शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे जाणारा सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
3
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
4
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
7
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
8
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
9
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
10
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
11
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
12
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
13
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
14
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
15
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
16
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
17
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
18
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

कायद्याने केवळ निकाल मिळतो

By admin | Updated: December 25, 2014 02:02 IST

अपर्णा रामतीर्थकर : महिला हरिनाम सप्ताह

नाशिक : पती-पत्नीची भांडणे सामंजस्यानी सोडविली तरच संसार टिकतात़ कायद्याने केवळ निकाल मिळतो. संसार आणि माणसे मात्र कायमस्वरूपी तुटतात, असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड़ अपर्णा रामतीर्थकर यांनी येथे सांगितले़पंचवटीतील काळाराम मंदिरात जय अंबे चॅरिटेबल ट्रस्ट व सीतामाई महिला भजनी मंडळ यांच्या वतीने आयोजित अखंड महिला हरिनाम सप्ताहात ‘धर्मसंस्कृती आणि कुटुंब व्यवस्था’ या विषयवार आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या़ रामतीर्थकर म्हणाल्या, पती- पत्नीने भांडण झाल्यानंतर लगेच पोलीस स्टेशन व न्यायालयात न जाता दोन्ही कुटुंबांनी चर्चा करून हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे़ या माध्यमातून आपण महाराष्ट्र राज्यातील १२७१ होणाऱ्या फारकती थांबविल्या आहेत़ आज ही दांपत्ये सुखाने संसार करत आहेत याचा अभिमान वाटतो़ भारतीय संस्कृतीत स्त्रीला विशेष असे महत्त्व असून, स्त्री ही कुटुंब व्यवस्थेची मुख्य कणा आहे़ संस्कृती टिकवण्याचे जबाबदारी खऱ्या अर्थाने आता महिलावर्गांवर आली आहे़ महिलांनी आपल्या मुलांना चांगल्या शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार द्यावेत़ मानवता, कुटुंबाविषयी आदर, व्यक्ती शिक्षण याचे ज्ञान आईने मुलांना देण्याची गरज आहे़ कायद्याने पती-पत्नीतील भांडण मिटत नसून केवळ निकाल हाती येतो़ मुलांना वसतिगृहात न ठेवता कुटुंबातच ठेवून त्यांना कुटुंबव्यवस्थेचे शिक्षण द्यावे संसारात होणाऱ्या भांडणात मुलीच्या घरच्यांनी जास्त हस्तक्षेप करू नये, तर डिसेंबर ऐवजी नवीन वर्षे गुढीपाडव्यालाच साजरे करावे, असे कळकळीचे आवाहनही अ‍ॅड़ रामतीर्थकर यांनी येथे केले़ याप्रसंगी महंत राधाबाई सानप, विश्वनाथ घुगे, भरतानंद महाराज सांगळे,विजय घुगे, भीमराव बोडके, ज्ञानेश्वर सोमसे, संजीव अहिरे, दादासाहेब वाबळे, किरण दराडे, श्याम घुगे आदि उपस्थित होते़ (प्रतिनिधी)