीच लाख रु पयांचा ऐवज चोरट्यांनी हातोहात लांबविला. धाडसी घरफोडी झाल्याने नागरिक भयभयीत झाले असून, या घरफोड्यांचा पोलिसांनी तपास लावून कळवणकर जनतेला दिलासा द्यावा व पोलिसांची शहरात रात्रीची गस्ती वाढवावी, अशी मागणी कळवणकर जनतेने केली आहे. कळवण शहरातील नामदेव रघुनाथ लहारे हे बाहेरगावी गेले असल्याने त्यांच्या शहरातील शिवाजीनगर भागातील महालक्ष्मी कॉलनीतील बंद घराचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटातील २० हजाराचे लॅपटॉप, ७० हजारांची रोकड, १५ हजारांची सोन्याची अंगठी, हजाराचे कडे असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. त्याबरोबर त्याच रात्री शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जितेंद्र वाघ व विलास निंबा पाटील यांच्या दुचाकी घरासमोरून चोरीला गेल्या आहेत. विशेष म्हणजे दोन्ही दुचाकी या हॅण्डल लॉक असताना चोरीस गेल्या आहेत. याबाबत कळवण पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद जाधोर करीत आहेत.शहरातील शिवाजीनगर परिसरात नोकरदारांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. परीक्षा संपल्याने उन्हाळी सुट्टी सुरू झाल्याने बहुतांशी नोकरदार बाहेरगावी गेले असल्याने शहरातील उपनगरातील अनेक घरे बंदच आहेत, याचा फायदा घेऊन चोरट्यांनी आपला मोर्चा कळवण शहराकडे वळविला आहे. टेहळणी करून बंद घरांचे दरवाजे फोडून यशस्वी घरफोड्या करण्यात चोरटे यशस्वी झाले आहेत. भरदिवसा घरफोड्या होत असल्याने शहरातील नागरिक भयभयीत झाले असून, मागील वर्षी झालेल्या घरफोडींच्या तपासात कळवण पोलीस यंत्रणा अपयशी ठरली असताना पुन्हा घरफोडी सत्र सुरू झाल्याने नागरिक भयभयीत झाले आहेत. त्यामुळे कळवण पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जितेंद्र वाघ यांनी केली आहे.